शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

युग हरवला, श्वास रोखला!

By admin | Updated: September 3, 2014 01:37 IST

त्या कोवळ्या जीवाचा दोष तरी काय होता हो, रोज हसतमुखाने ‘हॅलो अंकल’ म्हणणारा युग आता कधीच दिसणार नाही ही कल्पनाच असह्य आहे. काय बोलावे सुचतच नाही! छापरुनगर परिसरातील गुरुवंदना अपार्टमेंट

युगच्या हत्येमुळे हादरले शहर : हळहळ, संताप अन् आक्रोशनागपूर : त्या कोवळ्या जीवाचा दोष तरी काय होता हो, रोज हसतमुखाने ‘हॅलो अंकल’ म्हणणारा युग आता कधीच दिसणार नाही ही कल्पनाच असह्य आहे. काय बोलावे सुचतच नाही! छापरुनगर परिसरातील गुरुवंदना अपार्टमेंट जवळ राहणाऱ्या व चांडक कुटुंबीयांच्या अगदी जवळ असणाऱ्या एका व्यापाऱ्याला अश्रू आवरत नव्हते. अशी केवळ एकच व्यक्ती नव्हती तर युगच्या घरासमोर जमलेल्या हजारो नागरिकांच्या मनात दाटली होती हळहळ, आक्रोश अन् संतापाची भावना. गुरुवंदना अपार्टमेंटमधील महिलांचे डोळे तर अश्रूंनी डबडबले होते.पोलिसांवर रोष रात्री १२.३० च्या सुमारास युगच्या घरासमोर उभ्या असलेल्या काही संतप्त नागरिकांनी लकडगंज पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. तर अनेक जण गणेशपेठ पोलीस ठाण्याकडे रोष व्यक्त करण्यासाठी गेले. मुळात युगला अपहरणकर्ते शहराबाहेर घेऊन गेलेच कसे, युगच्या अपहरणकर्त्यांना पकडण्यात अपयश का आले? असा संतप्त सवाल नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होते.आईला सांगणार कसे?युगची आईची प्रकृती अपहरणाच्या वृत्तापासूनच खालावली होती. गेल्या २८ तासांपासून स्वत:ला आणि कुटुंबीयांनाही सावरत असलेले डॉ. मुकेश चिमुकल्या युगच्या हत्येच्या वृत्ताने अक्षरश: कोलमडले. युगच्या आईला हत्येबद्दल मध्यरात्रीनंतर कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यांना झोपण्याचे इंजेक्शन देण्यात आले होते. परंतु ते काम करत नसल्याने अखेर खासगी रुग्णालयात नेण्याचे नातेवाईकांनी ठरविले. यावेळी परिसरात उभ्या असलेल्या हजारोंच्या गर्दीने शांत रहावे व त्यांना कळू देऊ नका, असे आवाहन नातेवाईकांकडून करण्यात आले.‘व्हॉट्सअ‍ॅप’मुळे वाढली गर्दीयुगच्या हत्येची बातमी ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून वाऱ्यासारखी पसरली. छापरुनगर परिसरातील नागरिकांसोबतच महाल, इतवारी, वर्धमाननगर येथील अनेक नागरिकांनी गुरुवंदना अपार्टमेंट तसेच मेयो हॉस्पिटलकडे धाव घेतली. प्रत्येक जणाचे काळीज गहिवरले होते. ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर क्षणाक्षणाच्या अपडेट्स लोक ‘शेअर’ करत होते आणि यामुळे निरनिराळ्या अफवा पसरत होत्या.मेयोमध्ये तणाव अन् लाठीमारमेयो हॉस्पिटलमध्ये युगचे शव आणणार असल्याची अफवा पसरली आणि मेयोसमोर नागरिकांची प्रचंड गर्दी जमा झाली. सुमारे दीड हजार नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. या घटनेने समाजमन सुन्न झाले होते. गर्दी वाढल्याने मेयोसमोर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. येथेही पोलिसांचा बंदोबस्त असणे आवश्यक असताना पोलिसांची अनुपस्थिती होती. अखेर रात्री १ वाजताच्या सुमारास पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला अन् गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.अवघे अपार्टमेंट जागेयुगच्या मृत्यूची बातमी येताच गुरुवंदना सहनिवास दु:खाच्या सागरात बुडून गेले. येथील महिला, लहान मुली, ज्येष्ठ नागरिक हताशपणे गॅलरीत उभे होते. रात्री उशिरापर्यंत येथील सर्व नागरिक जागेच होते आणि गर्दीला शांत राहण्याचे आवाहन करीत होते.