शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

इफेड्रीन: ३४० पानांचे तिसरे आरोपपत्र दाखल

By admin | Updated: July 26, 2016 23:13 IST

३४० पानांचे आरोपपत्र ठाणे पोलिसांनी विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांच्या न्यायालयात मंगळवारी दाखल केले.

जितेंद्र कालेकर/ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 26 - सुमारे दोन हजार कोटींच्या इफे ड्रीन प्रकरणातील सूत्रधार जयमुखी याच्या विरोधात तिसरे ३४० पानांचे आरोपपत्र ठाणे पोलिसांनी विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांच्या न्यायालयात मंगळवारी दाखल केले. सोलापुरातून देश विदेशात झालेल्या इफे ड्रीन तस्करीचा तो मुख्य सूत्रधार असल्याचे या आरोपपत्रात पोलिसांनी म्हटले आहे.जयमुखीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. न्यायालयीन कोठडीतूनच त्याने आता पोलिसांवर बेछूट आरोप करण्यास सुरुवात केली असतांना त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रियाही मंगळवारी अंमली पदार्थ विरोधी पथकाने पार पाडली. इफे ड्रीनच्या तस्करीसाठी एव्हॉनचा तत्कालीन संचालक मनोज जैन, पुनित श्रींगी आदीबरोबर केनिया, दुबई आणि मुंबईतील बैठकांना तो हजर होता. शेअर खरेदीचे ज्ञान अवगत असल्यामुळे एव्हॉनचे शेअर्स ममताच्या नावावर करण्याची प्रक्रियाही जयमुखीने सुरु केली होती. किशोर राठोड आणि संचालक मनोज जैन यांच्यात मध्यस्थाची भूमिकाही त्याने केली. गुजरातमध्ये पकडलेल्या १३०० किलो इफे ड्रीन प्रकरणातही त्याचा महत्वाचा सहभाग होता, असे अनेक आरोप पोलिसांनी यामध्ये केले आहेत. * पुराव्यासाठी काय जोडले...जयमुखीवरील आरोपपत्रासोबत पुराव्यासाठी पोलिसांनी ममता कुलकर्णी, किशोर राठोड, विकी गोस्वामी यांच्यात झालेल्या व्हॉटस्अ‍ॅप संभाषणाचा तपशीलही दिला आहे. त्यासाठी मोबाईल लोकेशन, डाटा आणि सीडीआरची माहितीही दिली आहे.*ड्रग्जचा काळा पैसा कसा स्वीकारला. प्रत्येक बैठकीला जयमुखीने कशी महत्त्वाची भूमिका बजावली, याची तपशीलवार माहिती पोलिसांनी आरोपपत्रात दिली आहे.* या आधी ९ जून रोजी याचप्रकरणी कंपनीचा व्यवस्थापक राजेंद्र डिमरी, निर्मिती व्यवस्थापक स्वामी, ठाण्यात इफेड्रीन विक्रीसाठी आलेले सागर पोवळे आणि मयूर सुखदरे या चौघांविरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. * त्यापाठोपाठ २३ जून रोजी कंपनीचा संचालक मनोज जैन, सल्लागार पुनित श्रींगी, नरेंद्र काचा, नवी मुंबईचा हरदीप गिल आणि बाबा धोत्रे या पाच जणांविरुद्ध ३८५ पानांचे दुसरे आरोपपत्र दाखल केले होते. * आता इफे ड्रीनची तस्करी करण्यात मोठा वाटा उचलणारा जयमुखी याच्याविरुद्ध हे तिसरे आरोपपत्र दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. इफेड्रीन प्रकरणात सुरुवातीला ठाणे पोलिसांनी अटक केलेले सागर पोवळे आणि मयूर सुखदरे यांनी ठाण्याच्या विशेष सत्र न्यायालयात जामीनासाठी सोमवारी अर्ज केला होता. मात्र, त्यांना जामीन मिळू नये यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे आग्रह धरला. यातील तीव्रता आणि आणि गांभीर्यता लक्षात घेऊन विशेष न्यायाधीश तथा जिल्हा सत्र न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांनी या दोघांचेही जामीन फेटाळले. त्यामुळे त्यांची पुन्हा न्यायालयीन कोठडीत अर्थात ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली आहे.