शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

इफेड्रीन प्रकरण: एव्हॉनच्या संचालकासह सहा जणांवर आरोपपत्र दाखल होणार

By admin | Updated: June 22, 2016 18:57 IST

संचालक मनोज जैन याच्यासह सहा जणांविरुद्ध अडीच हजार कोटींच्या बेकायदेशीर साठ्याप्रकरणी ठाणे न्यायालयात पोलिसांकडून येत्या दोन दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल केले जाणार

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 22 -  सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. या कंपनीतून देश विदेशात इफेड्रीनची तस्करी करणारा कंपनीचा संचालक मनोज जैन याच्यासह सहा जणांविरुद्ध अडीच हजार कोटींच्या बेकायदेशीर साठ्याप्रकरणी ठाणे न्यायालयात पोलिसांकडून येत्या दोन दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. याआधी याचप्रकरणी कंपनीचा व्यवस्थापक राजेंद्र डिमरी याच्यासह चौघांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एव्हॉन लाईफसायन्सेस या कंपनीत खोकल्यावरील औषधाची निर्मिती केली जात होती. हे औषध मुख्यत्वे अमेरिकेच्या एका नामांकित कंपनीकडून खरेदी केले जात होते. या कंपनीने त्यावर 2004 मध्ये बंदी आणल्यानंतर यातील इफेड्रीनचा मोठा साठा एका गोदामात पडून होता. कंपनीला कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी मनोज जैनसह तीन संचालकांनी पालघर जिल्हयातील पुनीत ङ्म्रींगी याची सल्लागार म्हणून नियुक्ती केली. पुनितनेच पुढे काही कामगारांना हाताशी धरुन इफेड्रीनवर प्रक्रीया करुन ते शुद्ध केले. तीच पावडर पुढे एमडी तसेच वेगवेगळया मादक पदार्थाच्या नावाखाली गुजरात, हैद्राबाद, केनिया तसेच युरोप आणि दुबईतही विकला गेला. यातून पुनितकडून मनोजला 85 लाख रुपये मिळाले. विकी गोस्वामी याच्याकडून एव्हॉनला सुमारे 65 लाख रुपये दिले गेल्याची माहितीही पुनितच्या चौकशीत समोर आली आहे. याव्यतिरिक्तही त्याने करोडो रुपये दिल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती आहेत. तर आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया विकी गोस्वामी, ममता कुलकर्णी, जयमुखी, किशोर राठोड, सुशिल सुब्रमण्यम, तांजानियाचा डॉ. अब्दुल्ला आणि त्याचे दोन साथीदार हे यांच्या केनियात अनेकदा बैठका झाल्या. ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 14 एप्रिल 2016 रोजी या कंपनीत धाड टाकून धानेश्वर स्वामी आणि राजेंद्र डिमरी या दोघांना अटक केली. त्यानंतर या कंपनीतून सुमारे 23 टन इफेड्रीन आणि सुडो इफेड्रीन तसेच अ‍ॅसेटीक अनहायड्रेड द्रव असा अडीच हजार कोटींचा माल जप्त केला.कंपनीतील 80 ते 90 कामगार तसेच संचालक जैन, अजित कामत आणि राजेंद्र कैमल यांच्या चौकशीनंतर जैनला अटक केली. आतार्पयत मयूर सुखदरे, सागर, पुनित, हरदिप गिल, जरेंद्र काचा आणि बाबा धोतरे आदी दहा जणांना अटक केली आहे. कंपनीत किती कच्च माल आला, किती विकला गेला, त्यातील नेमका किती अधिकृत दाखवला तर किती बेकायदेशीर होता, याबाबतच्या कोणत्याही अधिकृत नोंदी नाहीत. जो माल नष्ट करणो आवश्यक होते. तो नष्ट न करता त्यावर प्रक्रीया करुन त्याची या संपूर्ण टोळीने तस्करी केली. तसेच केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग , अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्याकडेही कोणत्याच नोंदी नाहीत. अशा अनेक बाबी ठाणो पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात नोंदविल्या आहेत. पुनितने कंपनीवर धाड पडल्यानंतर आपले मोबाईल बंद केले होते. तो अनेक दिवस पसार झाला होता. जयमुखीनेही अशाच प्रकारे पोलिसांना चकवा दिला. अखेर त्यालाही नेपाळमधून अटक करण्यात आली. त्यातूनच त्यांचा या तस्करीतील सहभाग अधिक स्पष्ट होत असल्याचे आरोपपत्रत म्हटले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.