शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

एफआयआर डिजिटल स्वरूपात घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 03:51 IST

राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास, तसेच गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांनी अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. गुन्ह्याची फिर्याद (एफआयआर) डिजिटल स्वरूपात घ्यावी

मुंबई : राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास, तसेच गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांनी अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. गुन्ह्याची फिर्याद (एफआयआर) डिजिटल स्वरूपात घ्यावी, तसेच मोबाइलवरून नागरिकांना तक्रार दाखल करण्याची सुविधा देण्यासाठी यंत्रणा उभी करावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिका-यांना केली.राज्याच्या पोलीस मुख्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या अर्धवार्षिक परिषदेत ते बोलत होते. या वेळी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव सुमित मलिक, गृहविभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथुर, मुंबईचे आयुक्त दत्ता पडसलगीकर उपस्थित होते. पोलीस दलाच्या ‘दक्षता’ मासिकाच्या गणेशोत्सव व स्वातंत्र्य दिन विशेषांकाचे, तसेच मासिकाच्या फेसबुक पेजचे अनावरणही या वेळी करण्यात आले.फडणवीस म्हणाले, ‘पोलीस दलामध्ये मनुष्यबळ कमी पडत आहे. मात्र, यावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात यावा. राज्यातील अनेक अधिकाºयांकडे नवनवीन कल्पना आहेत. या कल्पना एकत्रित करून, त्याचा वापर आपल्या कामामध्ये करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यात गुन्हे व गुन्हेगारी माग काढण्यासाठी अन्वेषण यंत्रणा व प्रणाली (सीसीटीएनएस) हा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती जमा झाली आहे. त्याचे विश्लेषण करून त्याचा वापर दैनंदिन कामात वाढविण्यासाठी पोलीस अधिकाºयांनी प्रयत्न करावेत,’ असेही त्यांनी पुढे सांगितले. या वेळी गृहराज्यमंत्री केसरकर व डॉ. रणजित पाटील यांची भाषणे झाली. पोलीस महासंचालक माथुर व मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी पोलिसांच्या योजनांचे सादरीकरण केले. या वेळी अपर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी, आस्थापना विभागाचे राजेंद्रसिंंह, नियोजन व तरतूद विभागाचे लक्ष्मीनारायण अधिकारी उपस्थित होते.