शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक प्रकल्पाने पर्यावरणाचा ऱ्हास

By admin | Updated: June 6, 2017 01:40 IST

रासायनिक प्रकल्पामुळे वाढलेले जल तसेच वायू प्रदूषणाने पर्यावरणाचा झालेला ऱ्हास हा कधीही भरून न निघणारा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील रासायनिक प्रकल्पामुळे वाढलेले जल तसेच वायू प्रदूषणाने पर्यावरणाचा झालेला ऱ्हास हा कधीही भरून न निघणारा आहे. विविध रासायनिक कारखान्यांनी विविध प्रकारच्या औषधांची निर्मिती करून विविध रोगांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे कुरकुंभ येथील हजारो एकर शेतीला याचा दुष्परिणाम सोसावा लागला. रासायनिक प्रकल्पातून उत्सर्जित होणारे सांडपाणी व त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाने जीवनमान विस्कळीत होत असताना हे पुढील काळात येणाऱ्या पिढीला मोठ्या स्वरूपात भोगावे लागणार आहे.कुरकुंभ येथे रासायनिक प्रकल्पाबरोबरच पर्यावरणावर विशेष लक्ष देणे गरजेचे होते.या औद्योगिक क्षेत्रामधील प्रत्येक रासायनिक प्रकल्पाला नियमाद्वारे सांडपाणी प्रक्रिया केंद्राची सक्ती करणे गरजेचे असताना सुरुवातीलाच परवाने देताना अशा प्रकारच्या सर्व तपासण्या करणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्यामुळे बऱ्याच कारखानदारांनी याचा दुरुपयोग केला व सांडपाण्यावरील खर्च वाचवण्यासाठी रासायनिक प्रक्रिया केलेले पाणी बिनधास्तपणे उघड्यावर सोडून दिले. परिणामी आज कुरकुंभ व परिसरातील जवळपास सहा ते सात किलोमीटरपर्यंत जमिनीत रासायनिक पाण्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत.पर्यावरणाच्या ऱ्हासाने परिसरातील जीवनमान अगदीच विस्कळीत झाले असून, पिण्याच्या पाण्यापासून ते उत्सर्जित होणाऱ्या वायूपासून विविध प्रकारच्या रोगांचे प्रादुर्भाव या परिसरात दिसू लागले आहेत. विहिरी, कूपनलिका व अन्य पाण्याच्या स्रोतांवर याचा परिणाम मोठ्या स्वरुपात दिसून आला आहे. मात्र पंचवीस वर्षे उलटूनदेखील याबाबत असलेली उदासीनता येथील सामान्य नागरिकांच्या माथी मारलेलीच दिसून येते. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कुठलाच उपाय या परिसरात केलेला दिसून येत नाही. परिणामी यापासून होणारे दुष्परिणामच येणाऱ्या काळात येथील नागरिकांना सोसावे लागणार, हेच यातून दिसून येत आहे.