शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

रासायनिक प्रकल्पाने पर्यावरणाचा ऱ्हास

By admin | Updated: June 6, 2017 01:40 IST

रासायनिक प्रकल्पामुळे वाढलेले जल तसेच वायू प्रदूषणाने पर्यावरणाचा झालेला ऱ्हास हा कधीही भरून न निघणारा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील रासायनिक प्रकल्पामुळे वाढलेले जल तसेच वायू प्रदूषणाने पर्यावरणाचा झालेला ऱ्हास हा कधीही भरून न निघणारा आहे. विविध रासायनिक कारखान्यांनी विविध प्रकारच्या औषधांची निर्मिती करून विविध रोगांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे कुरकुंभ येथील हजारो एकर शेतीला याचा दुष्परिणाम सोसावा लागला. रासायनिक प्रकल्पातून उत्सर्जित होणारे सांडपाणी व त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाने जीवनमान विस्कळीत होत असताना हे पुढील काळात येणाऱ्या पिढीला मोठ्या स्वरूपात भोगावे लागणार आहे.कुरकुंभ येथे रासायनिक प्रकल्पाबरोबरच पर्यावरणावर विशेष लक्ष देणे गरजेचे होते.या औद्योगिक क्षेत्रामधील प्रत्येक रासायनिक प्रकल्पाला नियमाद्वारे सांडपाणी प्रक्रिया केंद्राची सक्ती करणे गरजेचे असताना सुरुवातीलाच परवाने देताना अशा प्रकारच्या सर्व तपासण्या करणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्यामुळे बऱ्याच कारखानदारांनी याचा दुरुपयोग केला व सांडपाण्यावरील खर्च वाचवण्यासाठी रासायनिक प्रक्रिया केलेले पाणी बिनधास्तपणे उघड्यावर सोडून दिले. परिणामी आज कुरकुंभ व परिसरातील जवळपास सहा ते सात किलोमीटरपर्यंत जमिनीत रासायनिक पाण्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत.पर्यावरणाच्या ऱ्हासाने परिसरातील जीवनमान अगदीच विस्कळीत झाले असून, पिण्याच्या पाण्यापासून ते उत्सर्जित होणाऱ्या वायूपासून विविध प्रकारच्या रोगांचे प्रादुर्भाव या परिसरात दिसू लागले आहेत. विहिरी, कूपनलिका व अन्य पाण्याच्या स्रोतांवर याचा परिणाम मोठ्या स्वरुपात दिसून आला आहे. मात्र पंचवीस वर्षे उलटूनदेखील याबाबत असलेली उदासीनता येथील सामान्य नागरिकांच्या माथी मारलेलीच दिसून येते. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कुठलाच उपाय या परिसरात केलेला दिसून येत नाही. परिणामी यापासून होणारे दुष्परिणामच येणाऱ्या काळात येथील नागरिकांना सोसावे लागणार, हेच यातून दिसून येत आहे.