शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
2
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
3
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
4
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
5
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
6
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
7
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
8
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
9
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
10
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
12
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
13
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
14
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
15
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
16
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
17
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
18
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
20
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला

रासायनिक प्रकल्पाने पर्यावरणाचा ऱ्हास

By admin | Updated: June 6, 2017 01:40 IST

रासायनिक प्रकल्पामुळे वाढलेले जल तसेच वायू प्रदूषणाने पर्यावरणाचा झालेला ऱ्हास हा कधीही भरून न निघणारा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील रासायनिक प्रकल्पामुळे वाढलेले जल तसेच वायू प्रदूषणाने पर्यावरणाचा झालेला ऱ्हास हा कधीही भरून न निघणारा आहे. विविध रासायनिक कारखान्यांनी विविध प्रकारच्या औषधांची निर्मिती करून विविध रोगांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे कुरकुंभ येथील हजारो एकर शेतीला याचा दुष्परिणाम सोसावा लागला. रासायनिक प्रकल्पातून उत्सर्जित होणारे सांडपाणी व त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाने जीवनमान विस्कळीत होत असताना हे पुढील काळात येणाऱ्या पिढीला मोठ्या स्वरूपात भोगावे लागणार आहे.कुरकुंभ येथे रासायनिक प्रकल्पाबरोबरच पर्यावरणावर विशेष लक्ष देणे गरजेचे होते.या औद्योगिक क्षेत्रामधील प्रत्येक रासायनिक प्रकल्पाला नियमाद्वारे सांडपाणी प्रक्रिया केंद्राची सक्ती करणे गरजेचे असताना सुरुवातीलाच परवाने देताना अशा प्रकारच्या सर्व तपासण्या करणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्यामुळे बऱ्याच कारखानदारांनी याचा दुरुपयोग केला व सांडपाण्यावरील खर्च वाचवण्यासाठी रासायनिक प्रक्रिया केलेले पाणी बिनधास्तपणे उघड्यावर सोडून दिले. परिणामी आज कुरकुंभ व परिसरातील जवळपास सहा ते सात किलोमीटरपर्यंत जमिनीत रासायनिक पाण्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत.पर्यावरणाच्या ऱ्हासाने परिसरातील जीवनमान अगदीच विस्कळीत झाले असून, पिण्याच्या पाण्यापासून ते उत्सर्जित होणाऱ्या वायूपासून विविध प्रकारच्या रोगांचे प्रादुर्भाव या परिसरात दिसू लागले आहेत. विहिरी, कूपनलिका व अन्य पाण्याच्या स्रोतांवर याचा परिणाम मोठ्या स्वरुपात दिसून आला आहे. मात्र पंचवीस वर्षे उलटूनदेखील याबाबत असलेली उदासीनता येथील सामान्य नागरिकांच्या माथी मारलेलीच दिसून येते. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कुठलाच उपाय या परिसरात केलेला दिसून येत नाही. परिणामी यापासून होणारे दुष्परिणामच येणाऱ्या काळात येथील नागरिकांना सोसावे लागणार, हेच यातून दिसून येत आहे.