शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

राज्यात ३ जूनपासून पर्यावरण सप्ताह

By admin | Updated: May 28, 2015 22:29 IST

गोपीनाथ मुंडेंना अनोखी श्रद्धांजली : मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ ३ ते ९ जून या कालावधीत राज्यात पर्यावरण सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कालावधीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी, असे आदेश जिल्हा प्रशासनास दिले आहेत.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास, जलसंधारण व बालविकास रोजगार हमी योजना विभागामार्फत जिल्हा प्रशासनास दिलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे की, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी देशासाठी व राज्याच्या विकासासाठी केलेली प्रभावी कामगिरी व योगदान विचारात घेता त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दरवर्षी ३ ते ९ जून या कालावधीत पर्यावरण सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने २६ मे रोजी घेतला आहे.या शासन निर्णयानुसार संपूर्ण राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात यावा. या पर्यावरण सप्ताहामध्ये जलयुक्त शिवार अभियानातील निवडण्यात आलेल्या गावांना प्राधान्य देण्यात यावे. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम प्राथमिक, माध्यमिक शाळेची ठिकाणे, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे, समाजमंदिर, गावठाण, गायरान, ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जमिनी, शासकीय- निमशासकीय कार्यालय व रस्त्याच्या दुतर्फा आदी ठिकाणी प्राधान्याने घेण्यात यावा.या कार्यक्रमासाठी पुणे सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी योग्य प्रतीच्या रोपांचा पुरवठा सर्व संबंधितांना करण्याची व्यवस्था करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपरोक्त पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करावे. तसेच पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, लोकप्रतिनिधींच्या हस्ते दरवर्षी ३ जून रोजी किमान एका गावामध्ये पर्यावरण सप्ताहाचा प्रारंभ करावा. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सर्व गावात पर्यावरण सप्ताहानिमित्त वृक्ष लागवड व इतर कार्यक्रम एकावेळी सुरू करावेत, एक दिवस मजुरांसोबत कार्यक्रमांतर्गत मजुरांना जॉबकार्ड देणे, विमा योजनेमध्ये समावेश करणे व वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ उपलब्ध करून देणे आदी कामे करण्यात यावीत. या पर्यावरण सप्ताहामध्ये सक्रीय लोकसहभाग घेण्यात यावा, तसेच वृक्ष लागवड करावयाचे गावनिहाय नियोजन करावे, प्रसिद्धीसाठी दिलेल्या जलयुक्त शिवार व रोजगार हमी योजना निधीतून पर्यावरण सप्ताहास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देण्यात यावी. विभागीय आयुक्तांनी उपरोक्त पर्यावरण सप्ताहामध्ये हाती घेतलेल्या कार्यक्रमाचा अहवाल शासन निर्णयाच्या प्रपत्रात शासनास दरवर्षी २० जूनपर्यंत सादर करावा. पर्यावरण सप्ताह यशस्वी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आदेश ग्रामविकास व जलसंधारण महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)