शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकतेतून घडवा सशक्त भारत-प्रणव मुखर्जी

By admin | Updated: September 16, 2015 02:12 IST

देशात उद्योजकतेचा विकास होण्यासाठी केंद्र सरकारने ‘स्टार्ट अप इंडिया-स्टँड अप इंडिया’ उपक्रम सुरू केला आहे. परंतु तंत्रज्ञान व उपलब्ध मनुष्यबळाच्या योग्य उपयोगाने त्यास यश मिळू शकते.

नागपूर : देशात उद्योजकतेचा विकास होण्यासाठी केंद्र सरकारने ‘स्टार्ट अप इंडिया-स्टँड अप इंडिया’ उपक्रम सुरू केला आहे. परंतु तंत्रज्ञान व उपलब्ध मनुष्यबळाच्या योग्य उपयोगाने त्यास यश मिळू शकते. अभियंत्यांनी ‘पॅकेज’च्या मागे धावण्यापेक्षा उद्योजकतेच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्याचा प्रयत्न करावा. त्यातूनच सशक्त भारताचे निर्माण होईल, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले. मंगळवारी ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १३ व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते प्रेम रमेश औटी याचा सर विश्वेश्वरैय्या पदकाने सन्मान करण्यात आला. राज्यपाल सी. विद्यासागर राव मंचावर उपस्थित होते.शिक्षणाच्या माध्यमातून देशाचा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विकास करणे शक्य आहे. देशातील समस्यांचे त्याद्वारे निराकरण होऊ शकते, असे राष्ट्रपती म्हणाले. जागतिक क्रमवारीत बंगळुरू येथील ‘आयआयएससी’चा (इंडियन इस्टिट्यूट आॅफ सायन्स) १४७ तर ‘आयआयटी-दिल्ली’चा (इंडियन इस्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १७९ वा क्रमांक आहे. ‘आयआयटी-मुंबई’चा २०२ वा क्रमांक असल्याचे सांगत शिक्षणसंस्थांनी दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन मुखर्जी यांनी केले. देशात बुद्धिमत्ते कमतरता नाही, तिचा उपयोग योग्य प्रकारे केल्यास राष्ट्र प्रगतीचे शिखर गाठेल. संशोधनातूनच देशातील शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मौलिक मदत होऊ शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ज्ञानाचे संपत्तीमध्ये रूपांतर करणे गरजेचे आहे आणि देशातील तांत्रिक क्षेत्रातील आयात कमी करण्यासाठी नवे संशोधन व मनुष्यबळाचा प्रभावी उपयोग व्हायला हवा, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)