शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

उद्योजकतेतून घडवा सशक्त भारत-प्रणव मुखर्जी

By admin | Updated: September 16, 2015 02:12 IST

देशात उद्योजकतेचा विकास होण्यासाठी केंद्र सरकारने ‘स्टार्ट अप इंडिया-स्टँड अप इंडिया’ उपक्रम सुरू केला आहे. परंतु तंत्रज्ञान व उपलब्ध मनुष्यबळाच्या योग्य उपयोगाने त्यास यश मिळू शकते.

नागपूर : देशात उद्योजकतेचा विकास होण्यासाठी केंद्र सरकारने ‘स्टार्ट अप इंडिया-स्टँड अप इंडिया’ उपक्रम सुरू केला आहे. परंतु तंत्रज्ञान व उपलब्ध मनुष्यबळाच्या योग्य उपयोगाने त्यास यश मिळू शकते. अभियंत्यांनी ‘पॅकेज’च्या मागे धावण्यापेक्षा उद्योजकतेच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्याचा प्रयत्न करावा. त्यातूनच सशक्त भारताचे निर्माण होईल, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले. मंगळवारी ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १३ व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते प्रेम रमेश औटी याचा सर विश्वेश्वरैय्या पदकाने सन्मान करण्यात आला. राज्यपाल सी. विद्यासागर राव मंचावर उपस्थित होते.शिक्षणाच्या माध्यमातून देशाचा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विकास करणे शक्य आहे. देशातील समस्यांचे त्याद्वारे निराकरण होऊ शकते, असे राष्ट्रपती म्हणाले. जागतिक क्रमवारीत बंगळुरू येथील ‘आयआयएससी’चा (इंडियन इस्टिट्यूट आॅफ सायन्स) १४७ तर ‘आयआयटी-दिल्ली’चा (इंडियन इस्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १७९ वा क्रमांक आहे. ‘आयआयटी-मुंबई’चा २०२ वा क्रमांक असल्याचे सांगत शिक्षणसंस्थांनी दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन मुखर्जी यांनी केले. देशात बुद्धिमत्ते कमतरता नाही, तिचा उपयोग योग्य प्रकारे केल्यास राष्ट्र प्रगतीचे शिखर गाठेल. संशोधनातूनच देशातील शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मौलिक मदत होऊ शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ज्ञानाचे संपत्तीमध्ये रूपांतर करणे गरजेचे आहे आणि देशातील तांत्रिक क्षेत्रातील आयात कमी करण्यासाठी नवे संशोधन व मनुष्यबळाचा प्रभावी उपयोग व्हायला हवा, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)