शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

उद्योजकतेतून घडवा सशक्त भारत-प्रणव मुखर्जी

By admin | Updated: September 16, 2015 02:12 IST

देशात उद्योजकतेचा विकास होण्यासाठी केंद्र सरकारने ‘स्टार्ट अप इंडिया-स्टँड अप इंडिया’ उपक्रम सुरू केला आहे. परंतु तंत्रज्ञान व उपलब्ध मनुष्यबळाच्या योग्य उपयोगाने त्यास यश मिळू शकते.

नागपूर : देशात उद्योजकतेचा विकास होण्यासाठी केंद्र सरकारने ‘स्टार्ट अप इंडिया-स्टँड अप इंडिया’ उपक्रम सुरू केला आहे. परंतु तंत्रज्ञान व उपलब्ध मनुष्यबळाच्या योग्य उपयोगाने त्यास यश मिळू शकते. अभियंत्यांनी ‘पॅकेज’च्या मागे धावण्यापेक्षा उद्योजकतेच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्याचा प्रयत्न करावा. त्यातूनच सशक्त भारताचे निर्माण होईल, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले. मंगळवारी ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १३ व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते प्रेम रमेश औटी याचा सर विश्वेश्वरैय्या पदकाने सन्मान करण्यात आला. राज्यपाल सी. विद्यासागर राव मंचावर उपस्थित होते.शिक्षणाच्या माध्यमातून देशाचा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विकास करणे शक्य आहे. देशातील समस्यांचे त्याद्वारे निराकरण होऊ शकते, असे राष्ट्रपती म्हणाले. जागतिक क्रमवारीत बंगळुरू येथील ‘आयआयएससी’चा (इंडियन इस्टिट्यूट आॅफ सायन्स) १४७ तर ‘आयआयटी-दिल्ली’चा (इंडियन इस्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १७९ वा क्रमांक आहे. ‘आयआयटी-मुंबई’चा २०२ वा क्रमांक असल्याचे सांगत शिक्षणसंस्थांनी दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन मुखर्जी यांनी केले. देशात बुद्धिमत्ते कमतरता नाही, तिचा उपयोग योग्य प्रकारे केल्यास राष्ट्र प्रगतीचे शिखर गाठेल. संशोधनातूनच देशातील शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मौलिक मदत होऊ शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ज्ञानाचे संपत्तीमध्ये रूपांतर करणे गरजेचे आहे आणि देशातील तांत्रिक क्षेत्रातील आयात कमी करण्यासाठी नवे संशोधन व मनुष्यबळाचा प्रभावी उपयोग व्हायला हवा, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)