शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग

By admin | Updated: June 24, 2015 02:25 IST

अकरावी आॅनलाइन प्रक्रियेची पहिली कट आॅफ सोमवारी जाहीर झाली. आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्या

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रक्रियेची पहिली कट आॅफ सोमवारी जाहीर झाली. आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्या कॉलेजच्या लिस्टमध्ये नाव आले आहे, तिथे ५० रुपये भरून प्रवेश कन्फर्म करणे बंधनकारक आहे. त्यासाठी मंगळवारी बहुतांश कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.पहिल्या कट आॅफमध्ये नाव आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश कन्फर्म करण्यासाठी २३, २४ आणि २५ जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेदरम्यानची वेळ देण्यात आली आहे. त्यानुसार मंगळवारी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात गर्दी केली होती. प्रवेश कन्फर्म करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची चौकशी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने अधिक होती. कारण प्रवेश नक्की न करणारा विद्यार्थी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडणार आहे. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या कट आॅफमध्ये त्याला प्रवेश घेता येणार नाही. शिवाय त्या विद्यार्थ्याला शेवटची कट आॅफ लागल्यानंतर होणाऱ्या आॅफलाइन पद्धतीने मिळेल त्या कॉलेजला प्रवेश घ्यावा लागणार आहे. पहिल्या कट आॅफमध्ये सुमारे ९४ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यात ५० हजार ८८८ विद्यार्थ्यांना आवडीचे कॉलेज मिळाले आहे तर उरलेल्या ६ टक्के विद्यार्थ्यांना दुसऱ्या कट आॅफनंतर निश्चित प्रवेश मिळेल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. उरलेले विद्यार्थी आणि पहिल्या यादीत आवडीचे कॉलेज न मिळालेल्या विद्यार्थ्यांसमोर अद्याप दुसऱ्या व तिसऱ्या यादीचा पर्याय खुला आहे. (प्रतिनिधी)