शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

संपूर्ण कर्जमाफीपर्यंत संप सुरुच राहणार,नाहीतर यादवी सुरु होईल:बुधाजीराव मुळीक

By admin | Updated: June 6, 2017 21:02 IST

ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 6 - शेतकरी हा प्रथमच एकवटला असून शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालास उत्पादन खर्चावर आधारित कायद्याने ...

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 6 - शेतकरी हा प्रथमच एकवटला असून शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालास उत्पादन खर्चावर आधारित कायद्याने बाजारभावाची हमी, शेतक-यांना पत्नीसह निवृत्ती वेतन कायदा करुन ते देणे आणि शेती उत्पन्नतील जोखमीचे व्यवस्थापन इर्मा कायदा करणे या मागण्या  मान्य होईपर्यंत शेतक-यांचा संप सुरुच राहणार असल्याचे शेतकरी आंदोलनाच्या सुकाणु समितीचे सदस्य आणि कृषीतज्ञ डॉ़. बुधाजीराव मुळीक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले़ शेतक-यांबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास शहरी, ग्रामीण अशी यादवी निर्माण होण्याची भिती असल्याचा इशारा त्यांनी दिला़.
 
शेतक-यांच्या संपाविषयी बोलताना डॉ़. मुळीक म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पभुधारक शेतक-यांना कर्जमाफी व दुध दराच्या वाढीबाबत घोषणा केली आहे़ मुख्यमंत्र्यांनी केवळ घोषणा न करता तसा अध्यादेश काढावा़ दुधाच्या उत्पादनासाठी किती खर्च येतो, याची सर्वांना माहिती आहे़ एका लिटरसाठी ४० ते ४५ रुपये खर्च येतो़ सध्या त्याला १८ ते २५ रुपये मिळतात, त्यामुळे मुख्यमंत्री कशाची वाट पहात आहेत़ शासनाने शेतक-यांमध्ये भेदाभेद करु नये, जेवढा मोठा शेतकरी तेवढे त्याच्यावरील कर्जही जास्त असते़ बँकांनी एनपीएची तरतुद केलेली असते़ शेतीसाठी त्याचा वापर का करीत नाहीत़. 
 
आज राज्यात कांद्यापेक्षा रद्दीला जास्त भाव आहे़ शासनाने तातडीने आधारभूत किंमतीचा अध्यादेश काढावा़ राज्य शासनाने १९९६ मध्ये उच्च न्यायालयात शेतकरी १२ पिकांमध्ये ३२ ते ५० टक्के तोट्यात शेती करीत असल्याचे सांगितले होते़ कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही, याची आम्हाला कल्पना आहे़ कोणत्याही कारणाने शेतकºयांचे नुकसान झाले तर ते भरुन देणे हे कायद्याने बंधनकारक करणारा इर्मा कायदा करण्याची आवश्यकता आहे़ शेतकरी आता इरेला पटला आहे़ शेतकºयांना मारहाण करण्याचा पोलिसांना काहीही अधिकार नाही़ हा संप दडपण्याचा प्रयत्न केला तर यादवी निर्माण होईल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली़.
 
भूमाता शेतकरी कर्जमुक्ती अभियान सुरु केले असून या शेतकºयांच्या संपाला खासदार उदयनराजे भोसले यांचा पाठिंबा आहे़ लवकरच ते या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होतील, असे डॉ़ मुळीक यांनी सांगितले़.
पाहा व्हिडीओ-
 
 
https://www.dailymotion.com/video/x8451yf