शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिक येणार नव्या स्वरुपात - आंबेडकर

By admin | Updated: April 12, 2017 01:40 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली लढाई आणि उपस्थित केलेले प्रश्न आजही नव्या स्वरुपात तसेच आहेत. एकीकडे रस्त्यावरची लढाई सुरू ठेवतानाच वैचारिक प्रबोधन झाले

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली लढाई आणि उपस्थित केलेले प्रश्न आजही नव्या स्वरुपात तसेच आहेत. एकीकडे रस्त्यावरची लढाई सुरू ठेवतानाच वैचारिक प्रबोधन झाले पाहिजे, या हेतूने बाबासाहेबांनी सुरू केलेले ‘प्रबुद्ध भारत’ हे पाक्षिक पुन्हा नव्या स्वरुपात सुरू करण्यात येत आहे, अशी घोषणा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. महात्मा फुले यांच्या जयंतीचे निमित्त साधून त्यांनी ही घोषणा केली. या वेळी प्रा. प्रतिमा परदेशी, प्रा. अंजली मायदेव, किशोर ढमाले, विलास टेकाळे, संदीप तायडे आदी उपस्थित होते. यावेळी आंबेडकर म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता ही नियतकालिके त्यांच्या संघर्षाच्या विविध टप्प्यांवर सुरू केली. ‘जनता’चे प्रबुद्ध भारतमध्ये परिवर्तन करताना, त्यांनी देशातील नागरिक हे प्रबुद्ध व्हावेत, म्हणजेच लोकशाही मानणारे, व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करणारे, सामाजिक न्यायाची आणि समतेची मूल्ये स्वीकारणारे व्हावेत ही अपेक्षा होती. तेच कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी आज पुन्हा एकदा प्रबुद्ध भारत या नियतकालिकाची गरज निर्माण झाली आहे. बहुजन, दलित, कष्टकरी समुहाचे प्रश्न ऐरणीवर आणणारे व फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचार दृष्टीकोनातून देशविदेशातील घडामोडींची माहिती देणारे माध्यम असले पाहिजे. म्हणूनच पुन्हा नव्या स्वरूपात हे पाक्षिक म्हणून सुरू करत आहोत. तसेच या अंकाची ई-आवृत्तीही सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)