शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांंना धीर द्या - बागडे

By admin | Updated: January 31, 2016 01:40 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची ताकद वारकरी संप्रदायात आहे; भजन-कीर्तनात आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांंना धीर देऊन त्यांना सकारात्मक

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची ताकद वारकरी संप्रदायात आहे; भजन-कीर्तनात आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांंना धीर देऊन त्यांना सकारात्मक दृष्टिकोन दिला पाहिजे, असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शनिवारी केले.वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने गेल्या १८ जानेवारीपासून मराठवाड्यात काढण्यात आलेल्या ज्ञानोबा- तुकोबा आधार दिंडीचा शनिवारी औरंगाबादेत हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते समारोप झाला. यानिमित्त क्रांतीचौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वारकरी दिंडी काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीस शेतकरी आत्महत्यांसंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले. बागडे म्हणाले, मोठा आर्थिक भार आणि न परवडणारी शेती हे प्रमुख कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे आहे. निराश न होता मार्ग काढा, कष्टाशिवाय पर्याय नाही, श्रमाला प्रतिष्ठा आहे, हे या आधार दिंडीतून सांगण्याचे आवाहन बागडे यांनी यावेळी केले. संपूर्ण कर्ज माफी का होत नाही, याचाही ऊहापोह त्यांनी केला. हभप तनपुरे बाबा यांनी सांगितले की, या देशात मोठमोठाली देवस्थाने आहेत, पण एकाही देवस्थानाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेतला नाही. पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिर ट्रस्टने मात्र १०० कोटी रुपये दिले. आत्महत्या केल्यानंतर पैसे वाटण्यापेक्षा आत्महत्या होणारच नाहीत, याची काळजी घेण्याची गरज आहे. असे पैसे वाटणाऱ्यांभोवती मात्र माध्यमांचा गराडा असतो, असे हभप शिवलीकर तात्या म्हणाले. यावेळी श्रीकांत महाराजांनी शपथेचे वाचन केले. (प्रतिनिधी)