शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
4
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
5
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
6
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
7
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
8
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
9
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
10
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
11
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
12
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
13
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
14
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

मतदान यंत्रांची अंत्ययात्रा

By admin | Updated: March 1, 2017 05:14 IST

महापालिकांच्या निवडणुकांत मतदान यंत्रांत(ईव्हीएम) फेरफार करण्यात आल्याचा आरोप भाजपा वगळता सर्वपक्षीयांनी केला आहे.

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांत मतदान यंत्रांत(ईव्हीएम) फेरफार करण्यात आल्याचा आरोप भाजपा वगळता सर्वपक्षीयांनी केला आहे. त्याच्या निषेधार्थ पराभूत उमेदवार आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून मंगळवारी राज्यभरात ठिकठिकाणी मतदान यंत्राच्या अंत्ययात्रा काढण्यात आल्या.पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरापासून मतदान यंत्रांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या वेळी सर्व पराभूत उमेदवारांनी फेरनिवडणुकीची मागणी केली. छत्रपती संभाजी उद्यानापर्यंत मोर्चा नेऊन तिथे मतदान यंत्रांचे दहन करण्यात आले. मोर्चात उपमहापौर मुकारी अलगुडे (काँग्रेस), स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, नीलेश निकम (राष्ट्रवादी काँग्रेस), रूपाली पाटील, किशोर शिंदे (मनसे), दत्ता बहिरट, मिलिंद काची (काँग्रेस), धनंजय जाधव (भाजपा बंडखोर) आदी पराभूत उमेदवार सहभागी झाले होते.तर अकोल्यात यासंदर्भात भाजप वगळता अन्य राजकीय पक्षांसह अपक्ष पराभूत उमेदवारांच्या ‘ईव्हीएम’विरोधी संघर्ष कृती समितीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘ईव्हीएम’ची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. या वेळी समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>‘प्रशासनाचा कारभार पारदर्शीच’निवडणूक यंत्रणेचे सर्व कामकाज पारदर्शीच होते व आहे. पराभूत उमेदवारच मतदान यंत्राबाबत तक्रार व तीसुद्धा निवडणूक निकालानंतर करीत आहेत. आरोप करणारांनी ते सिद्ध करावेत. येत्या दोन दिवसांत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मतदानाची अंतिम आकडेवारी टाकली जाईल, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.