शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

एका कलापर्वाचा अंत..!

By admin | Updated: July 24, 2016 04:47 IST

रझा हे आयुष्यभर विविध शैलीत प्रयोगशील काम करत मापदंड निर्माण करत राहिले. विद्यार्थी दशेत त्यांनी सर्वच विषयांत जे प्राविण्य मिळविले त्याचा अत्यंत प्रभावी असा वापर पुढील आयुष्यात सातत्याने

- सुहास बहुळकर

रझा हे आयुष्यभर विविध शैलीत प्रयोगशील काम करत मापदंड निर्माण करत राहिले. विद्यार्थी दशेत त्यांनी सर्वच विषयांत जे प्राविण्य मिळविले त्याचा अत्यंत प्रभावी असा वापर पुढील आयुष्यात सातत्याने चिंतन आणि प्रयोगशीलतेची जोड देत केला. स्वातंत्र्योत्तर काळातील रझा यांच्या निसर्गचित्रांतून अत्यंत उस्फूर्त, मनस्वी आणि प्रभावी रंगलेपनाचा वापर केलेला आढळतो. मग ती चित्रे काश्मीरसारख्या निसर्गरम्य प्रदेशाची असो वा मुंबईतल्या फोर्ट विभागाची. ज्या सामर्थ्याने ते निसर्ग रंगवित त्या सामर्थ्याने मुंबईतील ब्रिटीशकालीन इमारती, रस्ते, मोटारी, ट्राम आणि माणसंही रंगविली.या दरम्यान, रझा प्रोगेसिव्ह आर्टिस्ट ग्रूपमध्ये सहभागी झाले. त्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यातून प्रयोगशीलतेकडे झालेली वाटचाल व निसर्गाचा वेगळ््या प्रकारेघेतलेला शोध यातून त्यांचे वेगळेपणं सिद्ध करत गेले.१९५०-५३ या काळात रझा यांनी ‘इकोल नॅशनल सुपिरिअर द ब्ल्यू आर्ट’ कला संस्थेत शिक्षण घेतले. १९५१-६० या काळातील त्यांच्या चित्रांत पाश्चात्य कलेतील ‘क्युबिझम’ आणि ‘एक्सप्रेशनिझम’चा प्रभाव दिसतो.१९६१-७० या काळात रझा यांचे रंगांविषयी आकर्षण वाढत गेले. १९७० च्या दरम्यान त्यांच्या चित्रांत भारतीय तांत्रिक प्रतिमा व अक्षरांचा वापर होऊ लागला. त्यातूनच रझा यांची भारतीयत्त्वाचा शोध घेणारी व पुढील काळात नवनवीन विक्रम करणाऱ्या चित्रांकडे वाटचाल सुरु झाली. भौमितिक आकारांच्या वापरातून त्यांची चित्रे निर्माण होऊ लागली. या चित्रांमधून परदेशी राहणाऱ्या रझांची आपल्या मातृभूमीबद्दलची ओढ व्यक्त होत होती. त्यातून ‘नादबिंदू’, ‘जलबिंदू’, ‘शांतीबिंदू’ व ‘ओ माँ’ यांसारखी चित्रे निर्माण झाली.देशातील व परदेशातील सर्वोच्च सन्मान मिळालेल्या रझांची सर्वच महत्त्वांच्या कलादालनात झालेल्या प्रदर्शनांमधून रझा हे नाव जगभर पोहोचले.२०१० मध्ये रझा पॅरिसमधून भारतात परतले. रझा फाउंडेशनच्या रुपाने त्यांनी अनेक तरुण चित्रकारांना प्रोत्साहन दिले. मध्यप्रदेश शासनाचा ‘कालिदास’ पुरस्कार मिळवणाऱ्या रझा यांना पद्मश्री व पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारही मिळाले होते. एवढचे नव्हे तर १९५६ मध्ये पॅरिसचे ‘प्री द ला क्रिटीक’ हा पुरस्कार मिळवणारे रझा हे स्वातंत्र्योत्तर काळातील नवनवोन्मेष व प्रयोगशील चित्रनिर्मिती करणाऱ्या चित्रकारांचे प्रतिनिधीत्त्व करणारे महत्त्वाचे चित्रकार होते.अखेरपर्यंत ते कार्यरत होते. त्यांच्या रुपाने एक अत्यंत महत्त्वाचा आधुनिक काळातील भारतीय कलावंत आज आपल्यातून वृद्धापकाळात निघून गेला आहे. परंतु, त्यांच्या कला निर्मितीतील प्रभुत्त्व, प्रयोगशीलता, चैतन्य आणि विलक्षण आविष्कार कलारसिकांना कायमच आनंद देतील आणि त्यांचे जीवन हे तरुण कलावंतांसाठी नेहमीच प्रेरणादायक असेल.