शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

एका कलापर्वाचा अंत..!

By admin | Updated: July 24, 2016 04:47 IST

रझा हे आयुष्यभर विविध शैलीत प्रयोगशील काम करत मापदंड निर्माण करत राहिले. विद्यार्थी दशेत त्यांनी सर्वच विषयांत जे प्राविण्य मिळविले त्याचा अत्यंत प्रभावी असा वापर पुढील आयुष्यात सातत्याने

- सुहास बहुळकर

रझा हे आयुष्यभर विविध शैलीत प्रयोगशील काम करत मापदंड निर्माण करत राहिले. विद्यार्थी दशेत त्यांनी सर्वच विषयांत जे प्राविण्य मिळविले त्याचा अत्यंत प्रभावी असा वापर पुढील आयुष्यात सातत्याने चिंतन आणि प्रयोगशीलतेची जोड देत केला. स्वातंत्र्योत्तर काळातील रझा यांच्या निसर्गचित्रांतून अत्यंत उस्फूर्त, मनस्वी आणि प्रभावी रंगलेपनाचा वापर केलेला आढळतो. मग ती चित्रे काश्मीरसारख्या निसर्गरम्य प्रदेशाची असो वा मुंबईतल्या फोर्ट विभागाची. ज्या सामर्थ्याने ते निसर्ग रंगवित त्या सामर्थ्याने मुंबईतील ब्रिटीशकालीन इमारती, रस्ते, मोटारी, ट्राम आणि माणसंही रंगविली.या दरम्यान, रझा प्रोगेसिव्ह आर्टिस्ट ग्रूपमध्ये सहभागी झाले. त्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यातून प्रयोगशीलतेकडे झालेली वाटचाल व निसर्गाचा वेगळ््या प्रकारेघेतलेला शोध यातून त्यांचे वेगळेपणं सिद्ध करत गेले.१९५०-५३ या काळात रझा यांनी ‘इकोल नॅशनल सुपिरिअर द ब्ल्यू आर्ट’ कला संस्थेत शिक्षण घेतले. १९५१-६० या काळातील त्यांच्या चित्रांत पाश्चात्य कलेतील ‘क्युबिझम’ आणि ‘एक्सप्रेशनिझम’चा प्रभाव दिसतो.१९६१-७० या काळात रझा यांचे रंगांविषयी आकर्षण वाढत गेले. १९७० च्या दरम्यान त्यांच्या चित्रांत भारतीय तांत्रिक प्रतिमा व अक्षरांचा वापर होऊ लागला. त्यातूनच रझा यांची भारतीयत्त्वाचा शोध घेणारी व पुढील काळात नवनवीन विक्रम करणाऱ्या चित्रांकडे वाटचाल सुरु झाली. भौमितिक आकारांच्या वापरातून त्यांची चित्रे निर्माण होऊ लागली. या चित्रांमधून परदेशी राहणाऱ्या रझांची आपल्या मातृभूमीबद्दलची ओढ व्यक्त होत होती. त्यातून ‘नादबिंदू’, ‘जलबिंदू’, ‘शांतीबिंदू’ व ‘ओ माँ’ यांसारखी चित्रे निर्माण झाली.देशातील व परदेशातील सर्वोच्च सन्मान मिळालेल्या रझांची सर्वच महत्त्वांच्या कलादालनात झालेल्या प्रदर्शनांमधून रझा हे नाव जगभर पोहोचले.२०१० मध्ये रझा पॅरिसमधून भारतात परतले. रझा फाउंडेशनच्या रुपाने त्यांनी अनेक तरुण चित्रकारांना प्रोत्साहन दिले. मध्यप्रदेश शासनाचा ‘कालिदास’ पुरस्कार मिळवणाऱ्या रझा यांना पद्मश्री व पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारही मिळाले होते. एवढचे नव्हे तर १९५६ मध्ये पॅरिसचे ‘प्री द ला क्रिटीक’ हा पुरस्कार मिळवणारे रझा हे स्वातंत्र्योत्तर काळातील नवनवोन्मेष व प्रयोगशील चित्रनिर्मिती करणाऱ्या चित्रकारांचे प्रतिनिधीत्त्व करणारे महत्त्वाचे चित्रकार होते.अखेरपर्यंत ते कार्यरत होते. त्यांच्या रुपाने एक अत्यंत महत्त्वाचा आधुनिक काळातील भारतीय कलावंत आज आपल्यातून वृद्धापकाळात निघून गेला आहे. परंतु, त्यांच्या कला निर्मितीतील प्रभुत्त्व, प्रयोगशीलता, चैतन्य आणि विलक्षण आविष्कार कलारसिकांना कायमच आनंद देतील आणि त्यांचे जीवन हे तरुण कलावंतांसाठी नेहमीच प्रेरणादायक असेल.