शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शिवसेनेच्याच हाती युती सरकारचा शेवट

By admin | Updated: July 12, 2015 04:27 IST

राज्यात सुमारे १५ वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँंग्रेसमधील मतभेद पहिल्या पाच वर्षात कधीच चव्हाट्यावर आले नाहीत. मात्र अवघ्या आठ महिन्यांपूर्वी राज्यात

- अजित पवारांचा टोला

पुणे : राज्यात सुमारे १५ वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँंग्रेसमधील मतभेद पहिल्या पाच वर्षात कधीच चव्हाट्यावर आले नाहीत. मात्र अवघ्या आठ महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेत असलेल्या युतीच्या सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याने शिवसेनेच्या नेतृत्वाकडून वारंवार सरकारवर टीका केली जात आहे. ज्या दिवशी सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे वेगळा निर्णय घेतील, त्यांच्या मनात वेगळी भावना येईल, तो दिवस या सरकारचा शेवटचा दिवस असेल, असे भाकीत राष्ट्रवादीचे विधिमंडळातील पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी येथे केले.एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी असेही सांगितले की, सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात महत्त्वाच्या प्रश्नांवरून सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र रणनीती आखेल. पवार म्हणाले, की आमच्यातही मतभेद होते, मात्र ते नागरिकांच्या प्रश्नावर होते. अखेरच्या पाच वर्षांत काही मतभेद झाले, तरी राज्याचा विकास आणि नागरिकांचे हित जपण्याचा प्रयत्न कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला. नव्या सरकारमधील मतभेद एवढ्यातच चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेनेच्या मुखपत्रातूनच सरकारच्या अनेक निर्णयांवर जाहीर टीका केली जात आहे. त्यामुळे या सरकारचे भवितव्य उद्धव ठाकरेंच्या एका निर्णयावर अवलंबून असेल.सरकारला एकत्रितपणे घेरणार सात महिन्यांत शासनाने घेतलेल्या निर्णयावर तसेच राज्यातील ऊस, कापूस, धान्य, दूध उत्पादक शेतकरी सरकारच्या आर्थिक मदतीविना हवालदिल झाला आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली असून, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या प्रत्येक गोष्टीचा हिशोब सरकारला विचारला जाईल. त्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस समविचारी असल्याने पुन्हा एकत्र येऊन सरकारला घेरणार असल्याचे पवार म्हणाले. यासाठी रविवारी मुंबईत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. अधिवेशनातील विरोधकांची भूमिका ठरविली जाईल असेही त्यांनी सष्ट केले. स्वतंत्र सोशल मीडिया सेलराष्ट्रवादीकडूनही सोशल मीडियावर सक्रिय होण्यासाठी स्वतंत्र सेल तयार केला असून, त्याची जबाबदारी इंजिनीयर असलेले माजी खासदार आनंद परांजपे यांच्याकडे देण्यात आली आहे. ते खरोखरच इंजिनीयर झालेले आहेत, अशा शब्दांत पवार यांनी नाव न घेता शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची खिल्ली उडविली. आपण स्वत: लवकरच सोशल मीडियावर सक्रिय होणार असल्याचेही ते म्हणाले.