शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

शिवसेनेच्याच हाती युती सरकारचा शेवट

By admin | Updated: July 12, 2015 04:27 IST

राज्यात सुमारे १५ वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँंग्रेसमधील मतभेद पहिल्या पाच वर्षात कधीच चव्हाट्यावर आले नाहीत. मात्र अवघ्या आठ महिन्यांपूर्वी राज्यात

- अजित पवारांचा टोला

पुणे : राज्यात सुमारे १५ वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँंग्रेसमधील मतभेद पहिल्या पाच वर्षात कधीच चव्हाट्यावर आले नाहीत. मात्र अवघ्या आठ महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेत असलेल्या युतीच्या सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याने शिवसेनेच्या नेतृत्वाकडून वारंवार सरकारवर टीका केली जात आहे. ज्या दिवशी सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे वेगळा निर्णय घेतील, त्यांच्या मनात वेगळी भावना येईल, तो दिवस या सरकारचा शेवटचा दिवस असेल, असे भाकीत राष्ट्रवादीचे विधिमंडळातील पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी येथे केले.एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी असेही सांगितले की, सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात महत्त्वाच्या प्रश्नांवरून सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र रणनीती आखेल. पवार म्हणाले, की आमच्यातही मतभेद होते, मात्र ते नागरिकांच्या प्रश्नावर होते. अखेरच्या पाच वर्षांत काही मतभेद झाले, तरी राज्याचा विकास आणि नागरिकांचे हित जपण्याचा प्रयत्न कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला. नव्या सरकारमधील मतभेद एवढ्यातच चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेनेच्या मुखपत्रातूनच सरकारच्या अनेक निर्णयांवर जाहीर टीका केली जात आहे. त्यामुळे या सरकारचे भवितव्य उद्धव ठाकरेंच्या एका निर्णयावर अवलंबून असेल.सरकारला एकत्रितपणे घेरणार सात महिन्यांत शासनाने घेतलेल्या निर्णयावर तसेच राज्यातील ऊस, कापूस, धान्य, दूध उत्पादक शेतकरी सरकारच्या आर्थिक मदतीविना हवालदिल झाला आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली असून, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या प्रत्येक गोष्टीचा हिशोब सरकारला विचारला जाईल. त्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस समविचारी असल्याने पुन्हा एकत्र येऊन सरकारला घेरणार असल्याचे पवार म्हणाले. यासाठी रविवारी मुंबईत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. अधिवेशनातील विरोधकांची भूमिका ठरविली जाईल असेही त्यांनी सष्ट केले. स्वतंत्र सोशल मीडिया सेलराष्ट्रवादीकडूनही सोशल मीडियावर सक्रिय होण्यासाठी स्वतंत्र सेल तयार केला असून, त्याची जबाबदारी इंजिनीयर असलेले माजी खासदार आनंद परांजपे यांच्याकडे देण्यात आली आहे. ते खरोखरच इंजिनीयर झालेले आहेत, अशा शब्दांत पवार यांनी नाव न घेता शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची खिल्ली उडविली. आपण स्वत: लवकरच सोशल मीडियावर सक्रिय होणार असल्याचेही ते म्हणाले.