शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

शिवसेनेच्याच हाती युती सरकारचा शेवट

By admin | Updated: July 12, 2015 04:27 IST

राज्यात सुमारे १५ वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँंग्रेसमधील मतभेद पहिल्या पाच वर्षात कधीच चव्हाट्यावर आले नाहीत. मात्र अवघ्या आठ महिन्यांपूर्वी राज्यात

- अजित पवारांचा टोला

पुणे : राज्यात सुमारे १५ वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँंग्रेसमधील मतभेद पहिल्या पाच वर्षात कधीच चव्हाट्यावर आले नाहीत. मात्र अवघ्या आठ महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेत असलेल्या युतीच्या सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याने शिवसेनेच्या नेतृत्वाकडून वारंवार सरकारवर टीका केली जात आहे. ज्या दिवशी सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे वेगळा निर्णय घेतील, त्यांच्या मनात वेगळी भावना येईल, तो दिवस या सरकारचा शेवटचा दिवस असेल, असे भाकीत राष्ट्रवादीचे विधिमंडळातील पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी येथे केले.एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी असेही सांगितले की, सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात महत्त्वाच्या प्रश्नांवरून सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र रणनीती आखेल. पवार म्हणाले, की आमच्यातही मतभेद होते, मात्र ते नागरिकांच्या प्रश्नावर होते. अखेरच्या पाच वर्षांत काही मतभेद झाले, तरी राज्याचा विकास आणि नागरिकांचे हित जपण्याचा प्रयत्न कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला. नव्या सरकारमधील मतभेद एवढ्यातच चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेनेच्या मुखपत्रातूनच सरकारच्या अनेक निर्णयांवर जाहीर टीका केली जात आहे. त्यामुळे या सरकारचे भवितव्य उद्धव ठाकरेंच्या एका निर्णयावर अवलंबून असेल.सरकारला एकत्रितपणे घेरणार सात महिन्यांत शासनाने घेतलेल्या निर्णयावर तसेच राज्यातील ऊस, कापूस, धान्य, दूध उत्पादक शेतकरी सरकारच्या आर्थिक मदतीविना हवालदिल झाला आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली असून, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या प्रत्येक गोष्टीचा हिशोब सरकारला विचारला जाईल. त्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस समविचारी असल्याने पुन्हा एकत्र येऊन सरकारला घेरणार असल्याचे पवार म्हणाले. यासाठी रविवारी मुंबईत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. अधिवेशनातील विरोधकांची भूमिका ठरविली जाईल असेही त्यांनी सष्ट केले. स्वतंत्र सोशल मीडिया सेलराष्ट्रवादीकडूनही सोशल मीडियावर सक्रिय होण्यासाठी स्वतंत्र सेल तयार केला असून, त्याची जबाबदारी इंजिनीयर असलेले माजी खासदार आनंद परांजपे यांच्याकडे देण्यात आली आहे. ते खरोखरच इंजिनीयर झालेले आहेत, अशा शब्दांत पवार यांनी नाव न घेता शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची खिल्ली उडविली. आपण स्वत: लवकरच सोशल मीडियावर सक्रिय होणार असल्याचेही ते म्हणाले.