शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

अतिक्रमणे जमीनदोस्त ?

By admin | Updated: July 19, 2016 04:21 IST

अतिक्रमणाच्या विळख्यात रखडलेला ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाचा अखेर दोन दशकांनंतर कृती आराखडा तयार झाला आहे़

मुंबई: अतिक्रमणाच्या विळख्यात रखडलेला ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाचा अखेर दोन दशकांनंतर कृती आराखडा तयार झाला आहे़ त्यानुसार नदी नाल्यांच्या रुंदीकरणात अडथळा ठरलेले २७ हजार २१३ अतिक्रमणे पावसाळ्यानंतर हटविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने आज घेतला़ त्यामुळे लवकरच नदी नाल्यांचा श्वास मोकळा होणार आहे़१९९३ मध्ये ब्रिमस्टोवॅड प्रकल्प तयार झाला़ मात्र २००५ मध्ये मुंबईत आलेल्या पुरानंतर ब्रिमस्टोवॅडची वीट रचली गेली़ या अंतर्गत गटार झालेल्या नदी आणि नाल्यांचे रुंदीकरण, पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढविणे आदी कामे हाती घेण्यात आली़ मात्र नदी नाल्यांमध्ये मधल्या काही काळात बेकायदा झोपड्या उभ्या राहिल्या़ या अतिक्रमणाचा मोठा फटका नाले रुंदीकरण प्रकल्पाला बसला़दरवर्षी पावसाळ्यात सखल भाग पाण्याखाली जात असून पालिकेला टीकेचे धनी व्हावे लागत आहे़ त्यामुळे या प्रकल्पाला गती देण्यासाठी आयुक्त अजय मेहता यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली़ अतिक्रमणे दूर करण्याचा कृती आराखडा या बैठकीत अधिकाऱ्यांनी सादर केला़ त्यानुसार १ आॅक्टोबरपासून नदी नाल्यांमधील बेकायदा बांधकाम पाडण्याची कार्यवाही सुरु होणार आहे़ (प्रतिनिधी)>अशी आहेत अतिक्रमणेप्रथम प्राधान्य देण्यात आलेले ६१़३१ कि़मी़ नाल्यांमध्ये १९़७० कि़मी़ नाले अतिक्रमित आहेत़ यामध्ये ११ हजार १४३ झोपड्यांचा समावेश आहे़ शहरात ६५१, पश्चिम उपनगरे सहा हजार २६१ आणि पूर्व उपनगरे चार हजार २३१ असे एकूण ११ हजार १४३ अतिक्रमण आहेत़बिगर ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांर्गत असलेले प्राधान्याने हाती घेण्यात आलेल्या ७०़४३ कि़मी़ नाल्यांपैकी १९़६६ कि़मी़ नाल्यांचा भाग अतिक्रमित आहे़ त्यावर सहा हजार ३२ अतिक्रमणे आहेत़ यामध्ये पश्चिम उपनगरामध्ये तीन हजार ३१८ आणि पूर्व उपनगरामध्ये एक हजार ५६० आणि मिठी नदी येथे एक हजार १५४ असे एकूण सहा हजार ३२ अतिक्रमण आहेत़असा आहे कृती आराखडापात्र झोपड्यांना सप्टेंबर अखेरीपर्यंत पर्यायी जागा देण्याबाबत निर्णय होणार आहे़प्रथम प्राधान्य देण्यात आलेल्या नाल्यांच्या कामांचे कार्यादेश सप्टेंबर २०१६ पर्यंत दिले जाणार आहेत़१ आॅक्टोबरपासून अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात होणार आहे़