शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
4
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
5
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
6
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
7
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
8
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
9
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
10
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
11
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
12
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
13
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
14
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
15
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
16
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
17
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
18
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
19
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
20
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक परिवर्तनाचा वेग वाढवा, संघाच्या बैठकीत मोहन भागवत यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 22:58 IST

संघविचारांच्या कार्याचा प्रभाव सर्वदूर वाढत असून संघाकडून समाजाची अपेक्षा वाढत आहे. त्यामुळे सामाजिक परिवर्तनाचा वेग वाढविण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी कार्यकर्त्यांना केले.

ठळक मुद्देकोथरूडमधील राज्यस्तरीय समन्वय बैठकीचा समारोपबैठकीत संघकामाचा गावपातळीपर्यंतचा विस्तार, सेवाकार्यांचा आढावा

पुणे : संघविचारांच्या कार्याचा प्रभाव सर्वदूर वाढत असून त्यातून झालेले परिवर्तनही दिसत आहे. संघाकडून समाजाची अपेक्षा वाढत आहे. त्यामुळे सामाजिक परिवर्तनाचा वेग वाढविण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी कार्यकर्त्यांना केले.

महाराष्ट्रातील संघ परिवारातील विविध संस्था व संघटनांच्या कामांचा आढावा, संघटनात्मक वाढ, सेवा कार्यांची स्थिती, पुढील संकल्प याविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राज्यस्तरीय समन्वय बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

कोथरूडमधील बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, संघाचे अखिल भारतीय अधिकारी संपर्क प्रमुख प्रा. अनिरूद्ध देशपांडे, कार्यकारिणी सदस्य मधुभाई कुलकर्णी, डॉ. अशोक कुकडे, कुटुंबप्रबोधन प्रमुख रवींद्र जोशी, पश्चिम क्षेत्र संघचालक जयंतीभाई भाडेसिया, क्षेत्र कार्यवाह सुनीलभाई मेहता, विज्ञानभारती राष्ट्रीय संघटनमंत्री जयंतराव सहस्त्रबुद्धे, भारतीय मजदूर संघाचे उदयराव पटवर्धन, राष्ट्र सेविका समितीच्या सुनीला सोवनी, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, अधिवक्ता परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अ‍ॅड. दादासाहेब बेंद्रे आदी बैठकीला उपस्थित होते.

भागवत म्हणाले, संघाकडून समाजाच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे राष्ट्रीय विचारांच्या सर्व संघटनांची जबाबदारीही वाढली आहे. आपल्या कुटुंबात व समाजामध्ये कुटुंबप्रबोधनाद्वारे मूलभूत राष्ट्र भावना वाढीस लागेल असे संस्कार होण्याची गरज आहे.

संघकामाचा गावपातळीपर्यंतचा विस्तार, सेवाकार्यांचा आढावा, यातून समाजातील अंत्योदयाच्या कल्याणाचा विचार करताना सामना करावा लागत असलेली आव्हाने, त्यावरील उपाय तसेच पुढील वाटचालीतील संकल्प या व अशा अनेकविध पैलूंवर बैठकीत विस्ताराने चर्चा करण्यात आली, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह विनायकराव थोरात यांनी दिली. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड