शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सामाजिक परिवर्तनाचा वेग वाढवा, संघाच्या बैठकीत मोहन भागवत यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 22:58 IST

संघविचारांच्या कार्याचा प्रभाव सर्वदूर वाढत असून संघाकडून समाजाची अपेक्षा वाढत आहे. त्यामुळे सामाजिक परिवर्तनाचा वेग वाढविण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी कार्यकर्त्यांना केले.

ठळक मुद्देकोथरूडमधील राज्यस्तरीय समन्वय बैठकीचा समारोपबैठकीत संघकामाचा गावपातळीपर्यंतचा विस्तार, सेवाकार्यांचा आढावा

पुणे : संघविचारांच्या कार्याचा प्रभाव सर्वदूर वाढत असून त्यातून झालेले परिवर्तनही दिसत आहे. संघाकडून समाजाची अपेक्षा वाढत आहे. त्यामुळे सामाजिक परिवर्तनाचा वेग वाढविण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी कार्यकर्त्यांना केले.

महाराष्ट्रातील संघ परिवारातील विविध संस्था व संघटनांच्या कामांचा आढावा, संघटनात्मक वाढ, सेवा कार्यांची स्थिती, पुढील संकल्प याविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राज्यस्तरीय समन्वय बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

कोथरूडमधील बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, संघाचे अखिल भारतीय अधिकारी संपर्क प्रमुख प्रा. अनिरूद्ध देशपांडे, कार्यकारिणी सदस्य मधुभाई कुलकर्णी, डॉ. अशोक कुकडे, कुटुंबप्रबोधन प्रमुख रवींद्र जोशी, पश्चिम क्षेत्र संघचालक जयंतीभाई भाडेसिया, क्षेत्र कार्यवाह सुनीलभाई मेहता, विज्ञानभारती राष्ट्रीय संघटनमंत्री जयंतराव सहस्त्रबुद्धे, भारतीय मजदूर संघाचे उदयराव पटवर्धन, राष्ट्र सेविका समितीच्या सुनीला सोवनी, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, अधिवक्ता परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अ‍ॅड. दादासाहेब बेंद्रे आदी बैठकीला उपस्थित होते.

भागवत म्हणाले, संघाकडून समाजाच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे राष्ट्रीय विचारांच्या सर्व संघटनांची जबाबदारीही वाढली आहे. आपल्या कुटुंबात व समाजामध्ये कुटुंबप्रबोधनाद्वारे मूलभूत राष्ट्र भावना वाढीस लागेल असे संस्कार होण्याची गरज आहे.

संघकामाचा गावपातळीपर्यंतचा विस्तार, सेवाकार्यांचा आढावा, यातून समाजातील अंत्योदयाच्या कल्याणाचा विचार करताना सामना करावा लागत असलेली आव्हाने, त्यावरील उपाय तसेच पुढील वाटचालीतील संकल्प या व अशा अनेकविध पैलूंवर बैठकीत विस्ताराने चर्चा करण्यात आली, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह विनायकराव थोरात यांनी दिली. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड