शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

‘स्मार्ट गाव’साठी ग्रामपंचायत सक्षम करणार

By admin | Updated: May 25, 2015 00:44 IST

पंकजा मुंडे : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपक्रम राज्यात आदर्शवत; २४ व्या ‘पावनखिंड’ मासिकाचे प्रकाशन

कोल्हापूर : शहराचे वैभव वाढविण्यासाठी ‘स्मार्ट गाव ’ स्वच्छता अभियान राज्यभर राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपक्रम राज्यात आदर्शवत आहेत. त्याचा इतर जिल्हा परिषदांनी आदर्श घ्यावा, असे गौरवोद्गार ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काढले. जिल्हा परिषदेच्या शाहू सभागृहात रविवारी ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियान आढावा बैठकीत मंत्री मुंडे बोलत होत्या. अध्यक्षा विमल पाटील व उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार व उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी योजनांचे सादरीकरण केले. त्यानंतर योजनांची माहिती देणाऱ्या २४ व्या ‘पावनखिंड’ मासिकाचे प्रकाशन पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. मुंडे म्हणाल्या, सामान्य माणसांचे जीवन सुखकर कसे करता येईल, त्यासाठी विविध योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रशासन व लोकसहभाग यांच्यात समन्वय असेल तर योजना यशस्वी होते. प्रत्येक योजना यशस्वी करण्याचे नियोजन प्रत्येकाला जमतेच असे नाही. ते तुम्ही यशस्वी करून दाखविले आहे. पुरोगामी महाराष्ट्राला चांगल्या आणि सकारात्मक विचारांची गरज आहे. यापूर्वी राज्यातील पाणीपुरवठा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने काही योजना रखडल्या आहेत. त्या मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. काही विभागांमध्ये अधिकारीच नसल्याने योजना पुढे सरकत नाहीत. त्यासाठी राज्यात सर्वच जिल्हा परिषदांतील रिक्त जागा त्वरित भरल्या जातील. त्याचबरोबर कृषी, ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून विकासात्मक निर्णय घेतले जातील. याप्रसंगी आरोग्य व बांधकाम सभापती सीमा पाटील, महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, शिक्षण सभापती अभिजित तायशेट्टे, समाजकल्याण सभापती किरण कांबळे यांच्यासह सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी).पाण्याचे नियोजन कराअडचणी खूप असतील; परंतु धनसमृद्धी असलेली ही जिल्हा परिषद आहे. तुम्ही सर्वच उपक्रमांत चांगले काम केले आहे. मी तुम्हाला काय देऊ शकते? तुमच्याकडूनच घेतले पाहिजे. कोल्हापूरमध्ये संपन्नता आहे. येथे ऊस व दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. पाणी मुबलक असल्याने त्याचा अतिवापर केला जातो. त्याचा परिणाम पिकावर होतो. पाणी हे जीवन आहे. तुमच्या पाण्याचे नियोजन तुम्ही करा, तरच जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरेल. आवाज द्या, मी तुमच्यासाठी आहे! राज्यात मी सर्वत्र फिरले; पण कोल्हापूर ही एकमेव जिल्हा परिषद आहे, ज्यांच्याकडून मला काही शिकायला मिळाले. जनतेच्या प्रश्नांसाठी फक्त आवाज द्या, मी तुमच्यासाठी आहे. तुमच्याकडून प्रेरणा घेऊन जातेय, असे भावनिक आवाहन मुंडे यांनी यावेळी केले. प्रलंबित विविध योजना मार्गी लावाव्यात रिक्त पदे त्वरित भरावीतजिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचा चौथा मजला बांधण्यासाठी चार कोटी ३७ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करावी.ग्रामविकास विभागासाठी आयुक्तालय सुरू करावे.निवासी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद निर्माण करावे.प्रलंबित प्रश्नांसंदर्भात विशेष बैठक ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांनी जिल्हा परिषदेच्या प्रलंबित प्रश्नांचा पाढा वाचला. यावेळी त्यांनी ‘ताई, तुम्ही आमच्या पालक आहात; त्यामुळे आमच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण कराव्यात,’ अशी मागणी केली. त्यावर मुंडे यांनी ‘तुमच्या प्रश्नांची मला जाणीव आहे. त्यासाठी लवकरच इतर खात्यांचे मंत्री, प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांची विशेष बैठक मुंबईत बोलावून प्रश्न मार्गी लावले जातील,’ अशी ग्वाही देताच सदस्यांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात आभार मानले.