शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

‘स्मार्ट गाव’साठी ग्रामपंचायत सक्षम करणार

By admin | Updated: May 25, 2015 00:44 IST

पंकजा मुंडे : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपक्रम राज्यात आदर्शवत; २४ व्या ‘पावनखिंड’ मासिकाचे प्रकाशन

कोल्हापूर : शहराचे वैभव वाढविण्यासाठी ‘स्मार्ट गाव ’ स्वच्छता अभियान राज्यभर राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपक्रम राज्यात आदर्शवत आहेत. त्याचा इतर जिल्हा परिषदांनी आदर्श घ्यावा, असे गौरवोद्गार ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काढले. जिल्हा परिषदेच्या शाहू सभागृहात रविवारी ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियान आढावा बैठकीत मंत्री मुंडे बोलत होत्या. अध्यक्षा विमल पाटील व उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार व उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी योजनांचे सादरीकरण केले. त्यानंतर योजनांची माहिती देणाऱ्या २४ व्या ‘पावनखिंड’ मासिकाचे प्रकाशन पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. मुंडे म्हणाल्या, सामान्य माणसांचे जीवन सुखकर कसे करता येईल, त्यासाठी विविध योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रशासन व लोकसहभाग यांच्यात समन्वय असेल तर योजना यशस्वी होते. प्रत्येक योजना यशस्वी करण्याचे नियोजन प्रत्येकाला जमतेच असे नाही. ते तुम्ही यशस्वी करून दाखविले आहे. पुरोगामी महाराष्ट्राला चांगल्या आणि सकारात्मक विचारांची गरज आहे. यापूर्वी राज्यातील पाणीपुरवठा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने काही योजना रखडल्या आहेत. त्या मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. काही विभागांमध्ये अधिकारीच नसल्याने योजना पुढे सरकत नाहीत. त्यासाठी राज्यात सर्वच जिल्हा परिषदांतील रिक्त जागा त्वरित भरल्या जातील. त्याचबरोबर कृषी, ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून विकासात्मक निर्णय घेतले जातील. याप्रसंगी आरोग्य व बांधकाम सभापती सीमा पाटील, महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, शिक्षण सभापती अभिजित तायशेट्टे, समाजकल्याण सभापती किरण कांबळे यांच्यासह सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी).पाण्याचे नियोजन कराअडचणी खूप असतील; परंतु धनसमृद्धी असलेली ही जिल्हा परिषद आहे. तुम्ही सर्वच उपक्रमांत चांगले काम केले आहे. मी तुम्हाला काय देऊ शकते? तुमच्याकडूनच घेतले पाहिजे. कोल्हापूरमध्ये संपन्नता आहे. येथे ऊस व दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. पाणी मुबलक असल्याने त्याचा अतिवापर केला जातो. त्याचा परिणाम पिकावर होतो. पाणी हे जीवन आहे. तुमच्या पाण्याचे नियोजन तुम्ही करा, तरच जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरेल. आवाज द्या, मी तुमच्यासाठी आहे! राज्यात मी सर्वत्र फिरले; पण कोल्हापूर ही एकमेव जिल्हा परिषद आहे, ज्यांच्याकडून मला काही शिकायला मिळाले. जनतेच्या प्रश्नांसाठी फक्त आवाज द्या, मी तुमच्यासाठी आहे. तुमच्याकडून प्रेरणा घेऊन जातेय, असे भावनिक आवाहन मुंडे यांनी यावेळी केले. प्रलंबित विविध योजना मार्गी लावाव्यात रिक्त पदे त्वरित भरावीतजिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचा चौथा मजला बांधण्यासाठी चार कोटी ३७ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करावी.ग्रामविकास विभागासाठी आयुक्तालय सुरू करावे.निवासी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद निर्माण करावे.प्रलंबित प्रश्नांसंदर्भात विशेष बैठक ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांनी जिल्हा परिषदेच्या प्रलंबित प्रश्नांचा पाढा वाचला. यावेळी त्यांनी ‘ताई, तुम्ही आमच्या पालक आहात; त्यामुळे आमच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण कराव्यात,’ अशी मागणी केली. त्यावर मुंडे यांनी ‘तुमच्या प्रश्नांची मला जाणीव आहे. त्यासाठी लवकरच इतर खात्यांचे मंत्री, प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांची विशेष बैठक मुंबईत बोलावून प्रश्न मार्गी लावले जातील,’ अशी ग्वाही देताच सदस्यांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात आभार मानले.