शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

उधाणाचे पाणी दिवेआगरात घुसण्याची भीती

By admin | Updated: August 4, 2016 02:23 IST

संपूर्ण रायगड जिल्ह्यात गेले तीन दिवस सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे समुद्राला उधाण आले

दांडगुरी : संपूर्ण रायगड जिल्ह्यात गेले तीन दिवस सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे समुद्राला उधाण आले असून श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर या गावात पाणी शिरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उधाणाचे पाणी अंदाजे दोनशे फुटापर्यंत गावात आले असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. सरकारने धूप प्रतिबंध बंधारा बांधण्यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर केला असून त्यातील अडीच कोटींचा पहिला निधी देण्याची घोषणा देखील जाहीर झाली परंतु सीआरझेडचा विषय प्रलंबित राहिल्याने घोषणा आणि निधी जैसे थे ही स्थिती पहावयास मिळत आहे तर दिवेआगर गाव भलेमोठे असले तरी मात्र ज्या बाजूने समुद्राच्या उधाणाचे पाणी गावात शिरणार आहे तो दिवेआगर मधील गावठाण अंदाजे १९६८ साली शासनाने गाव विस्ताराच्या दृष्टिकोनातून हे गावठाण या ठिकाणी घोषित करून येथील स्थानिक असून बेघर असलेल्यांना या जागेवर विस्तार करण्यासाठी हे प्लॉट बेघर असलेल्या भूमिपुत्रांना या गावठाणामध्ये घर बांधण्यासाठी देण्यात आले परंतु आता या ठिकाणी समुद्राचे पाणी गावात घुसण्याची दाट शक्यता असून येथील नागरिक भयभीत झाले आहेत. शासनाने वेळीच दखल घेऊन धूपप्रतिबंधक बंधारा वेळीच बांधला असता तर ग्रामस्थांच्या मनात आलेली भीती निर्माण झाली नसती. रायगडमध्ये होत असलेल्या पुराची दखल घेत शासनाने वेळीच या ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा बांधून भयभीत असलेल्या ग्रामस्थांची मनात असलेल्या भीती दूर करून शासनाने या दिवेआगर गावाकडे प्रामुख्याने लक्ष देऊन ग्रामस्थांना मदतीचा हात देण्याची मागणी जोर धरत आहे.>धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने समुद्राच्या उधाणाचे पाणी दिवेआगर गावात घुसण्याची दाट शक्यता,अंदाजे दोनशे फूट समुद्राचे पाणी बाहेर आल्याने केतकीची झाडे सुध्दा कोलमडून पडली आहेत.