शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सक्षमीकरणातून उद्योजकतेकडे! तिरोड्यातील महिला चालवताहेत ग्रामीण अर्थव्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 12:11 IST

अदानी फाऊंडेशनच्या विविध अभियानांमुळे महाराष्ट्राच्या तिरोडामधील महिलांची सामाजिक-आर्थिक स्थिती बदलत आहे.

>> कविता सरदाना 

लेखिका डायान मेरिचाईल्ड यांनी महिलांचं वर्णन 'पूर्ण वर्तुळ' असं केलं आहे. कारण महिलांमध्ये निर्माण, पालनपोषण आणि परिवर्तन करण्याची शक्ती आहे. त्यासाठी महिलांना स्वत:चं सशक्तीकरण करण्यासाठी केवळ प्रोत्साहनाची, संधीची, संसाधनांची आणि कौशल्याची गरज असते. सशक्तीकरणामुळे महिलांना स्वत:ची ओळख होते, त्यांना त्यांची क्षमता आणि सामर्थ्य कळतं. सामर्थ्य म्हणजे एखाद्या व्यवहाराच्या माध्यमातून देता येईल अशी वस्तू नव्हे. सामर्थ्य म्हणजे दानही नव्हे. सामर्थ्य मिळवावं लागतं, टिकवावं लागतं आणि त्याचं संरक्षण करावं लागतं.

देशाच्या उभारणीत महिलांचा सक्रिय सहभाग असावा, त्या केवळ लाभार्थी राहू नयेत, हे ध्येय बाळगून अदानी फाऊंडेशन त्यांच्या देशभरातील सीएसआर साईट्सच्या माध्यमातून महिलांसाठीच्या शाश्वत उपजीविकेवर काम करत आहे. महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा ब्लॉकची लोकसंख्या १ लाख ८७ हजार ३३१ इतकी आहे. तिरोड्यानं आत्मनिर्भरतेचं आणि आर्थिक स्वातंत्र्याचं उत्तम उदाहरण समोर ठेवलं आहे. विविध अभियानांमुळे इथल्या महिलांचं आयुष्य बदललं आहे. त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाली असून जीवनशैलीदेखील उंचावली आहे. 

फाऊंडेशनच्या फॉर्च्युन सुपोषण या पोषण प्रकल्पामुळे महिला बदलकर्त्या होत आहेतच, यासोबतच त्यांना आर्थिक-सामाजिक स्वातंत्र्यदेखील मिळत आहे. या माध्यमातून रोजगार मिळणाऱ्या महिलाना आम्ही सुपोषन संगिनी म्हणतो. आरोग्य आणि पोषणाच्या बाबतीत समुदायाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येतं. यासोबतच संगिनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून पैसेही कमावतात. तिरोडा येथील या प्रकल्पाला नुकतीच ४ वर्षे पूर्ण झाली.

महाराष्ट्र सरकारच्या साथीनं अदानी फाऊंडेशन आणि मानव विकास मिशन विविध उपक्रम राबवत आहे. त्यात अगरबत्ती, धूप आणि लाखेच्या बांगड्यांची निर्मितीसह ऑयस्टर मशरुमच्या उत्पादनाचा समावेश आहे. सध्याच्या घडीला फाऊंडेशन ४३ महिला स्वयंमदत गटांच्या २५३ महिलांसोबत काम करत आहे. ज्ञानाची देवाणघेवाण करून कौशल्य विकास साधून बाजारातून मदत घेत उद्योजकता वाढवण्यावर भर दिला जात आहे. कोविड-१९ महामारी असतानाही आमच्या प्रकल्पाचा भाग असलेल्या महिला कमाई करत होत्या. यावेळी त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. कारण कोविड-१९ मुळे महिलांच्या पतींच्या नोकऱ्या गेल्या होत्या. महिला कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता करत असलेलं काम पाहून पुरुषांनी त्यांचं कौतुक केलं. ज्यावेळी सर्व काही थांबलं होतं, त्यावेळी अगरबत्ती, धूप यांना मोठी मागणी होती. त्यामुळे महिला स्वयं मदत गटाच्या सदस्यांचं उत्पन्नदेखील वाढलं. यावेळी सुपोषण संगिनींना आपणही अदानी फाऊंडेशनच्या मदतीनं स्वयं मदत गटाचा भाग व्हावं असं वाटलं. ज्यावेळी सर्वजण घरात निष्क्रिय बसून होते, त्यावेळी आमच्या सुपोषण संगिनी अधिक मेहनत घेत होत्या. त्यांची गरज पाहून फाऊंडेशननं गराडा, रामाटोला, टिकारामटोला, मेंदीपूर आणि गुमाधावडा या पाच गावांसाठी २० अगरबत्ती मशीन्सची व्यवस्था केली. अगरबत्ती निर्मितीच्या प्रक्रियेत ६० महिलांचा सहभाग होता. वर्षभराच्या कालावधीत, ज्यावेळी अनेकांच्या हातातील रोजगार गेला, त्यावेळी प्रत्येक सदस्य दिवसाला ५० ते १०० किलोचं उत्पादन घेऊन गोंदियातील बाजारात त्याची विक्री करत होता. यातून त्यांना महिन्याला ३ ते ४ हजारांचं उत्पन्न मिळत होतं. 

अशाच एका गटात सरिता चौधरी, ललिता चौघरी आणि गुणवंता चौधरींचा समावेश होता. आत्मविश्वासाची कमतरता असल्यानं त्या सुरुवातीला केवळ ५ ते १० किलो अगरबत्त्या तयार करायच्या. फेब्रुवारी २०२० मध्ये सरिता यांनी त्यांच्या इतर सहकारी महिलांसोबत ५० किलो अगरबत्त्या तयार केल्या. सविता या मेंदीपूर आणि बरबासपुरामधील सुपोषण संगिनी आहेत. उत्पादनाचा दर्जा उत्तम असल्यानं त्यांना बाजारात चांगला दर मिळाला. त्यामुळे अधिक उत्पादन घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळालं. यानंतर सरिता यांचा पती त्यांना कच्च्या मालाच्या खरेदीत, उत्पादनाच्या विक्रीत त्यांना मदत करू लागला. मार्च आणि एप्रिलमध्ये त्यांनी १५० ते २०० किलो अगरबत्ती तयार केल्या. जून २०२० मध्ये त्यांचं उत्पादन ५०० ते ५५० किलोवर गेलं. यातून त्यांनी ३५ हजार २०० रुपये कमावले. सहा महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये त्यांचं उत्पन्न ७० हजारांच्या घरात गेलं.

सरिता यांच्याप्रमाणेच अन्य सुपोषण संगिनी विविध क्षेत्रात काम करत आहेत. दोघी जणी दूध संकलन आणि चिलिंग सेंटरमध्ये (एमसी आणि सीसी) कार्यरत आहेत. नऊ जणी घरगुती डेअरी व्यवसायात आणि २२ जणी मशरुमच्या उत्पादनात कार्यरत आहेत. गोंदियातील शेतकरी लाखेचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतो. त्यामुळे लाखेच्या बांगड्यांच्या निर्मितीकडेही अनेकजणी वळत आहेत. स्वयं मदत गटाच्या ४५ महिलांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यात तिरोड्यातील आदिवासी महिलांचादेखील समवेश आहे. अदानी फाऊंडेशननं त्यांना बायबॅक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. त्या माध्यमातून या महिला त्यांनी तयार केलेल्या बांगड्या दुल्हनदेवी संस्था या एनजीओला विकतात. या महिला रंगीबेरंगी डिझाईन करून त्यातून महिन्याला ३ ते ४ हजार रुपये कमावतात.

तिरोडातील महिला याआधी भातशेती करून गुजराण करायच्या. त्यातून त्यांना पाच ते सहा महिने रोजगार मिळायचा. त्यानंतर उर्वरित महिने त्यांना दुसरा रोजगार शोधावा लागायचा. आता महिला करत असलेल्या कामामुळे त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न वाढलं आहे. सोबतच महिलांना मानदेखील मिळू लागला आहे. उत्तम पोषण झालेलं, उत्पन्नाचं शाश्वत साधन असलेल्या कुटुंबांच्या माध्यमातूनच आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार होईल.(लेखिका अदानी फाउंडेशनच्या आरोग्य आणि पोषणविषयक उपक्रमांच्या सल्लागार आहेत.)