शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी कमी, कशी होणार सेवा हमी?

By admin | Updated: May 11, 2015 03:06 IST

राज्यातील भाजपा प्रणीत सरकारने सरकारी कामे व सेवा विशिष्ट मुदतीत देण्याबाबतचा कायदा केला असला तरी राज्यातील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुमारे सव्वा लाख पदे रिक्त आहेत.

संदीप प्रधान, मुंबईराज्यातील भाजपा प्रणीत सरकारने सरकारी कामे व सेवा विशिष्ट मुदतीत देण्याबाबतचा कायदा केला असला तरी राज्यातील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुमारे सव्वा लाख पदे रिक्त असून, मे महिन्याच्या अखेरीस सुमारे १५ हजार कर्मचारी निवृत्त होत असल्याने या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यातील सेवा हमी कायद्यानुसार विशिष्ट मुदतीत सेवा न देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्याला ५०० ते ५००० रुपयांचा दंड केला जाऊ शकतो. याखेरीज शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद कायद्यात आहे. या कायद्याचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी स्वागत केले आहे. मात्र अपुरा कर्मचारीवर्ग व निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याची प्रलंबित मागणी याकडे संघटना लक्ष वेधत आहे. तरुणांना रोजगार देण्याकरिता निवृत्तीचे वय वाढविण्यात येत नाही, असे कारण दिले जात असले तरी प्रत्यक्षात आर्थिक स्थितीचे कारण देत अनेक खात्यांमधील नोकरभरती थांबलेली आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले.अगदी अलीकडे वाकोला पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकाऱ्याने सुट्टीच्या कारणास्तव आपल्या वरिष्ठावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली व त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. राज्यातील पोलीस खात्यात गेल्या दोन वर्षांपासून पोलीस उपअधीक्षकांची १२५ पदे तर पोलीस निरीक्षकांची १५५ पदे रिक्त आहेत. यावरून या खात्यामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा किती ताण असेल ते स्पष्ट होते.राज्यातील आरोग्य सेवेच्या दुरवस्थेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येतो. या खात्यात राज्यात मेडिकल आॅफिसर वर्ग-१ची (आरएमओ) ८५ पदे रिक्त आहेत. वर्ग-२ची (मेडिकल आॅफिसर) १३५ तर वर्ग-३ची ४७० पदे रिक्त आहेत. पोलिसांकरिता असलेल्या रुग्णालयात तर डॉक्टरच नाहीत. पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याचे कारण आरोग्य खात्यातील ही दारुण स्थिती कारणीभूत आहे. महसूल विभाग हा राज्यातील प्रशासनाचा कणा मानला जातो. या खात्यातही वेगळे चित्र नाही. उपजिल्हाधिकाऱ्यांची १२० पदे रिक्त आहेत. राज्य सरकारच्या अनेक खात्यांत पदे रिक्त आहेत ही वस्तुस्थिती आहे. हे आव्हान लक्षात घेऊनच सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया निश्चित करण्याकरिता तीन महिन्यांची मुदत दिली आहे. सरकारी अधिकारी, कर्मचारी महासंघाने निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याची मागणी केली आहे. मात्र सरकारचा सध्या तसा विचार नाही.- स्वाधीन क्षत्रिय, मुख्य सचिव--------निवृत्तीच्या दिवशी पदोन्नतीहिंगोलीतील एक अधिकारी गेली दोन वर्षे पदोन्नतीकरिता पात्र होता. वरिष्ठ श्रेणीचे पद रिक्त होते. मात्र त्याच्या पदावर काम करण्यास पर्याय नसल्याने निवृत्तीच्या दिवशी त्याला पदोन्नती दिली गेली. पत्र मिळताच १५ कि.मी. प्रवास करून त्याने त्या पदाचा कार्यभार स्वीकारला व सायंकाळी निवृत्त झाला. राज्य सरकारमध्ये अनेक कर्मचारी, अधिकारी पदोन्नतीला पात्र असतानाही त्यांच्या पदाकरिता पर्याय नसल्याने त्यांना पदोन्नती दिली जात नाही. याबाबत तीव्र नाराजी आहे.