शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

‘भूजल’चे कर्मचारीबळ रिते

By admin | Updated: January 7, 2017 01:33 IST

राज्यातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले

पुणे : राज्यातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले असून, त्या अंतर्गत राज्यभरात भू-जल तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात येत आहेत. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयोगशाळा अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरण्याचा प्रस्ताव गेली आठ महिने सरकार दरबारी धूळ खात आहे. देशातील प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर शुद्ध पेयजल उपलब्ध करुन देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारने हाती घेतला आहे. त्या अंतर्गत राज्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्याचाच पूरक भाग म्हणून जिल्हानिहाय प्रयोगशाळा व वॉटर इन्फॉमेर्टाक सेंटर उभारण्यात येत आहे. वडगाव बुद्रुक येथील प्रयोगशाळेच्या जागेला बुधवारी (दि.४) हिरवा कंदील मिळाला. गेल्या वर्षभरापासून या प्रयोगशाळांच्या उभारणीला गती मिळाली असली, तरी त्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ अजूनही उपलब्ध झालेले नाही. राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या १३८ उपविभागीय, २८ जिल्हा, ६ विभागीय प्रयोगशाळा उभारण्यात येत आहेत. त्यातील १३८ उपविभागीय व ७ जिल्हा प्रयोगशाळांचे काम सुरु झाले असून, उर्वरित प्रयोगशाळा उभारण्यात येत आहेत.(प्रतिनिधी)पदभरतीसाठी सरकारी पातळीवर पाठपुरावा सुरू ठेवण्यात येईल. मात्र, केवळ पदे मंजूर नाहीत, म्हणून प्रयोगशाळांचे कामकाज थांबणार नाही. प्रतिनियुक्ती, प्रभारी पदभार या माध्यमातून कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे.- नितीन पाटील, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा>अशी हवीत पदे राज्य प्रयोगशाळा१२विभागीय मुख्यालय२४जिल्हा२९७उपविभागीय१४८