शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
5
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
6
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
7
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
8
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
9
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
10
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
11
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
12
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
13
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
14
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
15
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
16
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
17
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
18
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
19
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
20
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास नोकरीला संरक्षण

By admin | Updated: December 23, 2014 00:39 IST

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास कर्मचाऱ्याच्या नोकरीला संरक्षण प्रदान करण्याचे अधिकार उच्च न्यायालयाला आहेत, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण न्यायपीठाने सोमवारी दिला.

हायकोर्टाला अधिकार : तीन सदस्यीय पूर्ण न्यायपीठाचा निर्णयनागपूर : जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास कर्मचाऱ्याच्या नोकरीला संरक्षण प्रदान करण्याचे अधिकार उच्च न्यायालयाला आहेत, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण न्यायपीठाने सोमवारी दिला.या मुद्यावर उच्च न्यायालयाचे परस्पर विरोधी निर्णय होते. उच्च न्यायालयाच्या युगलपीठाने काही याचिकांमध्ये ‘कविता साळुंके’ (सर्वोच्च न्यायालय) प्रकरणावरील निर्णयाच्या आधारावर नोकरीला संरक्षण प्रदान केले होते, तर काही याचिकांमध्ये ‘गणेश’(मुंबई उच्च न्यायालय पूर्ण न्यायपीठ)प्रकरणावरील निर्णयाच्या आधारावर नोकरीला संरक्षण नाकारले होते. गेल्या वर्षी ‘तुळशीराम बदलू’ व ‘हेमा निखारे’ यांच्या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान ही बाब नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अतुल चांदूरकर यांच्या निदर्शनास आली. यामुळे त्यांनी १ आॅक्टोबर २०१३ रोजी या मुद्यावर निश्चित पायंडा घालून देण्यासाठी प्रकरण मुख्य न्यायमूर्तींकडे वर्ग केले होते. मुख्य न्यायमूर्तींनी यासाठी पूर्ण न्यायपीठ स्थापन केले. त्यात स्वत: मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा, न्यायमूर्ती वासंती नाईक व न्यायमूर्ती रवी देशपांडे यांचा समावेश होता. निर्णयातील ठळक बाबी२८ नोव्हेंबर २००० पूर्वी (सर्वोच्च न्यायालयाच्या ‘मिलिंद’ प्रकरणावरील निर्णयाची तारीख) नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांची नोकरी व उपभोगलेले लाभ केवळ जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे काढून घेता येणार नाही.२८ नोव्हेंबर २००० ते १८ आॅक्टोबर २००१ (जात प्रमाणपत्र कायदा लागू होण्याची तारीख) या काळातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती व लाभ काढून घेण्याची बाब नोकरीच्या अटी व शर्तींवर अवलंबून राहील.१८ आॅक्टोबर २००१ यानंतरची नियुक्ती व मिळालेले लाभ जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर ताबडतोब रद्द करता येतील. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर नोकरीला संरक्षण मिळण्याचा लाभ कोष्टी व हलबा कोष्टी समाजासह विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्तींसाठीही उपलब्ध आहे. भटक्या जमाती, विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्तींचे दावे ‘आर. उन्नीकृष्णन’ (सर्वोच्च न्यायालय) प्रकरणावरील निर्णयाच्या आधारावर निकाली काढण्यात येतील.