शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास नोकरीला संरक्षण

By admin | Updated: December 23, 2014 00:39 IST

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास कर्मचाऱ्याच्या नोकरीला संरक्षण प्रदान करण्याचे अधिकार उच्च न्यायालयाला आहेत, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण न्यायपीठाने सोमवारी दिला.

हायकोर्टाला अधिकार : तीन सदस्यीय पूर्ण न्यायपीठाचा निर्णयनागपूर : जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास कर्मचाऱ्याच्या नोकरीला संरक्षण प्रदान करण्याचे अधिकार उच्च न्यायालयाला आहेत, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण न्यायपीठाने सोमवारी दिला.या मुद्यावर उच्च न्यायालयाचे परस्पर विरोधी निर्णय होते. उच्च न्यायालयाच्या युगलपीठाने काही याचिकांमध्ये ‘कविता साळुंके’ (सर्वोच्च न्यायालय) प्रकरणावरील निर्णयाच्या आधारावर नोकरीला संरक्षण प्रदान केले होते, तर काही याचिकांमध्ये ‘गणेश’(मुंबई उच्च न्यायालय पूर्ण न्यायपीठ)प्रकरणावरील निर्णयाच्या आधारावर नोकरीला संरक्षण नाकारले होते. गेल्या वर्षी ‘तुळशीराम बदलू’ व ‘हेमा निखारे’ यांच्या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान ही बाब नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अतुल चांदूरकर यांच्या निदर्शनास आली. यामुळे त्यांनी १ आॅक्टोबर २०१३ रोजी या मुद्यावर निश्चित पायंडा घालून देण्यासाठी प्रकरण मुख्य न्यायमूर्तींकडे वर्ग केले होते. मुख्य न्यायमूर्तींनी यासाठी पूर्ण न्यायपीठ स्थापन केले. त्यात स्वत: मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा, न्यायमूर्ती वासंती नाईक व न्यायमूर्ती रवी देशपांडे यांचा समावेश होता. निर्णयातील ठळक बाबी२८ नोव्हेंबर २००० पूर्वी (सर्वोच्च न्यायालयाच्या ‘मिलिंद’ प्रकरणावरील निर्णयाची तारीख) नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांची नोकरी व उपभोगलेले लाभ केवळ जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे काढून घेता येणार नाही.२८ नोव्हेंबर २००० ते १८ आॅक्टोबर २००१ (जात प्रमाणपत्र कायदा लागू होण्याची तारीख) या काळातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती व लाभ काढून घेण्याची बाब नोकरीच्या अटी व शर्तींवर अवलंबून राहील.१८ आॅक्टोबर २००१ यानंतरची नियुक्ती व मिळालेले लाभ जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर ताबडतोब रद्द करता येतील. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर नोकरीला संरक्षण मिळण्याचा लाभ कोष्टी व हलबा कोष्टी समाजासह विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्तींसाठीही उपलब्ध आहे. भटक्या जमाती, विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्तींचे दावे ‘आर. उन्नीकृष्णन’ (सर्वोच्च न्यायालय) प्रकरणावरील निर्णयाच्या आधारावर निकाली काढण्यात येतील.