शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

एफडीएमध्ये कर्मचारी-अधिकाऱ्यांची पदे ‘रिक्त’च

By admin | Updated: January 7, 2017 02:11 IST

अन्न व औषध प्रशासन विभागातील कर्मचारी-अधिकाऱ्यांची पदे ‘रिक्त’च असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे

मुंबई : आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागातील कर्मचारी-अधिकाऱ्यांची पदे ‘रिक्त’च असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. या विभागात १ हजार १७६ पदे मंजूर असून त्यातील केवळ ८११ पदांची भरती करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. हे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ४० हजार लोकसंख्येच्या मागे एक अन्न निरीक्षक आणि औषध निरीक्षक असणे आवश्यक आहे. परंतु, राज्यात १ लाख ३५ हजार लोकसंख्येच्या मागे फक्त एक अन्न निरीक्षक आणि औषध निरीक्षक असे धक्कादायक वास्तव आहे. एफडीएतील ३१ टक्के म्हणजे १,१७६ पैकी ३६५ पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. राज्यात अन्न आणि औषध भेसळखोर सक्रिय असताना त्यांना रोखण्याची जबाबदारी ज्या एफडीएवर आहे, त्या एफडीएतच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वानवा असल्याचे चित्र आहे. एफडीएतील अन्न निरीक्षकासाठी २६५ पदे मंजूर असून त्यातील केवळ ७८ पदे रिक्त आहेत, तर औषध निरीक्षकांची १६१ पदे मंजूर असून यातील ३७ पदे रिक्त आहेत. अन्न विभागातील साहाय्यक आयुक्तांची ६२ पदे मंजूर असून २२ पदांसाठी भरती झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर औषध विभागातील वैज्ञानिक अधिकाऱ्यांची १३ पदे रिक्त असून ३४ पदे मंजूर आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची ८ पदे मंजूर असून त्यातील ४ रिक्त आहेत, तर साहाय्यक आयुक्तांची ५२ पदे मंजूर असून २२ रिक्त आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांची १२ पदे मंजूर असून ९ रिक्त आहेत, तर नमुना साहाय्यक पदाची ६० मंजूर असून २३ रिक्त आहेत. पदांची भरती व्हावी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)