शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
3
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
4
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
5
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
6
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
7
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
8
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
9
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
10
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
11
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
12
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
13
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
14
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
15
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
16
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
17
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
18
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
19
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
20
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव

केंद्राच्या धर्तीवर राज्यात आपतकालीन बचाव दल

By admin | Updated: July 31, 2014 14:19 IST

माळीण येथील भीषण दुर्घटनेनंतर राज्य सरकारने केंद्रातील एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यातही राज्य आपतकालीन बचाव दलाची (एसडीआरएफ) स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ३१ - माळीण येथील भीषण दुर्घटनेनंतर राज्य सरकारने केंद्रातील एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यातही राज्य आपतकालीन बचाव दलाची (एसडीआरएफ) स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या पथकात सुमारे ४०० ते ५०० जवानांचा समावेश केला जाणार असून राज्यात माळीणसारखी दुर्घटना घडल्यावर एसडीआरएफचे पथक तात्काळ मदतीसाठी रवाना होऊ शकणार आहे. 
पुणे जिल्ह्यातील माळीण गावात बुधवारी सकाळी डोंगराचा कडा कोसळला व संपूर्ण गावच नकाशावरुन नष्ट झाले. या दुर्घटनेला आता २४ तासांचा कालावधी लोटला असला तरी अद्याप बचावकार्य सुरु आहे. पाऊस आणि मातीचा ढिगा-यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. मृतांचा आकडा ३० पर्यंत पोहोचला असून आणखी १५० जण ढिगा-याखाली अडकले असावे अशी शक्यता आहे. राष्ट्रीय आपतकालीन बचाव दलाचे (एनडीआरएफ) ३०० या मदतकार्यात अथक मेहनत घेत आहेत. यापार्श्वभूमीवर गुरुवारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने केंद्राच्या धर्तीवर राज्य आपतकालीन बचाव दलाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. एसडीआरएफमध्ये ४०० ते ५०० जवानांचा समावेश केला जाईल. या जवानांना बचावकार्यातील उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल असे सांगितले जाते. मात्र एसडीआरएफच्या प्रशिक्षण केंद्रासाठी जागा, जवानांची भरती कशी केली जाईल, त्यासाठीचा निधी किती लागणार हे अद्याप समजू शकलेले नाही. 
एसडीआरएफची स्थापना झाल्यास एनडीआरएफचे जवान येईपर्यंत वाट न बघता तातडीने मदतकार्याला सुरुवात करणे शक्य होईल. 
 
माळीण गावाकडे मदतीचा ओघ सुरू
केंद्रीय गृहमंत्रीी राजनाथ सिंह यांनी आज माळीण गावाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत, दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारतर्फे २ लाख रुपयांची मदत जाहीर केली.
दरम्यान सिद्धिविनायक मंदिरातर्फेही माळीण गावच्या पुनर्वसनासाठी ५० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.