शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

आणीबाणी परवडली; पाणीबाणी नको

By admin | Updated: June 9, 2016 03:40 IST

जलसाठ्यांनी तळ गाठल्याने पाण्यासाठी दिवसरात्र एक करावे लागत आहे.

अनिरुद्ध पाटील,

डहाणू/बोर्डी- जलसाठ्यांनी तळ गाठल्याने पाण्यासाठी दिवसरात्र एक करावे लागत आहे. मात्र, डहाणूत विकासाच्या नावाखाली काँक्रिट रस्त्याच्या बांधकामासाठी हजारो लीटर पाण्याची नासधूस सुरू आहे. कारवाई अपेक्षित असताना ठेकेदारधार्जिन्या प्रशासनाचा त्याला छुपा पाठिंबा असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आणीबाणी परवडली, पाणीबाणी नको, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षीच्या कमी पर्जन्यमानाने हल्ली पाणीटंचाई अधिकच तीव्र झाली आहे. जून उजाडल्यापासून जलसाठ्यातून पाणी मिळवण्यासाठी डहाणूतील नागरिकांना दिवसरात्र एक करावे लागत आहे. कुटुंबातील लहानापासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना पहाटे लवकर उठून, रात्री उशिरापर्यंत धडपड सुरू असते. पिण्याच्या पाण्यासाठी माणसांची वणवण असताना जनावरांचा प्रश्न अधिकच बिकट बनला आहे. कुटुंबाची दुरवस्था न पाहवून कर्ज काढून कूपनलिका खोदण्याचे काम युद्धापातळीवर सुरू आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत, उपलब्ध पाण्याच्या योग्य नियोजित वापराव्यतिरिक्त अन्य पर्याय नाही. ही जीवघेणी परिस्थिती असताना विकासाच्या नावाखाली काँक्रिट रस्त्याच्या बांधकामासाठी हजारो लीटर पाण्याची नासाडी करण्याचे काम घोलवड आणि चिखले गावात हाती घेण्यात आले आहे. या बांधकामासाठी सर्रास पाण्याचा अपव्यय सुरू असताना घसा कोरडा असणाऱ्यांचा जीव कासावीस होत आहे. मात्र, आर्थिक फायद्यासाठी आसुसलेला ठेकेदार विकासाच्या नावाखाली असुरी मजा लुटत आहे. एकंदरीत प्रशासन पातळीवर हा प्रकार थांबणे आवश्यक असताना डहाणूत डोळेझाक सुरू असल्याने येथील प्रशासन ठेकेदारास अनुकूल असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दरम्यान, संबंधित ठेकेदार बांधकामासाठी पाण्याचा उपसा कुठून करतो, याचा तपास लावण्यासह तत्काळ बांधकाम थांबवणे अपेक्षित आहे. शिवाय, पाण्याचा गैरवापर केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे नोंदविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. रस्तेबांधणी अत्यावश्यक आहे. मात्र, मे व जून महिन्यांत पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता, शासकीय योजनेतून राबवण्यात येणाऱ्या बांधकामांना स्थगिती देण्याची आवश्यकताही वर्तविली जात आहे.