शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणी परवडली; पाणीबाणी नको

By admin | Updated: June 9, 2016 03:40 IST

जलसाठ्यांनी तळ गाठल्याने पाण्यासाठी दिवसरात्र एक करावे लागत आहे.

अनिरुद्ध पाटील,

डहाणू/बोर्डी- जलसाठ्यांनी तळ गाठल्याने पाण्यासाठी दिवसरात्र एक करावे लागत आहे. मात्र, डहाणूत विकासाच्या नावाखाली काँक्रिट रस्त्याच्या बांधकामासाठी हजारो लीटर पाण्याची नासधूस सुरू आहे. कारवाई अपेक्षित असताना ठेकेदारधार्जिन्या प्रशासनाचा त्याला छुपा पाठिंबा असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आणीबाणी परवडली, पाणीबाणी नको, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षीच्या कमी पर्जन्यमानाने हल्ली पाणीटंचाई अधिकच तीव्र झाली आहे. जून उजाडल्यापासून जलसाठ्यातून पाणी मिळवण्यासाठी डहाणूतील नागरिकांना दिवसरात्र एक करावे लागत आहे. कुटुंबातील लहानापासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना पहाटे लवकर उठून, रात्री उशिरापर्यंत धडपड सुरू असते. पिण्याच्या पाण्यासाठी माणसांची वणवण असताना जनावरांचा प्रश्न अधिकच बिकट बनला आहे. कुटुंबाची दुरवस्था न पाहवून कर्ज काढून कूपनलिका खोदण्याचे काम युद्धापातळीवर सुरू आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत, उपलब्ध पाण्याच्या योग्य नियोजित वापराव्यतिरिक्त अन्य पर्याय नाही. ही जीवघेणी परिस्थिती असताना विकासाच्या नावाखाली काँक्रिट रस्त्याच्या बांधकामासाठी हजारो लीटर पाण्याची नासाडी करण्याचे काम घोलवड आणि चिखले गावात हाती घेण्यात आले आहे. या बांधकामासाठी सर्रास पाण्याचा अपव्यय सुरू असताना घसा कोरडा असणाऱ्यांचा जीव कासावीस होत आहे. मात्र, आर्थिक फायद्यासाठी आसुसलेला ठेकेदार विकासाच्या नावाखाली असुरी मजा लुटत आहे. एकंदरीत प्रशासन पातळीवर हा प्रकार थांबणे आवश्यक असताना डहाणूत डोळेझाक सुरू असल्याने येथील प्रशासन ठेकेदारास अनुकूल असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दरम्यान, संबंधित ठेकेदार बांधकामासाठी पाण्याचा उपसा कुठून करतो, याचा तपास लावण्यासह तत्काळ बांधकाम थांबवणे अपेक्षित आहे. शिवाय, पाण्याचा गैरवापर केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे नोंदविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. रस्तेबांधणी अत्यावश्यक आहे. मात्र, मे व जून महिन्यांत पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता, शासकीय योजनेतून राबवण्यात येणाऱ्या बांधकामांना स्थगिती देण्याची आवश्यकताही वर्तविली जात आहे.