शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

‘महानंद’मधील प्रशासकीय संघर्षाला उकळी

By admin | Updated: May 4, 2015 01:40 IST

राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने ‘महानंद’मधील शेकडो कोटी रुपयांच्या घोटाळ््याच्या चौकशीची घोषणा केल्यानंतर या घोटाळ्याचे खापर परस्परांवर फोडण्याच्या

संदीप प्रधान, मुंबईराज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने ‘महानंद’मधील शेकडो कोटी रुपयांच्या घोटाळ््याच्या चौकशीची घोषणा केल्यानंतर या घोटाळ्याचे खापर परस्परांवर फोडण्याच्या अहमहमिकेतून ‘महानंद’च्या चेअरमन वैशाली नागवडे आणि व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक यांनी परस्परांसोबत काम करणे अशक्य असल्याचे पत्र सरकारला दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर छुपी युती असलेले राज्यातील भाजपाचे सरकार ‘महानंद’मधील भ्रष्टाचारावर कारवाईचा आसूड ओढणार किंवा कसे याबाबत प्रशासनात मात्र संभ्रम आहे. ‘महानंद’मधील भ्रष्टाचार, पैशाची उधळपट्टी, दूध संकलनातील घट हे वर्षानुवर्षांचे जुने दुखणे आहे. राज्यात सहकार क्षेत्रावर वरचष्मा असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना या घोटाळ््यांवर पांघरूण घातले गेले. मात्र भाजपा-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी ‘महानंद’मधील घोटाळ््याची चौकशी करण्याची घोषणा केली. आता सर्व गैरव्यवहार, गैरव्यवस्थापन याचे खापर संचालक मंडळ प्रशासनावर फोडू पाहत आहे तर प्रशासन संचालकांना त्याकरिता जबाबदार धरू पाहत आहे.याच संघर्षाचे पडसाद संचालक मंडळाच्या बैठकीत उमटले. मत्स्योद्योग विकास मंडळाचा कार्यभार असलेले महानंदचे व्यवस्थापकी संचालक विश्वास पाटील तसेच वित्त सल्लागार संध्या पवार यांना चेअरमन वैशाली नागवडे व संचालकांनी लक्ष्य केले. पाटील यांनी सूत्रे हातात घेतली तेव्हापासून महानंदची दूध विक्री ३० हजार लि.ने घटल्याचा मुद्दा उपस्थित करून त्यांना जाब विचारण्यास व हेत्वारोप करण्यास प्रारंभ केल्याचे पाटील यांनी सचिवांना केलेल्या तक्रारीत नमूद केले. यामुळे पाटील यांची प्रकृती बिघडली. डॉक्टरांना पाचारण करावे लागले. पाटील यांनी बैठकीवर बहिष्कार घातला. आता पाटील यांना दूर करून महानंदला पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक देण्याची मागणी संचालक मंडळाने केली आहे तर खुद्द पाटील यांनीही या संचालकांसोबत काम करण्यास तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.