शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

२४ तासांत पणन विधेयक मागे घेण्याची सरकारवर नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 06:33 IST

उशिरा सुचलेले शहाणपण; विरोधकांचा टोला

मुंबई : विधानसभेत मांडलेले आणि गदारोळात मंजूर करून घेतलेले विधेयक २४ तासात मागे घेण्याची नामुष्की बुधवारी राज्य सरकारवर ओढवली. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास आणि विनियमन तिसरी सुधारणा विधेयक २०१८ मागे घेत असल्याची घोषणा सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी परिषदेत केली.

बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शेतकºयांकडून शेतमाल खरेदी करताना रोखीने व्यवहार करण्यावर या विधेयकामुळे बंदी येणार होती. मंगळवारी राज्य सरकारने विधानसभेत गदारोळातच तब्बल नऊ विधेयके संमत करुन घेतली. त्यामध्ये महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (तिसरी सुधारणा) विधेयक २०१८ या विधेयकाचाही समावेश होता. या विधेयकानुसार शेतकºयांनी बाजारात विक्रीसाठी आणलेल्या दोन लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या शेतीमालाच्या संदर्भात विक्रेत्यांच्या वतीने कोणतीही रक्कम स्वीकारण्यास अथवा स्वत:च्या खात्यातून शेतकºयांना रक्कम अदा करण्यास व्यापाºयांना मनाई करण्यात आली होती.

मात्र, ही सुधारणा शेतकºयांसाठीच अडचणीची ठरणार असल्याचे सांगत त्यात सुधारणा कराव्यात अशी मागणी व्यापारी, अडत्यांनी केली होती. या विधेयकाविरोधात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी, अडते आणि माथाडींनी दोन दिवस बंद पुकारला होता.मंगळवारपासून पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे शेतकºयांची कोंडी होण्याची भीती होती. त्या पार्श्वभूमीवर आज राज्य शासनाने हे विधेयक तातडीने मागे घेत असल्याचे जाहीर केले.विधेयकात आवश्यक ते बदल करणार - देशमुखबुधवारी राज्य शासनाने पणन विधेयक तातडीने मागे घेत असल्याचे जाहीर केले. आता बाजार समितीतील संबंधित सर्व घटकांची समिती नेमण्यात येणार आहे. त्या सर्वांशी चर्चा करून या विधेयकात आवश्यक ते बदल करण्यात येतील. त्यानंतर, सुधारित विधेयक पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळात मांडले जाणार असल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवन