शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

२४ तासांत पणन विधेयक मागे घेण्याची सरकारवर नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 06:33 IST

उशिरा सुचलेले शहाणपण; विरोधकांचा टोला

मुंबई : विधानसभेत मांडलेले आणि गदारोळात मंजूर करून घेतलेले विधेयक २४ तासात मागे घेण्याची नामुष्की बुधवारी राज्य सरकारवर ओढवली. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास आणि विनियमन तिसरी सुधारणा विधेयक २०१८ मागे घेत असल्याची घोषणा सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी परिषदेत केली.

बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शेतकºयांकडून शेतमाल खरेदी करताना रोखीने व्यवहार करण्यावर या विधेयकामुळे बंदी येणार होती. मंगळवारी राज्य सरकारने विधानसभेत गदारोळातच तब्बल नऊ विधेयके संमत करुन घेतली. त्यामध्ये महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (तिसरी सुधारणा) विधेयक २०१८ या विधेयकाचाही समावेश होता. या विधेयकानुसार शेतकºयांनी बाजारात विक्रीसाठी आणलेल्या दोन लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या शेतीमालाच्या संदर्भात विक्रेत्यांच्या वतीने कोणतीही रक्कम स्वीकारण्यास अथवा स्वत:च्या खात्यातून शेतकºयांना रक्कम अदा करण्यास व्यापाºयांना मनाई करण्यात आली होती.

मात्र, ही सुधारणा शेतकºयांसाठीच अडचणीची ठरणार असल्याचे सांगत त्यात सुधारणा कराव्यात अशी मागणी व्यापारी, अडत्यांनी केली होती. या विधेयकाविरोधात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी, अडते आणि माथाडींनी दोन दिवस बंद पुकारला होता.मंगळवारपासून पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे शेतकºयांची कोंडी होण्याची भीती होती. त्या पार्श्वभूमीवर आज राज्य शासनाने हे विधेयक तातडीने मागे घेत असल्याचे जाहीर केले.विधेयकात आवश्यक ते बदल करणार - देशमुखबुधवारी राज्य शासनाने पणन विधेयक तातडीने मागे घेत असल्याचे जाहीर केले. आता बाजार समितीतील संबंधित सर्व घटकांची समिती नेमण्यात येणार आहे. त्या सर्वांशी चर्चा करून या विधेयकात आवश्यक ते बदल करण्यात येतील. त्यानंतर, सुधारित विधेयक पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळात मांडले जाणार असल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवन