शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

राज्यभरातील शेतकऱ्यांची अडतमधून सुटका

By admin | Updated: July 7, 2016 00:08 IST

बाजार समितीमध्ये विक्री होणाऱ्या कृषी मालाचे कमिशन (अडत) शेतकऱ्यांऐवजी खरेदीदाराकडून घेण्याचा अध्यादेश शासनाने जारी केला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची अडतमधून सुटका झाली

- नामदेव मोरे, नवी मुंबई

बाजार समितीमध्ये विक्री होणाऱ्या कृषी मालाचे कमिशन (अडत) शेतकऱ्यांऐवजी खरेदीदाराकडून घेण्याचा अध्यादेश शासनाने जारी केला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची अडतमधून सुटका झाली आहे. याशिवाय फळे, भाजीपाला व मसाल्याच्या पदार्थांची एपीएमसीबाहेर थेट विक्री करण्यास परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळावा व ग्राहकांना स्वस्त दरामध्ये कृषी माल उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने भाजी व फळांची थेट विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचा अध्यादेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या आदेशानुसार व नावाने अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी ५ जुलैला जारी केला आहे. यामुळे कृषी व्यापारामधील बाजार समित्यांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. भाजीपाला, फळे व मसाल्यांच्या पदार्थांची बाजार समितीबाहेर विक्री करण्यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. शेतीमालाची थेट खरेदी - विक्री करता येणार आहे. बाजार समितीमध्ये येणाऱ्या कृषी मालावरच फी आकारता येणार आहे. याशिवाय कृषी मालावर राज्यात फक्त एकदाच बाजार फी आकारता येणार आहे. एका बाजार समितीमध्ये फी भरली असेल व कृषी माल तेथून दुसऱ्या बाजार समितीमध्ये विक्रीस गेल्यास पुन्हा फी आकारता येणार नाही. राज्यातील ३०५ बाजार समित्या व उपबाजारांमध्ये व्यापाऱ्यांचे कमिशन (अडत) शेतकऱ्यांच्या पट्टीतून कपात केले जात होते. यापुढे शेतकऱ्यांकडून कोणतीही फी वसूल करता येणार नाही. व्यापाऱ्यांनी त्यांचे कमिशन खरेदीदाराकडून घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. याविषयीची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे अध्यादेशात स्पष्ट केले आहे. पणन विभागाने राज्यातील सर्व बाजार समित्यांना शासन अध्यादेशाची प्रत पाठविण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी ईदमुळे राज्यातील अनेक बाजार समित्यांना सुटी आहे. यामुळे गुरुवारी मार्केट सुरू झाल्यानंतर अडत खरेदीदाराकडून घेण्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही याची पाहणी करण्याची जबाबदारी त्या - त्या परिसरातील उपनिबंधकांवर सोपविण्यात येणार आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार का, या निर्णयाचा शेतकऱ्यांना किती फायदा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मुंबईत जाणार थेट भाजीपाला - कृषी माल बाजार समितीमध्ये आला तरच त्यावर बाजार फी आकारता येणार आहे. यामुळे ३९ वर्षांपासून सुरू असलेली मक्तेदारी संपुष्टात आली आहे. - बाजार समितीमधील व्यापारीही आता त्यांचा माल मार्केटमध्ये न आणता थेट मुुंबईत पाठवू शकणार आहेत. - शासनाच्या या निर्णयाचा व्यापाऱ्यांना फायदाच होणार असून माथाडी कामगार व बाजार समितीच्या उत्पन्नावर थेट परिणाम होणार आहे.अडत खरेदीदारांकडून वसूल करण्याचा व भाजीपाला, फळांची बाजार समिती आवाराबाहेर थेट विक्री करण्याविषयीचा अध्यादेश ५ जुलैला जारी करण्यात आला आहे. याची तत्काळ अंमलबजावणी केली जाणार असून त्याविषयी सूचना सर्व बाजार समित्यांना दिल्या आहेत. - डॉ. किशोर तोष्णीवाल,पणन संचालक