शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

राज्यभरातील शेतकऱ्यांची अडतमधून सुटका

By admin | Updated: July 7, 2016 00:08 IST

बाजार समितीमध्ये विक्री होणाऱ्या कृषी मालाचे कमिशन (अडत) शेतकऱ्यांऐवजी खरेदीदाराकडून घेण्याचा अध्यादेश शासनाने जारी केला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची अडतमधून सुटका झाली

- नामदेव मोरे, नवी मुंबई

बाजार समितीमध्ये विक्री होणाऱ्या कृषी मालाचे कमिशन (अडत) शेतकऱ्यांऐवजी खरेदीदाराकडून घेण्याचा अध्यादेश शासनाने जारी केला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची अडतमधून सुटका झाली आहे. याशिवाय फळे, भाजीपाला व मसाल्याच्या पदार्थांची एपीएमसीबाहेर थेट विक्री करण्यास परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळावा व ग्राहकांना स्वस्त दरामध्ये कृषी माल उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने भाजी व फळांची थेट विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचा अध्यादेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या आदेशानुसार व नावाने अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी ५ जुलैला जारी केला आहे. यामुळे कृषी व्यापारामधील बाजार समित्यांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. भाजीपाला, फळे व मसाल्यांच्या पदार्थांची बाजार समितीबाहेर विक्री करण्यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. शेतीमालाची थेट खरेदी - विक्री करता येणार आहे. बाजार समितीमध्ये येणाऱ्या कृषी मालावरच फी आकारता येणार आहे. याशिवाय कृषी मालावर राज्यात फक्त एकदाच बाजार फी आकारता येणार आहे. एका बाजार समितीमध्ये फी भरली असेल व कृषी माल तेथून दुसऱ्या बाजार समितीमध्ये विक्रीस गेल्यास पुन्हा फी आकारता येणार नाही. राज्यातील ३०५ बाजार समित्या व उपबाजारांमध्ये व्यापाऱ्यांचे कमिशन (अडत) शेतकऱ्यांच्या पट्टीतून कपात केले जात होते. यापुढे शेतकऱ्यांकडून कोणतीही फी वसूल करता येणार नाही. व्यापाऱ्यांनी त्यांचे कमिशन खरेदीदाराकडून घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. याविषयीची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे अध्यादेशात स्पष्ट केले आहे. पणन विभागाने राज्यातील सर्व बाजार समित्यांना शासन अध्यादेशाची प्रत पाठविण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी ईदमुळे राज्यातील अनेक बाजार समित्यांना सुटी आहे. यामुळे गुरुवारी मार्केट सुरू झाल्यानंतर अडत खरेदीदाराकडून घेण्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही याची पाहणी करण्याची जबाबदारी त्या - त्या परिसरातील उपनिबंधकांवर सोपविण्यात येणार आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार का, या निर्णयाचा शेतकऱ्यांना किती फायदा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मुंबईत जाणार थेट भाजीपाला - कृषी माल बाजार समितीमध्ये आला तरच त्यावर बाजार फी आकारता येणार आहे. यामुळे ३९ वर्षांपासून सुरू असलेली मक्तेदारी संपुष्टात आली आहे. - बाजार समितीमधील व्यापारीही आता त्यांचा माल मार्केटमध्ये न आणता थेट मुुंबईत पाठवू शकणार आहेत. - शासनाच्या या निर्णयाचा व्यापाऱ्यांना फायदाच होणार असून माथाडी कामगार व बाजार समितीच्या उत्पन्नावर थेट परिणाम होणार आहे.अडत खरेदीदारांकडून वसूल करण्याचा व भाजीपाला, फळांची बाजार समिती आवाराबाहेर थेट विक्री करण्याविषयीचा अध्यादेश ५ जुलैला जारी करण्यात आला आहे. याची तत्काळ अंमलबजावणी केली जाणार असून त्याविषयी सूचना सर्व बाजार समित्यांना दिल्या आहेत. - डॉ. किशोर तोष्णीवाल,पणन संचालक