शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

अकरावी आॅनलाइन अर्ज २९ जूनपर्यंत भरता येणार

By admin | Updated: June 28, 2017 02:05 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा गोंधळ संपला असे चित्र असतानाच शेवटच्या दिवशीही हा गोंधळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले. अनेक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा गोंधळ संपला असे चित्र असतानाच शेवटच्या दिवशीही हा गोंधळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले. अनेक विद्यार्थ्यांना गुण दिसत नव्हते तसेच अर्ज भरताना अन्य अडचणी येत होत्या. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज भरून न झाल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालयातला फोन सतत खणखणत होता. त्यामुळे अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवलेली असून २९ जूनला सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी नि:श्वास सोडला. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्यासाठी आॅनलाइन अर्ज भरणे अनिवार्य आहे. १३ जून रोजी आॅनलाइनवर दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर १६ जून रोजी विद्यार्थ्यांनी अर्ज दोन भरण्यास सुरुवात केली. विद्यार्थी दुसरा अर्ज भरत असताना अनेक अडचणी येत होत्या. तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकही त्रस्त झाले होते. त्यामुळे संकेतस्थळातील त्रुटी काढून टाकण्यासाठी नवीन कंपनीला एक दिवस देण्यात आला. या कंपनीने एका दिवसात त्रुटी दुरुस्त केल्याचा दावा केला. शिक्षण उपसंचालक विभागानेही त्रुटी दूर झाल्याचे स्पष्ट केले. परंतु अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सतत विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या म्हणूनच पालकांनी तेथे हजेरी लावली होती. अनेक विद्यार्थ्यांचे वाढीव गुण शेवटच्या दिवशीही संकेतस्थळावर दिसत नव्हते. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांची वाढ देण्यात आल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.