शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

अकरावी आॅनलाइन अर्ज २९ जूनपर्यंत भरता येणार

By admin | Updated: June 28, 2017 02:05 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा गोंधळ संपला असे चित्र असतानाच शेवटच्या दिवशीही हा गोंधळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले. अनेक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा गोंधळ संपला असे चित्र असतानाच शेवटच्या दिवशीही हा गोंधळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले. अनेक विद्यार्थ्यांना गुण दिसत नव्हते तसेच अर्ज भरताना अन्य अडचणी येत होत्या. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज भरून न झाल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालयातला फोन सतत खणखणत होता. त्यामुळे अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवलेली असून २९ जूनला सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी नि:श्वास सोडला. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्यासाठी आॅनलाइन अर्ज भरणे अनिवार्य आहे. १३ जून रोजी आॅनलाइनवर दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर १६ जून रोजी विद्यार्थ्यांनी अर्ज दोन भरण्यास सुरुवात केली. विद्यार्थी दुसरा अर्ज भरत असताना अनेक अडचणी येत होत्या. तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकही त्रस्त झाले होते. त्यामुळे संकेतस्थळातील त्रुटी काढून टाकण्यासाठी नवीन कंपनीला एक दिवस देण्यात आला. या कंपनीने एका दिवसात त्रुटी दुरुस्त केल्याचा दावा केला. शिक्षण उपसंचालक विभागानेही त्रुटी दूर झाल्याचे स्पष्ट केले. परंतु अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सतत विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या म्हणूनच पालकांनी तेथे हजेरी लावली होती. अनेक विद्यार्थ्यांचे वाढीव गुण शेवटच्या दिवशीही संकेतस्थळावर दिसत नव्हते. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांची वाढ देण्यात आल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.