शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

अकरावीची शेवटची यादी जाहीर

By admin | Updated: September 29, 2016 04:00 IST

गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला अखेर गुरुवारी पूर्णविराम मिळणार आहे. बुधवारी अकरावी प्रवेशाची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी

मुंबई : गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला अखेर गुरुवारी पूर्णविराम मिळणार आहे. बुधवारी अकरावी प्रवेशाची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी संबंधित विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा आहे. दरम्यान, महाविद्यालयांनी केलेल्या खोडसाळपणामुळे ११ गुणवत्ता याद्या जाहीर झाल्यानंतरही प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.पहिल्या प्रयत्नात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपासून फेरपरीक्षेतील उत्तीर्ण आणि एटीकेटी लागलेल्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने प्रवेशाच्या एकूण अकरा फेऱ्या घेतल्या. मात्र तरीही शेकडो विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशाबाबात नाराजी व्यक्त होत आहे. आॅफलाइन प्रवेशासाठी लाखो रुपये उकळणाऱ्या महाविद्यालय आणि दलालांना १०० टक्के आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे चाप लागला. परिणामी विद्यार्थ्यांना नाहक त्रास देण्याचे काम काही महाविद्यालयांनी केले आहे. यामध्ये रिक्त जागा दाखवत विद्यार्थी आणि पालकांना उपसंचालक कार्यालयातून पत्र आणण्याचा चुकीचा सल्ला बहुतांश महाविद्यालयांनी दिला. त्यामुळे उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत कर्मचाऱ्यांनाही नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. विद्यार्थी, पालक आणि अधिकाऱ्यांना होणाऱ्या त्रासामुळे आॅफलाइन प्रवेश सुरू होतील, हे महाविद्यालयांच्या खोडसाळपणामागील मुख्य कारण होते. (प्रतिनिधी)कारवाई कराच... : आॅनलाइन प्रक्रियेबाबत मुंबई महानगर क्षेत्रातील बहुतेक महाविद्यालय आणि प्राचार्यांनी शेवटच्या फेरीपर्यंत विद्यार्थ्यांना उपसंचालक कार्यालयाकडे पाठवण्याचे काम केले. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना प्रवेशापासूनच वंचित राहावे लागले. आपली जबाबदारी झटकून चुकीचे मार्गदर्शन करणाऱ्यांवर उपसंचालक कार्यालयाने कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार विद्यार्थी व पालकांनी केली आहे.