शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
3
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
4
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
5
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
6
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
7
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
8
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
9
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
10
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
14
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
15
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
16
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
17
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
18
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
19
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
20
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम

अकरावी प्रवेशप्रक्रिया मेअखेरीस

By admin | Updated: April 5, 2017 01:31 IST

इयत्ता दहावीची परीक्षा संपल्याने आता विद्यार्थी व पालकांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत

पिंपरी : इयत्ता दहावीची परीक्षा संपल्याने आता विद्यार्थी व पालकांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. मात्र, त्यासाठी किमान दीड महिना वाट पाहावी लागणार आहे. या वर्षी विद्यार्थ्यांना मे महिन्यांच्या अखेरीस आॅनलाईन प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. असे असले, तरी पुढील प्रक्रियेला विलंब होणार नाही, याची दक्षता केंद्रीय प्रवेश समितीकडून घेतली जाणार आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय पद्धतीने आॅनलाईन राबविले जाते. केंद्रीय प्रवेश समितीमार्फत ही प्रक्रिया पार पाडली जाते. विद्यार्थ्यांना भाग १ व भाग २ अशा दोन टप्प्यांत आॅनलाईन प्रवेश अर्ज भरावे लागतात. ही प्रक्रिया सुटसुटीत व्हावी, यासाठी दहावीच्या निकालापूर्वीच अर्जाचा भाग एक भरून घेतला जात होता. ही प्रक्रिया एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला सुरू केली जात होती. यंदा मात्र त्यामध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग आता मे महिन्याच्या अखेरीस भरता येईल. त्यामुळे अजून दीड महिना वाट पाहावी लाणार आहे.याविषयी सहायक शिक्षण उपसंचालक व अकरावी समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत म्हणाल्या, ‘‘यंदा प्रवेशासाठी नवी एजन्सी नेमण्यात आल्याने कनिष्ठ महाविद्यालयांच्या नोंदणीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. माहितीपुस्तिकांच्या छपाईचे काम सुरू आहे. अर्ज भरण्यास लवकर सुरुवात केली तरी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद सुरुवातीला मिळत नाही. शेवटच्या काळातच अधिक गर्दी होते. तसेच या काळात शिक्षण विभाग व कनिष्ठ महाविद्यालयांतील कर्मचारी या कामात विनाकारण अडकून पडतात.’’त्यामुळे या वर्षी समितीने ही प्रक्रिया उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आॅनलाईन अर्ज महाविद्यालांमध्येच भरणे बंधनकारक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना फारशी अडचण येणार नाही.