शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

अकरावीत २१ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश

By admin | Updated: June 29, 2016 00:55 IST

पहिल्या गुणवत्ता यादीतून प्रवेश मिळालेल्या ५२ हजार विद्यार्थ्यांपैकी मंगळवारी २१ हजार १४० विद्यार्थ्यांनी ५० रुपये भरून आपला प्रवेश निश्चित केला

पुणे : पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या गुणवत्ता यादीतून प्रवेश मिळालेल्या ५२ हजार विद्यार्थ्यांपैकी मंगळवारी २१ हजार १४० विद्यार्थ्यांनी ५० रुपये भरून आपला प्रवेश निश्चित केला. मंगळवारी प्रवेशाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालयात गर्दी केली होती. मात्र, शहरात अधून-मधून पावसाच्या सरी येत असल्याने विद्यार्थी व पालकांची तारांबळ उडाली. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. अकरावी प्रवेश नियंत्रण समितीतर्फे सोमवारी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. गुणवत्ता यादीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ५० रुपये शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. मात्र, प्रवेशाच्या पहिल्या दिवशी केवळ ६ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते.परंतु, प्रवेश न घेणारे विद्यार्थी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर जाणार असल्याने दुसऱ्या दिवशी तब्बल २१ हजार १४० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतले. पुणे विभागीय कार्यालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार पहिल्या गुणवत्ता यादीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत प्रवेश घेण्यास मुदत देण्यात आली आहे. येत्या २९ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराममहाराज यांच्या पालख्या पुणे शहरात दाखल होणार आहेत. त्यामुळे शहरातील काही भागातील वाहतूक बंद केली जाणार असून काही भागातील वाहतूक वळवली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी वाहतूकव्यवस्थेचा विचार करून प्रवेश घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना ३० जूननंतर प्रवेश घेण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही. प्रवेश मिळूनही प्रवेश न घेणारे विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर जाणार आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांत कोणत्याही परिस्थितीत प्रवेश घ्यावाच लागणार आहे.पहिल्या गुणवत्ता यादीतून ५२ हजार ६१६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यात विज्ञान शाखेत प्रवेश मिळालेल्या २३ हजार ११० विद्यार्थ्यांपैकी १० हजार ५६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. वाणिज्य (इंग्रजी) शाखेत प्रवेश मिळालेल्या १० हजार ५६८ विद्यार्थ्यांपैकी केवळ ५ हजार ४६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, तर वाणिज्य मराठीमध्ये ९ हजार ६०६ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ८३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. कला शाखेच्या (मराठी) ४ हजार ८९६ पैकी १ हजार ४२८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.