शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

इलेक्ट्रॉनिक्स शाखेला मिळेनात विद्यार्थी!

By admin | Updated: June 16, 2017 23:46 IST

बारावीनंतर करिअर म्हणजे इंजिनिअरिंग असे समीकरण रुढ असलेल्या मराठवाड्यात आता या क्षेत्राबद्दलचे आकर्षण हळूहळू का होईना पण ओसरताना दिसत आहे

मयूर देवकर/ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 16 - बारावीनंतर करिअर म्हणजे इंजिनिअरिंग असे समीकरण रुढ असलेल्या मराठवाड्यात आता या क्षेत्राबद्दलचे आकर्षण हळूहळू का होईना पण ओसरताना दिसत आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि आयटी या दोन अभियांत्रिकी शाखांना गेल्या वर्षी औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात थंड प्रतिसाद मिळाला. काही महाविद्यालयांमध्ये तर एकही जागा भरली गेली नाही. त्यामुळे मराठवाड्यातील पाच ते सहा महाविद्यालयांनी या शाखेतील प्रवेश थांबवावे अशी मागणी तंत्र शिक्षण संचालनालयाकडे केली आहे.औरंगाबाद शहराचा विचार केला असता गेल्या वर्षी येथील दहा महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेच्या ७४२ जागांपैकी केवळ १४१ जागा सामान्य प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या टप्प्यापर्यंत (कॅप राउंड ४) भरल्या गेल्या. म्हणजे ६०१ जागांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली. यामध्ये मॅनेजमेंटच्या जागा गृहीत धरण्यात आलेल्या नाहीत. एकेकाळी विद्यार्थी आणि पालकांची आवड असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स शाखेची झळाळी अशी उतरावाी हे बदलत्या काळाचे सूचक आहे.एकूण अभियांत्रिकी क्षेत्रामध्येच मोठे बदल होत आहे. चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त जागा भरल्याच जात नाही. मागच्या चार वर्षांत अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्यांच्या संख्येत १८ टक्क्यांची घट झाली आहे. मेकॅनिकल, कॉम्प्युटर, सिव्हील, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकिच्या प्रमुख शाखा म्हणून ओळखल्या जातात. किमान मराठवाड्यात तरी प्रवेश संख्येत घट होण्याचा सर्वात मोठा फटका इलेक्ट्रॉनिक्स शाखेला बसला आहे. शहर व परिसरातील हाय-टेक इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजी आणि साई कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग या दोन महाविद्यालयांमध्ये मागच्या वर्षी इलेक्ट्रॉनिक्स शाखेत प्रत्येकी ६० जगांवर कॅप राऊंडद्वारे एकही प्रवेश झाला नाही. जीएसएमच्या एमआयटी कॉलेजमध्ये तर १८० पैकी केवळ १० जागा भरल्या गेल्या. पीईएसमध्ये ५२ तर देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १८० पैकी ८५ जागा रिकाम्या राहिल्या.रोजगार घटला, प्रवेश घटलेअखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेच्या आकडेवारीनुसार केवळ ४० टक्के इंजिनिअर्स नोकरी मिळण्याच्या पात्रता योग्य आहेत. महाराष्ट्रात तर अभियांत्रिकी महाविद्यालयांचा रोजगार दर केवळ ३५ टक्के आहे. म्हणजे ६५ टक्के विद्यार्थ्यांना पदवीनंतर नोकरीसाठी वणवण करावी लागते. नोकऱ्यांची संख्या घटल्याने बेरोजगारी वाढली आणि त्यामुळेच प्रवेशसंख्येत घट झाली. तसेच सध्याचा अभ्यासक्रम झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत कित्येक वर्ष मागे आहे. यामुळे कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडवण्यात महाविद्यालये अपयशी ठरत आहेत.इलेक्ट्रिकल आणि सिव्हीलला अच्छे दिनविद्यार्थ्यांच्या प्राधान्य क्रमात सर्वात शेवटी राहणाऱ्या इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल शाखांकडे आता ओढा वाढू लागला आहे. ऊर्जा क्षेत्रात होणारी मोठी उलथापालथ आणि बांधकाम व निर्मिती क्षेत्राची वाढलेली मागणी यामुळे या क्षेत्रात रोजगाराची संधी मोठ्या प्रमणात उपलब्ध होत आहे. स्पर्धा परीक्षाद्वारे सरकारी नोकरी मिळवण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. म्हणजे नोकऱ्या जास्त आणि प्रशिक्षित उमेदवार कमी अशी सध्या स्थिती आहे. त्यामुळे या क्षेत्रात तेजी दिसून येते.कॅपच्या चौथ्या टप्प्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या प्रवेशांचे विवरण (२०१६-१७)महाविद्यालय प्रवेशरिकाम्या जागाएकूणहायटेक इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजी ०६०६०श्री साई कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, पडारी गाव ०४८४८श्रीयश कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ३२७३०औरंगाबाद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग ४३९४३साई इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग ४३२३६इंटरनॅशनल सेंटर आॅफ एक्सलन्स इन इंजिनिअरिंग ५४०४५पीईएस कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग ८५२६०छत्रपती शाहु कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग १२४८६०जीएसएम मराठवाडा इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी १०१७०१८०देवगिरी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग ९५८५१८०