शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रॉनिक्स शाखेला मिळेनात विद्यार्थी!

By admin | Updated: June 16, 2017 23:46 IST

बारावीनंतर करिअर म्हणजे इंजिनिअरिंग असे समीकरण रुढ असलेल्या मराठवाड्यात आता या क्षेत्राबद्दलचे आकर्षण हळूहळू का होईना पण ओसरताना दिसत आहे

मयूर देवकर/ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 16 - बारावीनंतर करिअर म्हणजे इंजिनिअरिंग असे समीकरण रुढ असलेल्या मराठवाड्यात आता या क्षेत्राबद्दलचे आकर्षण हळूहळू का होईना पण ओसरताना दिसत आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि आयटी या दोन अभियांत्रिकी शाखांना गेल्या वर्षी औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात थंड प्रतिसाद मिळाला. काही महाविद्यालयांमध्ये तर एकही जागा भरली गेली नाही. त्यामुळे मराठवाड्यातील पाच ते सहा महाविद्यालयांनी या शाखेतील प्रवेश थांबवावे अशी मागणी तंत्र शिक्षण संचालनालयाकडे केली आहे.औरंगाबाद शहराचा विचार केला असता गेल्या वर्षी येथील दहा महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेच्या ७४२ जागांपैकी केवळ १४१ जागा सामान्य प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या टप्प्यापर्यंत (कॅप राउंड ४) भरल्या गेल्या. म्हणजे ६०१ जागांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली. यामध्ये मॅनेजमेंटच्या जागा गृहीत धरण्यात आलेल्या नाहीत. एकेकाळी विद्यार्थी आणि पालकांची आवड असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स शाखेची झळाळी अशी उतरावाी हे बदलत्या काळाचे सूचक आहे.एकूण अभियांत्रिकी क्षेत्रामध्येच मोठे बदल होत आहे. चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त जागा भरल्याच जात नाही. मागच्या चार वर्षांत अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्यांच्या संख्येत १८ टक्क्यांची घट झाली आहे. मेकॅनिकल, कॉम्प्युटर, सिव्हील, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकिच्या प्रमुख शाखा म्हणून ओळखल्या जातात. किमान मराठवाड्यात तरी प्रवेश संख्येत घट होण्याचा सर्वात मोठा फटका इलेक्ट्रॉनिक्स शाखेला बसला आहे. शहर व परिसरातील हाय-टेक इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजी आणि साई कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग या दोन महाविद्यालयांमध्ये मागच्या वर्षी इलेक्ट्रॉनिक्स शाखेत प्रत्येकी ६० जगांवर कॅप राऊंडद्वारे एकही प्रवेश झाला नाही. जीएसएमच्या एमआयटी कॉलेजमध्ये तर १८० पैकी केवळ १० जागा भरल्या गेल्या. पीईएसमध्ये ५२ तर देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १८० पैकी ८५ जागा रिकाम्या राहिल्या.रोजगार घटला, प्रवेश घटलेअखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेच्या आकडेवारीनुसार केवळ ४० टक्के इंजिनिअर्स नोकरी मिळण्याच्या पात्रता योग्य आहेत. महाराष्ट्रात तर अभियांत्रिकी महाविद्यालयांचा रोजगार दर केवळ ३५ टक्के आहे. म्हणजे ६५ टक्के विद्यार्थ्यांना पदवीनंतर नोकरीसाठी वणवण करावी लागते. नोकऱ्यांची संख्या घटल्याने बेरोजगारी वाढली आणि त्यामुळेच प्रवेशसंख्येत घट झाली. तसेच सध्याचा अभ्यासक्रम झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत कित्येक वर्ष मागे आहे. यामुळे कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडवण्यात महाविद्यालये अपयशी ठरत आहेत.इलेक्ट्रिकल आणि सिव्हीलला अच्छे दिनविद्यार्थ्यांच्या प्राधान्य क्रमात सर्वात शेवटी राहणाऱ्या इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल शाखांकडे आता ओढा वाढू लागला आहे. ऊर्जा क्षेत्रात होणारी मोठी उलथापालथ आणि बांधकाम व निर्मिती क्षेत्राची वाढलेली मागणी यामुळे या क्षेत्रात रोजगाराची संधी मोठ्या प्रमणात उपलब्ध होत आहे. स्पर्धा परीक्षाद्वारे सरकारी नोकरी मिळवण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. म्हणजे नोकऱ्या जास्त आणि प्रशिक्षित उमेदवार कमी अशी सध्या स्थिती आहे. त्यामुळे या क्षेत्रात तेजी दिसून येते.कॅपच्या चौथ्या टप्प्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या प्रवेशांचे विवरण (२०१६-१७)महाविद्यालय प्रवेशरिकाम्या जागाएकूणहायटेक इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजी ०६०६०श्री साई कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, पडारी गाव ०४८४८श्रीयश कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ३२७३०औरंगाबाद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग ४३९४३साई इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग ४३२३६इंटरनॅशनल सेंटर आॅफ एक्सलन्स इन इंजिनिअरिंग ५४०४५पीईएस कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग ८५२६०छत्रपती शाहु कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग १२४८६०जीएसएम मराठवाडा इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी १०१७०१८०देवगिरी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग ९५८५१८०