शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

ठामपा करणार कचऱ्यापासून वीजनिर्मिती

By admin | Updated: May 20, 2016 02:45 IST

पालिकेने १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आपला मोर्चा शीळ येथील वन विभागाच्या हद्दीत असलेल्या बंद दगडखाणीच्या ठिकाणी वळवला

ठाणे : डायघर आणि तळोजा डम्पिंगचा प्रश्न बारगळल्याने पालिकेने १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आपला मोर्चा शीळ येथील वन विभागाच्या हद्दीत असलेल्या बंद दगडखाणीच्या ठिकाणी वळवला आहे. वन खात्याने परवानगी दिल्यानंतर आता पर्यावरण विभागानेही यावर शिक्कामोर्तब केल्याने अखेर पुढील आठवड्यात ही जागा पालिकेच्या ताब्यात येणार आहे. त्यानुसार, पालिका येथे कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून वीजनिर्मिती करणार आहे. याशिवाय, प्रभागस्तरावर आणि इतर माध्यमातून विविध प्रकारच्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प राबवले जाणार असल्याने भविष्यात पालिकेला ४०० मेट्रीक टन कचऱ्याचीच विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. महापालिका क्षेत्रात आजघडीला ७०० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. परंतु, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेला अद्यापही डम्पिंग उपलब्ध झालेले नाही. २००४मध्ये शासनाकडून पालिकेला डायघर येथील १८.८९ हेक्टर जमीन मिळाली आहे. तीवर कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मे. हेंजर बायोटेक एनर्जीज लि. या संस्थेबरोबर २००८मध्ये करारनामा केला होता. परंतु, स्थानिकांचा विरोध झाल्याने तो प्रकल्प बासनात गुंडाळावा लागला. त्यामुळे सध्या पालिका दिवा येथे कचरा टाकत आहे. परंतु, येथील नागरिकांचा विरोध वाढल्याने पालिकेने तोही प्रकल्प गुंडाळला होता. मात्र, आता कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेतला असून, मौजे शीळ येथील बंद असलेल्या दगडखाणीच्या ठिकाणी हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यानुसार, या प्रकल्पाला स्थायी आणि महासभेने यापूर्वीच मान्यता दिली आहे. वन विभागाच्या हद्दीत ही जागा असून, याला आता त्यांनी मान्यता दिली आहे. तसेच जिल्हाधिकारी स्तरावरील समितीनेदेखील याला हिरवा कंदील दिला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण मंडळानेदेखील याला ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे; आणि पर्यावरण व वन विभागाकडूनदेखील मान्यता मिळाली आहे. त्यानुसार, आता या प्रकल्पाचे काम सुरू केल्यानंतर दोन वर्षांचा कालावधी जाणार असून, यासाठी २२ लाखांचा खर्च करून सल्लागारदेखील नेमला आहे.आता सर्व अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर पुढील आठवड्यात पालिकेच्या ताब्यात ही जागा येणार आहे. शहरातून सुमारे १२५ सोसायट्यांकडून जमा केलेला १०० मेट्रीक टन ओला, सुका कचरा गोळा केला जात आहे. आता हाच कचरा या जागेवर टाकला जाणार असून, रिसायकल पद्धतीने येथे कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे; आणि त्यातून वीजनिर्मिती केली जाणार आहे. हक्काचे डम्पिंग ग्राउंड मिळत नसल्याने आता महापालिकेने डी-सेंट्रलाइज पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार वूड टू वेस्ट हा प्रकल्पही कार्यान्वित झाला आहे. त्याशिवाय, येत्या काही महिन्यांत त्या-त्या प्रभाग समितीमध्येच कचऱ्याचे विविध स्वरूपाचे २ ते ५ टनापर्यंतचे प्रकल्प उभारून त्यापासून बायोगॅस, कम्पोस्टिंग आणि गांडूळ खत प्रकल्पाचे प्लांट उभारले जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. याशिवाय ई वेस्ट, जैविक खत प्रकल्प आदींसह विविध स्वरूपाचे प्रकल्पही मार्गी लागण्याच्या बेतात आहेत. >निविदाही अंतिम टप्प्याततळोजाचा प्रकल्प बारगळल्याने पालिकेने पुन्हा डायघरसाठी हालचाली सुरू केल्या असून, येथे कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. त्याच्या निविदाही अंतिम झाल्या असून, लवकरच तोही मार्गी लागणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.