शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

वीज पडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 01:46 IST

विमाननगरमध्ये बुधवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास अंगावर वीज पडल्याने अक्षय विजय भालशंकर या १८ वर्षांच्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत त्याचा मित्र संतोष चांदणे हाही जखमी झाला आहे़

येरवडा : विमाननगरमध्ये बुधवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास अंगावर वीज पडल्याने अक्षय विजय भालशंकर या १८ वर्षांच्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत त्याचा मित्र संतोष चांदणे हाही जखमी झाला आहे़ अक्षय हा आईवडील, लहान भाऊ व बहिणीसमवेत कोनार्क कॅम्पस जवळील मजूरवस्तीवर राहत होता. बुधवारी दुपारी घरालगतच्या पत्रा शेडमध्ये लावलेल्या दुचाकीवर तो बसला होता. त्याच्याजवळच त्याचा मित्र संतोष चांदणे हाही बसला होता़ काही अंतरावर त्याचे वडीलही होते़ त्याचे मित्र त्याला खेळायला बोलवत होते़ पण, अक्षय हा मोबाईलवर गेम खेळत बसला़ त्याचवेळी कानठळ्या बसणारा आवाज होऊन वीज कोसळली़ यामुळे त्याच्या मानेला व कानाला गंभीर दुखापत झाली़ तसेच, त्याच्या डोक्याचे केसही जळाले़ त्यानंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले़ मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले़ मोबाईलचा विजेशी संबंध नाहीयाबाबत हवामानतज्ज्ञ जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले, मोबाईलमधील लहरींचा असा परिणाम होत नाही. त्यामुळे हा चुकीचा समज आहे. गुरुत्वाकर्षणाकडे खेचल्या जाणाऱ्या विजेच्या लहरी उंच लोखंडी खांब किंवा एखादे उंच झाड यांकडे खेचल्या जाऊ शकतात. परंतु, विजेच्या लहरी मोबाईलकडे खेचल्या जात नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. >> विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊसपुणे : गेले ३-४ दिवस ढगाळ वातावरणानंतर बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी अचानक आकाशात ढग दाटू लागले आणि विजेच्या कडकडाटासह अर्धा तास जोरदार पाऊस बरसला. पावासाच्या या जोरदार सपाट्याने शहरात ठिकठिकाणी १२ ते १४ झाडपडीच्या घटना घडल्या. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९.३ मिमी पावसाची नोंद पुणे वेधशाळेने केली आहे. हवेच्या द्रोणीय दाबाचे रूपांतर वादळात झाल्याने पावसाला पोषक वातावरण शहरात तयार झाले आहे. मागील तीन-चार दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण होते. पाऊस बरसण्याची शक्यता वाटत असतानाही हुलकावणी मिळत होती; मात्र बुधवारी पावसाने हजेरी लावली. सकाळी कडकडीत उन्ह होते; मात्र दुपारी दीड नंतर ढगाळ वातावरण झाले. आकाशात काळोख दाटून आला आणि दुपारी ३ नंतर जोरदार पाऊस पडू लागला. केवळ अर्ध्या तासाच्या पावसात शहराची दुरवस्था समोर आली. ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने पावसाची डबकी तयार झाली आहेत, चिखल झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या आॅइलवर पाऊस पडून गेल्याने रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे काही रस्त्यांवर दुचाकी घसरून पडण्याच्या घटना झाल्या. त्याचबरोबर वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या पडून रस्त्यात पालापाचोळ्याचा खच तयार झाला होता.