शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

विजेची जुजबी स्वस्ताई!

By admin | Updated: June 28, 2015 03:14 IST

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने शनिवारी बहुवार्षिक दरवृद्धी याचिकेवर निर्णय दिला. महावितरणला विजेच्या एकूण दरात २.४४ टक्के कपात सुचवण्यात आली असून, टाटा वीज कंपनीला सामान्य

नियामक आयोगाचे नवे दर : टाटाचा दिलासा तर रिलायन्सचा शॉक

मुंबई : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने शनिवारी बहुवार्षिक दरवृद्धी याचिकेवर निर्णय दिला. महावितरणला विजेच्या एकूण दरात २.४४ टक्के कपात सुचवण्यात आली असून, टाटा वीज कंपनीला सामान्य ग्राहकांच्या वीजदरात कपात करण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र रिलायन्सच्या वाढीव दरांना मान्यता दिल्यामुळे २०१५-१६ या आर्थिक वर्षात रिलायन्स वीजग्राहकांवर दरवाढीचा बोजा पडला आहे. सुधारित वीजदरवाढीमुळे सामान्य ग्राहकाला मात्र याचा विशेष फायदा झालेला नाही. उद्योगांची वीज मात्र स्वस्त झाली आहे. १ एप्रिल २०१५ पासून अमलात असलेल्या सुधारित वीजदरामध्ये आयोगाने रिलायन्सला सरासरी ५.२ टक्क्यांच्या वीजदरवाढीस मान्यता दिली आहे. त्यानुसार, १००, ३०० ते ५०० अशा सर्वच घरगुती वीज ग्राहकांच्या वीजदरात वाढ झाली असून, उद्योग क्षेत्रासह व्यावसायिक क्षेत्रातील वीज ग्राहकांना वीजदरवाढीची झळ बसली आहे. महत्त्वाचे म्हणजे टाटाच्या तुलनेत रिलायन्सचे वीजदर वाढल्याने दोन्ही कंपन्यांमधील स्पर्धा वाढणार आहे. आयोगाने दिलेल्या सुधारित निर्देशानुसार टाटाच्या घरगुती वीज ग्राहकांचे वीजदर कमी झाल्याने रिलायन्सला मोठा झटका बसणार आहे. आयोगाने टाटाला सरासरी ३.९ टक्क्यांच्या दरवाढीस मान्यता दिली आहे. त्यानुसार, १०० आणि ३०० युनिटपर्यंतची वीज वापरणाऱ्या ग्राहकांच्या वीज दरात कोणतीही वाढ झालेली नाही. या वर्गातील ग्राहकांच्या वीजदरात कपात करण्यात आली आहे. तर ३०० ते ५०० आणि ५०० युनिटवर वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीज दरवाढीचा काहीसा भार सोसावा लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे जाहिरात आणि होर्डिंग्जचे वीजदरातही कपात झाली असून, उद्योग क्षेत्राचे वीज दर मात्र वाढले आहेत. दुसरीकडे व्यावसायिक क्षेत्रातील वीज ग्राहकांना मात्र दिलासा देण्यात आला आहे.महावितरणच्या बीपीएल ग्राहकांचे दर कायम ठेवण्यात आले आहे. १०० युनिटच्या वापरावर प्रति युनिट १० पैशांची कपात करण्यात आली आहे. परंतु त्यापेक्षा अधिक युनिटचा वापर केल्यास दरवाढ करण्यात आली आहे. त्याचप्रकारे लहान व्यापाऱ्यांपासून तर मोठ्या उद्योगांना देण्यात येणाऱ्या विजेच्या दरात दिलासा देण्यात आला आहे.आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, महावितरणने आपल्या याचिकेत दरांमध्ये ७.९४ टक्के दरवाढ करण्याची मागणी केली होती. परंतु आयोगाने ५.७५ टक्के दरवाढ केली आहे. ही कपात एप्रिल २०१५ च्या दरानुसार केवळ २.४४ टक्के इतकी आहे. विशेष म्हणजे महावितरणने १३ फेब्रुवारी २०१५ रोजी याचिका दाखल करून ४७१७ कोटी रुपयांच्या तोट्याची भरपाई करण्याची मागणी करण्यात आली होती. आयोगाने यात सुमारे ९५०० कोटी रुपयांची कपात करून ३३७६ कोटी रुपये ग्राहकांकडून वसूल करण्याचे आदेश बजावले आहेत. पथदिव्यांनाही फटका पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विजेच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. २० केडब्लू क्षमतेच्या लहान पाणीपुरवठा योजनेच्या दरात २ पैसे कपात, परंतु २० ते ४० केडब्लू व ४० पेक्षा अधिक क्षमतेच्या योजनांच्या दरात २२ आणि १९ पैसे प्रति युनिट वाढ केली आहे. स्ट्रीट लाइटची वीजही महाग करण्यात आली. ग्रामपंचायत आणि नगरपालिकांना यासाठी ४.७० रुपये प्रति युनिटऐवजी ४.७८ रुपये द्यावे लागतील. महापालिकेला ५.८० रुपये प्रति युनिट द्यावे लागतील.