शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

प्रदूषण कमी करण्यासाठी वर्षभरात इलेक्ट्रिक वाहने

By admin | Updated: August 23, 2015 00:09 IST

प्रदूषण ही देशाची एक मोठी समस्या झाली आहे. ते कमी करण्यासाठी पुढील वर्षभरात पर्यावरणपूरक इलेक्ट्रीक बस, कार आणि दुचाकी बाजारात आणल्या जातील, अशी घोषणा केंद्रीय भृपूष्ठ

पुणे : प्रदूषण ही देशाची एक मोठी समस्या झाली आहे. ते कमी करण्यासाठी पुढील वर्षभरात पर्यावरणपूरक इलेक्ट्रीक बस, कार आणि दुचाकी बाजारात आणल्या जातील, अशी घोषणा केंद्रीय भृपूष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पुण्यात केली. त्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) तंत्रज्ञानाची निर्मिती करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील ५८ नामवंतांच्या कर्तृत्वाचा आलेख मांडणाऱ्या ह्यलोकमत आयकॉन्स आॅफ पीसीएमसीह्ण या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अनिल शिरोळे, ह्यलोकमतह्ण पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर व अन्य मान्यवर व्यासपीठावर होते. प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने वाहतूक मंत्रालय आणि इस्रो यांच्यामध्ये करार करण्यात आला. असून त्याअंतर्गत इस्रो ‘कॉस्ट इफेक्टिव्ह बॅटरी टेक्नॉलॉजी’ निर्माण करणार आहे; जी इलेक्ट्रीक बसमध्ये वापरण्यात येईल आणि पर्यावरणपूरक असेल. नियोजित वेळेत बॅटरींचे व्यावसायिक उत्पादन सुरू करण्यात येईल आणि वर्षभरात या गाडया रस्त्यावर धावतील, असे गडकरी म्हणाले.नागपूर आणि मुंबई यांना जोडणारा एक्स्प्रेस-वे बनविण्याचे काम सुरू असून तो पुण्यालाही जोडला जाईल, अशी माहिती देऊन ते म्हणाले, पुणे-नाशिक रस्ता निर्माण होण्यात भूमिअधिग्रहणाचे अडथळे येत होते. संबधितांना समजावून हा प्रश्न सोडविण्यात आल्याने आता भूमिअधिग्रहण वेगाने होऊ लागले असून लवकरच हा रस्ता तयार होईल.१,२०० ठिकाणी प्रवासी सुविधाराष्ट्रीय महामार्गांवरील अपघात होण्यामागे रस्त्याच्या कडेला वाहने थांबण्यासाठी जागा नसणे हे एक प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे १ हजार २०० अ‍ॅमिनेटिज रोड साईट निर्माण करण्यात येणार आहेत. यासाठी जागांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत रस्त्यांच्या कडेला ५० एकर, ३५ आणि २५ एकर जागांवर अ‍ॅमिनेटिज उभारण्यात येणार आहेत, यामध्ये अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयांमध्ये नेण्यासाठी हेलिपॅड, छोटी रुग्णालये, ट्रक टर्मिनल असेल.अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्नशीलखासदार विजय दर्डा यांनी अध्यक्षीय भाषणात, पुण्याच्या विविध प्रश्नांबरोबरच रस्त्यावरील अपघातांमुळे जाणाऱ्या बळींची भीषणता सांगून याबाबत उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली. हाच धागा पकडून गडकरी म्हणाले, राज्यात मंत्री असताना अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी मी अपघात निवारण समितीची स्थापना केली होती. या समितीने राज्यातील अपघाताच्या क्षेत्रांचा अभ्यास केला आणि २ हजार अपघातप्रवण क्षेत्रे शोधून काढली. या भागांमध्ये विविध उपाययोजना करून अपघात कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले.