शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

प्रदूषण कमी करण्यासाठी वर्षभरात इलेक्ट्रिक वाहने

By admin | Updated: August 23, 2015 00:09 IST

प्रदूषण ही देशाची एक मोठी समस्या झाली आहे. ते कमी करण्यासाठी पुढील वर्षभरात पर्यावरणपूरक इलेक्ट्रीक बस, कार आणि दुचाकी बाजारात आणल्या जातील, अशी घोषणा केंद्रीय भृपूष्ठ

पुणे : प्रदूषण ही देशाची एक मोठी समस्या झाली आहे. ते कमी करण्यासाठी पुढील वर्षभरात पर्यावरणपूरक इलेक्ट्रीक बस, कार आणि दुचाकी बाजारात आणल्या जातील, अशी घोषणा केंद्रीय भृपूष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पुण्यात केली. त्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) तंत्रज्ञानाची निर्मिती करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील ५८ नामवंतांच्या कर्तृत्वाचा आलेख मांडणाऱ्या ह्यलोकमत आयकॉन्स आॅफ पीसीएमसीह्ण या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अनिल शिरोळे, ह्यलोकमतह्ण पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर व अन्य मान्यवर व्यासपीठावर होते. प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने वाहतूक मंत्रालय आणि इस्रो यांच्यामध्ये करार करण्यात आला. असून त्याअंतर्गत इस्रो ‘कॉस्ट इफेक्टिव्ह बॅटरी टेक्नॉलॉजी’ निर्माण करणार आहे; जी इलेक्ट्रीक बसमध्ये वापरण्यात येईल आणि पर्यावरणपूरक असेल. नियोजित वेळेत बॅटरींचे व्यावसायिक उत्पादन सुरू करण्यात येईल आणि वर्षभरात या गाडया रस्त्यावर धावतील, असे गडकरी म्हणाले.नागपूर आणि मुंबई यांना जोडणारा एक्स्प्रेस-वे बनविण्याचे काम सुरू असून तो पुण्यालाही जोडला जाईल, अशी माहिती देऊन ते म्हणाले, पुणे-नाशिक रस्ता निर्माण होण्यात भूमिअधिग्रहणाचे अडथळे येत होते. संबधितांना समजावून हा प्रश्न सोडविण्यात आल्याने आता भूमिअधिग्रहण वेगाने होऊ लागले असून लवकरच हा रस्ता तयार होईल.१,२०० ठिकाणी प्रवासी सुविधाराष्ट्रीय महामार्गांवरील अपघात होण्यामागे रस्त्याच्या कडेला वाहने थांबण्यासाठी जागा नसणे हे एक प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे १ हजार २०० अ‍ॅमिनेटिज रोड साईट निर्माण करण्यात येणार आहेत. यासाठी जागांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत रस्त्यांच्या कडेला ५० एकर, ३५ आणि २५ एकर जागांवर अ‍ॅमिनेटिज उभारण्यात येणार आहेत, यामध्ये अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयांमध्ये नेण्यासाठी हेलिपॅड, छोटी रुग्णालये, ट्रक टर्मिनल असेल.अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्नशीलखासदार विजय दर्डा यांनी अध्यक्षीय भाषणात, पुण्याच्या विविध प्रश्नांबरोबरच रस्त्यावरील अपघातांमुळे जाणाऱ्या बळींची भीषणता सांगून याबाबत उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली. हाच धागा पकडून गडकरी म्हणाले, राज्यात मंत्री असताना अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी मी अपघात निवारण समितीची स्थापना केली होती. या समितीने राज्यातील अपघाताच्या क्षेत्रांचा अभ्यास केला आणि २ हजार अपघातप्रवण क्षेत्रे शोधून काढली. या भागांमध्ये विविध उपाययोजना करून अपघात कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले.