शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

प्रत्येक गावात विद्युत व्यवस्थापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2016 01:35 IST

तीन हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या राज्यातील २३ हजार ६१७ गावांमध्ये आता प्रत्येकी एक ग्राम विद्युत व्यवस्थापक नेमण्यात येणार असून तो गावातील वीज वितरण व्यवस्था सांभाळेल.

मुंबई : तीन हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या राज्यातील २३ हजार ६१७ गावांमध्ये आता प्रत्येकी एक ग्राम विद्युत व्यवस्थापक नेमण्यात येणार असून तो गावातील वीज वितरण व्यवस्था सांभाळेल. त्यासाठीची प्रशासकीय यंत्रणा ग्राम पंचायतीमार्फत राबविली जाणार आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्र परिषदेत दिली. या योजनेवर १०० कोटी रुपये महावितरणकडून खर्च करण्यात येणार आहेत. अनेक गावांमध्ये वीजपुरवठा दुरुस्तीअभावी दोन दोन दिवस खंडित राहतो. तारा तुटून दुर्घटना घडतात. आता ‘पॉवर टू आॅल’ या उद्दिष्टांतर्गत सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी विद्युत व्यवस्थापकांची नेमणूक करण्यात येणार आहे. विद्युत व्यवस्थापकांना एका घरामागे नऊ रुपये याप्रमाणे मानधन दिले जाईल. हे मानधन त्यामुळे काही खेड्यांमध्ये चार आकडादेखील गाठेल. मात्र, किमान मानधन हे तीन हजार रुपये राहील. या कंत्राटी व्यवस्थापकांना ११ महिन्यांसाठी नेमण्याचे अधिकार स्थानिक ग्रामसभेला असतील. हे व्यवस्थापक आयटीआय प्रशिक्षण घेतलेलेच असावेत ही अट मात्र असेल. याशिवाय महावितरण कंपनीमार्फत त्यांना प्रशिक्षणदेखील दिले जाईल. या व्यवस्थापकांचा विमा महावितरण उतरवेल. विद्युत व्यवस्थापक हा त्या गावातील वा गावापासून पाच किमीच्या परिसरातीलच असावा हीदेखील अट असेल. तसा उमेदवार मिळाला नाही तर महावितरणने राज्यामध्ये नेमलेल्या फ्रँचायजी कंपन्यांमध्ये पाच वर्षे काम करणाऱ्या कामगारासही तो त्या ग्राम पंचायत क्षेत्रातील रहिवासी असल्यास नेमता येईल. (विशेष प्रतिनिधी) - अनेक गावांमधील लाइनमन हे अप्रशिक्षित तरुणांकडून कामे करवून घेतात आणि त्यात अनेकदा गंभीर दुर्घटना होतात. तरुणांचा असा वापर यापुढे झाल्यास स्थानिक उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आणि लाइनमनविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले.