शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

चुनावी जुमले

By admin | Updated: February 16, 2017 00:29 IST

निवडणुका आल्या की, अमुक करून देतो, तमुक आणून देतो, अशा घोषणांनी मतदारांना दिवसाढवळ्या स्वप्न पडायची. मात्र, निवडणुकीनंतर विजयी

निवडणुका आल्या की, अमुक करून देतो, तमुक आणून देतो, अशा घोषणांनी मतदारांना दिवसाढवळ्या स्वप्न पडायची. मात्र, निवडणुकीनंतर विजयी उमेदवार जे गायब व्हायचे, ते पुढची पाच वर्षे फिरकायचेच नाहीत. त्यामुळे मतदार शहाणे झाले. एका पालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी त्यांच्या राहत्या बिल्डिंगला रंग लावून घेतला, तर कुठे दोन वर्षांचे केबलचे बिल भरायला लावले, कोणी हाउसिंग सोसायटीत फरश्या बसवून घेतल्याचे तर कोणी कम्पाउंड वॉल बांधून घेतल्याचे किस्से नंतर विजयी उमेदवार सांगू लागले. हा हिशोब धरून निवडणुकीत किती खर्च झाला ते सांगितले जाऊ लागले, पण या झाल्या व्यक्तिगत फायद्याच्या गोष्टी. निवडणूक प्रचारात ‘परसेप्शन’ तयार करण्यासाठी स्वप्नरंजन करणाऱ्या आश्वासनांची फोडणी दिली जाऊ लागली. अनेकदा भाजी कमी आणि फोडणीच जास्त असाही प्रकार घडू लागला.आश्वासनांची खैरात अगदी चंद्र, तारे तोडून आणून देऊ... इथपर्यंत जाऊ लागली, पण निवडणुका झाल्या की, या घोषणा ‘चुनावी जुमला’ असल्याचे सांगितले जाऊ लागले. काँग्रेसने असाच एक जुमला केला होता, मोफत लाइटबिलाचा. वीजबिल माफ करणार, अशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केली होती, पण सत्तेवर आल्यानंतर ती जाहीरनाम्यातली प्रिंटिंग मिस्टेक होती, असे सांगून ज्या हातावर लोकांनी ठप्पा मारला, तेच हात काँग्रेसने वरती करून टाकले. भाजपाने लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा होतील, अशी घोषणा केली, पण पुढे ती ‘चुनावी जुमला’ असल्याचे अमित शहा यांनी सांगून स्वत:ची सुटका करून घेतली. आमचे सरकार आले की ‘अच्छे दिन’ येणार असे रान पेटवणाऱ्या भाजपाचे सरकार आल्यानंतर मात्र, ‘अच्छे दिन हमारे गले की हड्डी बन गई’ असे सांगून टाकले. राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाच्या नव्या घोषणेने मुंबईकरांना असेच अचंबित केले आहे. कोस्टल रोडच्या माध्यमातून मुंबईकरांना नरिमन पॉइंट ते दहिसर हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करता येईल, अशी धम्माल घोषणा करणारे होर्डिंग्ज भाजपाने मुंबईत लावले. सोबत ‘हा माझा शब्द आहे’ असे सांगून हे लोढणे मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात बांधले गेले. आज मितीला आहे त्या रस्त्यांनी नरिमन पॉइंटहून दहिसरला जाण्यासाठीचे अंतर ७६.२ कि.मी. आहे. त्यासाठी २ ते सव्वादोन तास लागतात. कोस्टल रोडच्या नकाशानुसार, हे अंतर ३५ ते ४० कि.मी. होणार आहे. ४० कि. मी. अंतर पार करण्यासाठी तुमची गाडी ताशी १२० कि.मी. वेगाने चालवावी लागेल, तेदेखील कोठेही एक क्षण न थांबता... कोस्टल रोडची वळणे आणि मुंबईची वाहतूक पाहाता, हा शब्द कसा पुरा केला जाणार आहे, हे ती घोषणा करणाऱ्यांनाच ठाऊक. अवघ्या २४०० मीटर लांबीचा जे. जे. उड्डाणपूल पार करण्यासाठी गर्दी नसलेल्या वेळेत किमान ५ ते ७ मिनिटे लागतात. अशा वेळी नरिमन पॉइंट ते दहिसर हे ४० कि.मी.चे अंतर २० मिनिटात कसे पार होणार, असे ‘एका शब्दाने’ एकाही विरोधकाला विचारावे वाटले नाही. युती सरकार सत्तेवर आल्यानंतर, २०१९ पर्यंत ११ लाख परवडणारी घरे बांधणार, अशी घोषणा या आधी केली होती. त्याला आता अडीच वर्षे झाली. मात्र, अद्याप एकही घर बांधून झालेले नाही. आता नवीन होर्डिंग्ज लागले आहेत, ज्यावर ‘२०२१ पर्यंत प्रत्येकाला घर’ ही घोषणा केली गेलीय...