शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेच्या ६ जागांची २१ मे रोजी होणार निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 01:07 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठीची निवडणूक २१ मे रोजी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी ही घोषणा केली.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठीची निवडणूक २१ मे रोजी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी ही घोषणा केली.ज्या सहा जागांची निवडणूक होत आहे त्या अशा (कंसात विद्यमान आमदार आणि त्यांचे पक्ष) रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग (अनिल तटकरे -राष्ट्रवादी), नाशिक (जयंत जाधव-राष्ट्रवादी), उस्मानाबाद-लातूर-बीड (दिलीपराव देशमुख-काँग्रेस), परभणी-हिंगोली (बाबा जानी दुर्रानी-राष्ट्रवादी), अमरावती (प्रवीण पोटे-भाजपा) आणि चंद्रपूर (मितेश भांगडिया-भाजपा). राष्ट्रवादीकडे ३, भाजपाकडे २, काँग्रेसकडे १ जागा आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांचे सदस्य आणि पंचायत समित्यांचे सभापती हे या निवडणुकीत मतदार असतात.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीत चांगलेयश मिळाल्याने भाजपाची मतदारसंख्या वाढली आहे. मित्रपक्ष शिवसेनेने साथ दिली तर दोघांनाही फायदा होईल.भाजपाचा विचार करता उस्मानाबाद-लातूर-बीडची जागा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची असेल. तीन जागा टिकविण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोरराहील.काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपा-शिवसेना अशी आघाडी/युती झाली आणि मतदार पक्षाशी प्रामाणिक राहिले तर तुल्यबळ लढती होतील. स्वबळावर जागा जिंकणे प्रत्येक पक्षाला कठीण जाणार आहे. लातूर-बीड-उस्मानाबादमध्ये भाजपाची २४७ व शिवसेनेची ५१ अशी २९८ तर काँग्रेसची १४१ व राष्ट्रवादीची २५१ अशी ३९२ मते आहेत. परभणी-हिंगोलीत भाजपाची ५१ व शिवसेनेची ९९ अशी १५० मते आहेत. राष्ट्रवादीकडे १५९ आणि काँग्रेसकडे १३१ अशी २९० मते आहेत.नाशिकमध्ये शिवसेनेकडे १८८, भाजपाकडे १५५ अशी तब्बल ३४३ मते आहेत तर राष्ट्रवादी ८९ आणि काँग्रेस ७३ मिळून आघाडीचे संख्याबळ १६२ इतकेच आहे. चंद्रपूरमध्ये भाजपाकडे तब्बल ४८३, शिवसेनेकडे ४५ अशी दोघांची मिळून ५२८ मते आहेत. त्या मानाने काँग्रेसकडे २४९ आणि राष्ट्रवादीकडे ७१ अशी ३२० मते आहे. ही निवडणूक एकतर्फी होऊ शकते.रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेची २४७ आणि भाजपाची १३५ मिळून ३८२ मते आहेत. राष्ट्रवादीकडे १५५, काँग्रेसकडे१३३ अशी २८८ मते आहेत. कोकणच्या या एका जागेसाठी खा. नारायण राणे आणि शेकापचे आ. जयंत पाटील यांची भूमिकाही महत्त्वाची असेल.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषद