शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

विधान परिषदेच्या ६ जागांची २१ मे रोजी होणार निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 01:07 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठीची निवडणूक २१ मे रोजी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी ही घोषणा केली.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठीची निवडणूक २१ मे रोजी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी ही घोषणा केली.ज्या सहा जागांची निवडणूक होत आहे त्या अशा (कंसात विद्यमान आमदार आणि त्यांचे पक्ष) रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग (अनिल तटकरे -राष्ट्रवादी), नाशिक (जयंत जाधव-राष्ट्रवादी), उस्मानाबाद-लातूर-बीड (दिलीपराव देशमुख-काँग्रेस), परभणी-हिंगोली (बाबा जानी दुर्रानी-राष्ट्रवादी), अमरावती (प्रवीण पोटे-भाजपा) आणि चंद्रपूर (मितेश भांगडिया-भाजपा). राष्ट्रवादीकडे ३, भाजपाकडे २, काँग्रेसकडे १ जागा आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांचे सदस्य आणि पंचायत समित्यांचे सभापती हे या निवडणुकीत मतदार असतात.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीत चांगलेयश मिळाल्याने भाजपाची मतदारसंख्या वाढली आहे. मित्रपक्ष शिवसेनेने साथ दिली तर दोघांनाही फायदा होईल.भाजपाचा विचार करता उस्मानाबाद-लातूर-बीडची जागा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची असेल. तीन जागा टिकविण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोरराहील.काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपा-शिवसेना अशी आघाडी/युती झाली आणि मतदार पक्षाशी प्रामाणिक राहिले तर तुल्यबळ लढती होतील. स्वबळावर जागा जिंकणे प्रत्येक पक्षाला कठीण जाणार आहे. लातूर-बीड-उस्मानाबादमध्ये भाजपाची २४७ व शिवसेनेची ५१ अशी २९८ तर काँग्रेसची १४१ व राष्ट्रवादीची २५१ अशी ३९२ मते आहेत. परभणी-हिंगोलीत भाजपाची ५१ व शिवसेनेची ९९ अशी १५० मते आहेत. राष्ट्रवादीकडे १५९ आणि काँग्रेसकडे १३१ अशी २९० मते आहेत.नाशिकमध्ये शिवसेनेकडे १८८, भाजपाकडे १५५ अशी तब्बल ३४३ मते आहेत तर राष्ट्रवादी ८९ आणि काँग्रेस ७३ मिळून आघाडीचे संख्याबळ १६२ इतकेच आहे. चंद्रपूरमध्ये भाजपाकडे तब्बल ४८३, शिवसेनेकडे ४५ अशी दोघांची मिळून ५२८ मते आहेत. त्या मानाने काँग्रेसकडे २४९ आणि राष्ट्रवादीकडे ७१ अशी ३२० मते आहे. ही निवडणूक एकतर्फी होऊ शकते.रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेची २४७ आणि भाजपाची १३५ मिळून ३८२ मते आहेत. राष्ट्रवादीकडे १५५, काँग्रेसकडे१३३ अशी २८८ मते आहेत. कोकणच्या या एका जागेसाठी खा. नारायण राणे आणि शेकापचे आ. जयंत पाटील यांची भूमिकाही महत्त्वाची असेल.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषद