शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

31 आॅगस्टपर्यंत निवडणुका अशक्यच

By admin | Updated: June 30, 2017 21:14 IST

सार्वजनिक विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर सर्वच विद्यापीठातील प्रशासनांसमोर प्राधिकरणांच्या निवडणुकांचे मोठे आव्हान आहे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 30 - नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर सर्वच विद्यापीठातील प्रशासनांसमोर प्राधिकरणांच्या निवडणुकांचे मोठे आव्हान आहे. कायदा लागू होऊन ४ महिने उलटून गेल्यानंतर शासनाने अर्धवट अधिनियम जारी केले. त्यातच विद्याशाखांबाबत निर्णय घेण्यासाठी शासनाला उशीर झाला. या सर्वांचा फटका निवडणूक प्रक्रियेला बसला असून ३१ आॅगस्टपर्यंत निवडणूका होणे अशक्यच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नवीन कायदा लागू झाल्यामुळे विद्यापीठाला ३१ आॅगस्टपर्यत व्यवस्थापन, सिनेट, विद्वत परिषद ही प्राधिकरणे तयार करावी लागणार आहे. सिनेट, व्यवस्थापन आणि विद्वत परिषदेवर सदस्याच्या निवडीसाठी निवडणुका घेण्यात येणार आहे. व्यवस्थापन परिषदेवर २३ सदस्य, सिनेटमध्ये ७२ आणि विद्वत परिषदेमध्ये ३८ सदस्यांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश पदे कुलगुरू, कुलपती नामित असल्याने सिनेटमध्ये असलेले पदवीधर, अभ्यासमंडळावर येणारे प्राध्यापक, प्राचार्य आणि संस्थांचे प्रतिनिधी यासाठी विद्यापीठाला निवडणुका घ्याव्या लागणार आहे. यात विद्यापीठाचा सर्वाधिक कस पदवीधर गटाच्या दहा सदस्यांच्या निवडणुकांसाठी लागणार आहे.उच्च व तंत्रशिक्षण मंडळातर्फे विद्यापीठांचे एक समान अधिनियम काढण्यात आला. मात्र त्यात अर्धवट माहिती आहे. विद्यापीठाकडून निवडणूकीसाठी विशेष सेलदेखील स्थापन करण्यात आला. मतदार नोंदणीचे काम जून महिन्यातच सुरू होणे अपेक्षित होते. मात्र विविध अभ्यासक्रमांना कुठल्या विद्याशाखेत समाविष्ट करायचे यासंदर्भात गठीत राज्य शासनाच्या समितीचा अहवाल उशीरा आला. शासनाने मागील आठवड्यात विद्याशाखांचे चित्र स्पष्ट करणारे पत्र पाठविले. त्यामुळे विद्यापीठाला निवडणूकांची नियमावली जाहीर करता आली नाही.मतदार नोंदणीच्या प्रक्रियेला विलंबसाधारणत: पुढील आठवड्यात निवडणूक नियमावली जाहीर करण्यात येईल. त्यानंतर फॉर्म-अच्या माध्यमातून पदवीधर सदस्यांची नोंदणी करण्यात येईल. याला १ महिन्याचा कालावधी द्यावा लागेल. त्यानंतर यादी तयार करावी लागेल व मग मतदार नोंदणीची प्रक्रिया होईल. या संपूर्ण प्रक्रियेत कमीत कमी अडीच महिन्यांचा कालावधी लागेल. अशा स्थितीत ३१ आॅगस्टपर्यंत निवडणूका घेणे शक्यच नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.पुढील आठवड्यात नियमावली जारी होणारयासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थ विनायक काणे यांना विचारणा केली असता विधीसभेसाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुका या ३१ आॅगस्टपर्यंत पार पडणे कठीण असल्याचे मान्य केले. विद्याशाखांचे चित्र स्पष्ट झाले असून आता नियमावलीदेखील जवळपास तयार झाली आहे. पुढील आठवड्यात नियमावली जाहीर होईल व लगेच प्रक्रियेला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.