शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

31 आॅगस्टपर्यंत निवडणुका अशक्यच

By admin | Updated: June 30, 2017 21:14 IST

सार्वजनिक विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर सर्वच विद्यापीठातील प्रशासनांसमोर प्राधिकरणांच्या निवडणुकांचे मोठे आव्हान आहे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 30 - नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर सर्वच विद्यापीठातील प्रशासनांसमोर प्राधिकरणांच्या निवडणुकांचे मोठे आव्हान आहे. कायदा लागू होऊन ४ महिने उलटून गेल्यानंतर शासनाने अर्धवट अधिनियम जारी केले. त्यातच विद्याशाखांबाबत निर्णय घेण्यासाठी शासनाला उशीर झाला. या सर्वांचा फटका निवडणूक प्रक्रियेला बसला असून ३१ आॅगस्टपर्यंत निवडणूका होणे अशक्यच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नवीन कायदा लागू झाल्यामुळे विद्यापीठाला ३१ आॅगस्टपर्यत व्यवस्थापन, सिनेट, विद्वत परिषद ही प्राधिकरणे तयार करावी लागणार आहे. सिनेट, व्यवस्थापन आणि विद्वत परिषदेवर सदस्याच्या निवडीसाठी निवडणुका घेण्यात येणार आहे. व्यवस्थापन परिषदेवर २३ सदस्य, सिनेटमध्ये ७२ आणि विद्वत परिषदेमध्ये ३८ सदस्यांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश पदे कुलगुरू, कुलपती नामित असल्याने सिनेटमध्ये असलेले पदवीधर, अभ्यासमंडळावर येणारे प्राध्यापक, प्राचार्य आणि संस्थांचे प्रतिनिधी यासाठी विद्यापीठाला निवडणुका घ्याव्या लागणार आहे. यात विद्यापीठाचा सर्वाधिक कस पदवीधर गटाच्या दहा सदस्यांच्या निवडणुकांसाठी लागणार आहे.उच्च व तंत्रशिक्षण मंडळातर्फे विद्यापीठांचे एक समान अधिनियम काढण्यात आला. मात्र त्यात अर्धवट माहिती आहे. विद्यापीठाकडून निवडणूकीसाठी विशेष सेलदेखील स्थापन करण्यात आला. मतदार नोंदणीचे काम जून महिन्यातच सुरू होणे अपेक्षित होते. मात्र विविध अभ्यासक्रमांना कुठल्या विद्याशाखेत समाविष्ट करायचे यासंदर्भात गठीत राज्य शासनाच्या समितीचा अहवाल उशीरा आला. शासनाने मागील आठवड्यात विद्याशाखांचे चित्र स्पष्ट करणारे पत्र पाठविले. त्यामुळे विद्यापीठाला निवडणूकांची नियमावली जाहीर करता आली नाही.मतदार नोंदणीच्या प्रक्रियेला विलंबसाधारणत: पुढील आठवड्यात निवडणूक नियमावली जाहीर करण्यात येईल. त्यानंतर फॉर्म-अच्या माध्यमातून पदवीधर सदस्यांची नोंदणी करण्यात येईल. याला १ महिन्याचा कालावधी द्यावा लागेल. त्यानंतर यादी तयार करावी लागेल व मग मतदार नोंदणीची प्रक्रिया होईल. या संपूर्ण प्रक्रियेत कमीत कमी अडीच महिन्यांचा कालावधी लागेल. अशा स्थितीत ३१ आॅगस्टपर्यंत निवडणूका घेणे शक्यच नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.पुढील आठवड्यात नियमावली जारी होणारयासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थ विनायक काणे यांना विचारणा केली असता विधीसभेसाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुका या ३१ आॅगस्टपर्यंत पार पडणे कठीण असल्याचे मान्य केले. विद्याशाखांचे चित्र स्पष्ट झाले असून आता नियमावलीदेखील जवळपास तयार झाली आहे. पुढील आठवड्यात नियमावली जाहीर होईल व लगेच प्रक्रियेला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.