शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनाध्यक्षासाठी निवडणुका हव्यातच!

By admin | Updated: June 6, 2014 00:57 IST

यासंदर्भात साहित्यिकांची मते जाणून घेतली असता निवडणुका रद्द करणे प्रायोगिक तत्त्वावरही योग्य ठरणार नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले. काही मान्यवर साहित्यिकांना संमेलनाध्यक्ष पद सन्मानाने

साहित्य महामंडळाच्या प्रस्तावाला महामंडळ सदस्यांचा विरोध यासंदर्भात साहित्यिकांची मते जाणून घेतली असता निवडणुका रद्द करणे प्रायोगिक  तत्त्वावरही योग्य ठरणार नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले.  काही मान्यवर साहित्यिकांना संमेलनाध्यक्ष पद सन्मानाने देण्यात यावे, अशी महामंडळाच्या अध्यक्षांची भूमिका आहे. याबाबत बरेच चर्वितचर्वण गेली  अनेक वर्षे सुरू आहे. संमेलनाध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविणार्‍या अनेक उमेदवारांनीही यापूर्वी संमेलनाध्यक्ष पद सन्मानाने देण्यात यावे, अशी  भूमिका व्यक्त केली आहे. त्यामुळेच यंदा महामंडळानेही मतदारांचा आणि महामंडळ सदस्यांचा कौल जाणून घेण्याचा निर्णय घेतला. या निमित्ताने  संमेलनाध्यक्ष पद सन्मानाने की, निवडणुकीने या विषयावर साहित्य क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली आहे. यातही फार कमी लोक संमेलनाध्यक्षपद  सन्मानाने देण्यात यावे, याच मताचे आहे. पण बहुतेकांना निवडणुकीला पर्याय नाही असेच वाटते. अनेक मान्यवर साहित्यिकांना संमेलनाध्यक्ष  होण्यासाठी निवडणूक लढविणे कमीपणाचे वाटते. पण त्यात काहीही कमीपणा नाही. देशाच्या सर्वोच्च पदावर आरुढ होणार्‍यांनाही अर्ज भरून द्यावा  लागतो. काही साहित्यिकांना मात्र अर्ज भरून देणे, हा देखील कमीपणा वाटतो. पण ते सर्वथा चुकीचे आहे. याशिवाय दुसर्‍या बाजूने विचार केला  तरीही निवडणुकीला पर्याय नाही. कारण एखाद्याला सन्मानाने संमेलनाध्यक्ष पद देण्याचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मतदारांचा आणि साहित्य  व्यवहारातील लोकांचा सहभाग नसणार आहे. १३ कोटी मराठी जनतेचे प्रतिनिधित्व निवडून न आलेले महामंडळाचे १८ सदस्य घेऊ शकत नाही.  त्यांनी घेतलेला निर्णय सर्व घटक संस्थांच्या सदस्यांनाही मान्य होण्यासारखा नाही. ज्या मान्यवर साहित्यिकांना संमेलनाध्यक्ष व्हायची इच्छा आहे पण अर्ज भरणे, निवडणुकीत उभे राहणे आदींना विरोध आहे, अशा मान्यवर  साहित्यिकांचा महामंडळाने विचारच करू नये, असेही मत अनेकांनी व्यक्त केले आहे. मुळात खरेच जे साहित्यिक मोठे आहेत, ते संमेलनाध्यक्ष न  होताही मोठेच असतात. यात विजय तेंडुलकर, जी. ए. कुळकर्णी, कवी ग्रेस ही नावे आहेतच. त्यांनी संमेलनाध्यक्ष होण्याची इच्छाही व्यक्त केली नाही  आणि संमेलनांकडेही ते फिरकले नाही. पण साहित्यक्षेत्रात ही माणसे निर्विवाद मोठी आहेत. त्यामुळेच ३१ मे च्या बैठकीत मराठवाडा साहित्य परिषद,  मुंबई मराठी संघ, विदर्भ साहित्य संघ यांच्यासह छत्तीसगड, कोकण येथील लोकांनीही निवडणुका रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोध स्पष्टपणे  नोंदविला. हे प्रकरण साधक- बाधक चर्चेनंतर पुढील महिन्याच्या बैठकीत निकाली काढण्याचे ठरविण्यात आले आहे. साहित्य क्षेत्रात काही उंचीची  माणसे आहेत. ते स्वत:हून संमेलनाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त करीत नाहीत. पण असे प्रगल्भ साहित्यिक संमेलनाचे अध्यक्ष व्हावेत आणि संमेलनाध्यक्षपदाची उंची सातत्याने वाढती राहावी, कायम राहावी, हा महामंडळाचा  उद्देश चांगला आहे. त्यामुळे अशा साहित्यिकांना संमेलनाध्यक्षपदी आरुढ करण्याची स्वाभाविक इच्छा महामंडळाला होणे, चुकीचे नाही. पण त्यासाठी  निवडणूक रद्द करणे. हे घटनाबाह्य आहे. पु. ल. देशपांडे, राम शेवाळकर, केशव मेश्राम, दुर्गाबाई भागवत, विश्राम बेडेकर हे साहित्यिक निवडणुकीला  उभे राहिले. त्यावेळी हे साहित्यिक बिनविरोध निवडून यावेत म्हणून महामंडळाने प्रयत्न केला आणि संमेलनाध्यक्ष बिनविरोध निवडून आलेत. एखादा  साहित्यिक खरेच मोठा असेल तर मतदारही त्याला निवडून देतात. त्यामुळे मान्यवर साहित्यिकांना संमेलनाध्यक्ष करण्यासाठी महामंडळाने ती  निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करता येण्यासारखा आहे पण निवडणूक रद्द करणे मात्र योग्य नाही. दुर्गाबाई भागवत उभ्या होत्या तेव्हा वा. कृ.  चोरघडे निवडणुकीत उभे होते. त्यांची उंची मान्य करुन चोरघडे यांनी अर्ज मागे घेतला होता. निवडणूक पद्धतच योग्य आहे, अशी भूमिका स्पष्टपणे  विदर्भ साहित्य संघाने घेतली आहे. यासंदर्भात अनेक महामंडळ सदस्यांशी संपर्क साधला. त्यांनी निवडणूकच असावी, असे मत व्यक्त केले. पण  महामंडळ सदस्य म्हणून नियमाप्रमाणे अधिकृतरीत्या आपण प्रतिक्रिया देऊ शकत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.