शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

ही निवडणूक म्हणजे महापालिकेबाबतचे सार्वमत

By admin | Updated: October 21, 2015 03:20 IST

ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडून देणारी नाही तर महापालिकेत जायचे की नाही, याबाबतचे सार्वमत ठरणारी आहे. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावात आयोजिलेल्या

म्हारळ : ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडून देणारी नाही तर महापालिकेत जायचे की नाही, याबाबतचे सार्वमत ठरणारी आहे. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावात आयोजिलेल्या प्रचार सभेत बोलताना केला. ते पुढे म्हणाले, २७ गावे ही ग्रोथ सेंटर होऊ शकतात आणि त्यासाठी १००० कोटींची तरतूद एम.एफ.आर.डी.ए. च्या माध्यमातून करण्यात आली आहे. भाजपाचे सर्व उमेदवार संघर्ष समितीच्या बॅनर खालीच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूका लढवतील असे जाहीर केले.कल्याण ग्रामीण परिसरातील प्रिमीअर कॉलनीच्या मैदानात सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या जाहीर सभेत बोलत होते. जिल्हा परिषदेच्या निवडणूकीला या २७ गावांना सामोरे जाऊ लागू नये, त्यासाठी मी घाईघाईने गावे पालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. मात्र मला खरी परिस्थिती समजल्यावर ती गावे पुन्हा वगळण्यासाठी नोटीसीफीकेशन काढले परंतु निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ती वगळू शकली नाहीत. या २७ गावांना स्वतंत्र धावण्याची संधी उपलब्ध व्हावी. त्यासाठी पायातपाय अडकवून चालणार नाही व त्यासाठी ग्रोथ सेंटर होऊ शकते म्हणून मी एमएमआरडीए च्या अध्यक्ष नात्याने १००० कोटींची तरतूदही केली व २०/८/२०१५ ही तारीखही सांगितले. तारखेचे कारण सांगताना लगेच काहीजण निवडणूक आयोगास आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार करतात असा टोलाही शिवसेनेस लगावला. १००० कोटींची तरतूद करूनही जर पालिका या गावांचा विकास करू शकली नाही तर उपयोग काय? असा सवालही फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी भाजपाचे खासदार कपील पाटील, आ. रविंद्र चव्हाण, आ. नरेंद्र पवार, मंदाताई म्हात्रे, किसन कथोरे, माजी आ. रमेश पाटील, प्रवीण दरेकर, माजी खासदार संजीव नाईक सह संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, गुलाब वझे, गणेश म्हात्रेंसह उमेदवारांची उपस्थिती होती. (वार्ताहर)