शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

ही निवडणूक म्हणजे महापालिकेबाबतचे सार्वमत

By admin | Updated: October 21, 2015 03:20 IST

ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडून देणारी नाही तर महापालिकेत जायचे की नाही, याबाबतचे सार्वमत ठरणारी आहे. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावात आयोजिलेल्या

म्हारळ : ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडून देणारी नाही तर महापालिकेत जायचे की नाही, याबाबतचे सार्वमत ठरणारी आहे. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावात आयोजिलेल्या प्रचार सभेत बोलताना केला. ते पुढे म्हणाले, २७ गावे ही ग्रोथ सेंटर होऊ शकतात आणि त्यासाठी १००० कोटींची तरतूद एम.एफ.आर.डी.ए. च्या माध्यमातून करण्यात आली आहे. भाजपाचे सर्व उमेदवार संघर्ष समितीच्या बॅनर खालीच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूका लढवतील असे जाहीर केले.कल्याण ग्रामीण परिसरातील प्रिमीअर कॉलनीच्या मैदानात सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या जाहीर सभेत बोलत होते. जिल्हा परिषदेच्या निवडणूकीला या २७ गावांना सामोरे जाऊ लागू नये, त्यासाठी मी घाईघाईने गावे पालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. मात्र मला खरी परिस्थिती समजल्यावर ती गावे पुन्हा वगळण्यासाठी नोटीसीफीकेशन काढले परंतु निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ती वगळू शकली नाहीत. या २७ गावांना स्वतंत्र धावण्याची संधी उपलब्ध व्हावी. त्यासाठी पायातपाय अडकवून चालणार नाही व त्यासाठी ग्रोथ सेंटर होऊ शकते म्हणून मी एमएमआरडीए च्या अध्यक्ष नात्याने १००० कोटींची तरतूदही केली व २०/८/२०१५ ही तारीखही सांगितले. तारखेचे कारण सांगताना लगेच काहीजण निवडणूक आयोगास आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार करतात असा टोलाही शिवसेनेस लगावला. १००० कोटींची तरतूद करूनही जर पालिका या गावांचा विकास करू शकली नाही तर उपयोग काय? असा सवालही फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी भाजपाचे खासदार कपील पाटील, आ. रविंद्र चव्हाण, आ. नरेंद्र पवार, मंदाताई म्हात्रे, किसन कथोरे, माजी आ. रमेश पाटील, प्रवीण दरेकर, माजी खासदार संजीव नाईक सह संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, गुलाब वझे, गणेश म्हात्रेंसह उमेदवारांची उपस्थिती होती. (वार्ताहर)