शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

बाजार समित्यांची निवडणूक लांबणीवर

By admin | Updated: May 20, 2017 02:23 IST

राज्यात होऊ घातलेल्या ५२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. सहकार व पणन विभागाने शुक्रवारी या बाबतचा आदेश काढला आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात होऊ घातलेल्या ५२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. सहकार व पणन विभागाने शुक्रवारी या बाबतचा आदेश काढला आहे. ही निवडणूक पुढे ढकलली जाणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १८ मे रोजीच दिले होते. खातेदार शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदार करण्यासाठी पणन कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची कार्यवाही पूर्ण करून अध्यादेश काढण्यात येईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाजार समित्यांची निवडणूक घेण्याची सरकारची भूमिका आहे. त्यामुळेच बाजार समित्यांची निवडणूक पुढे ढकलली आहे. गावातील विकास सोसायटीचे संचालक आणि ग्रामपंचायतीचे सदस्य हे सध्याच्या पद्धतीनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान करू शकतात. आता प्रत्येक गावातील सातबाराधारक शेतकरी जे संबंधित बाजार समितीमध्ये कृषी मालाची विक्री करतात, त्या सर्वांना विकास सोसायटीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीतील मतदारांची संख्या लाखोंनी वाढणार असून, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना संचालक निवडून देण्याचा अधिकार प्राप्त होईल. राज्यात एकूण ३०७ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. त्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे. खातेधारक शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क देऊन, या दोन पक्षांची बाजार समित्यांमधील एकाधिकारशाही संपुष्टात आणण्याचा सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे म्हटले जाते. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये चांगले यश मिळविल्यानंतर सत्तारूढ भाजपाची नजर बाजार समित्यांवर आहे.