शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

निवडणूक आयोगाने सरळ जागांचा लिलाव करावा - आम आदमी पक्ष

By admin | Updated: March 14, 2017 08:40 IST

आम आदमी पक्षाचे गोवा युनिट समन्वयक एल्विस गोम्स यांनी निवडणूक आयोगाने यापुढे निवडणूक घेण्यापेक्षा सरळ जागांचा लिलाव करावा अशी टीका केली आहे

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 14 - आम आदमी पक्षाचे गोवा युनिट समन्वयक एल्विस गोम्स यांनी निवडणूक आयोगाने यापुढे निवडणूक घेण्यापेक्षा सरळ जागांचा लिलाव करावा अशी टीका केली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना एल्विस गोम्स यांनी गोवा युनिट बरखास्त करण्यात येत असल्याच्या बातम्या निराधार असल्याचंही सांगितलं आहे. पक्ष सिद्धांतावर आम्ही काम करत असल्याचं ते बोलले आहेत. 
 
गोवा विधानसभा निवडणुकीत झालेल्या दणदणीत पराभवानंतर एल्विस गोम्स यांची ही पहिलीच पत्रकार परिषद होती. आम आदमी पक्ष साधी एकही जागा जिंकू शकलं नाही. 
 
एल्विस गोम्स यांनी सांगितलं की, 'निवडणूक आयोग अपयशी झाला असल्याने निवडणूक जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा वापरण्याचा प्रकार वाढला आहे. कधी कधी तर मला आश्चर्यच वाटतं की ही निवडणूक का घेतली जाते ?, निवडणूक आयोगाने जागांचा लिलाव केला तर जास्त उत्तम होईल. जो जास्त किंमत देईल त्याला ती जागा देऊन टाकावी. विनाकारण एवढा खर्च करुन निवडणूक घेण्याची गरज काय ?'.
 
लोकांना नेमकं काय हवं आहे, हे समजण्याच्या पलीकडे आहे असं एल्विस गोम्स बोलले आहेत. 'आम आदमी पक्षाने लोकांसमोर एक योग्य आणि चांगला पर्याय ठेवला होता. ज्यामधून नवे चेहरे समोर आणले होते. धार्मिक आणि जातीय फॉर्म्यूला दूर ठेवून स्वच्छ प्रतिमा असणा-यांना तिकीट दिलं होतं. लोकांना आता याहून अधिक काय हवं आहे, हे समजण्यापलीकडे आहे. लोकांना अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करु', असं एल्विस गोम्स बोलले आहेत.
 
 
गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नसले, तरी ४0 सदस्यीय विधानसभेत काँग्रेस १७ जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. गेली पाच वर्षे राज्य केलेल्या भाजपाला जबरदस्त धक्का बसला. भाजपाच्या मुख्यमंत्र्यांसह एकूण सहा मंत्री पराभूत झाले. या निवडणुकीत पाच माजी मुख्यमंत्री विजयी झाले, तर तिघा अपक्षांनी बाजी मारली. रोहन खंवटे यांनी सलग दुसऱ्यांदा पर्वरीतून अपक्ष जिंकून इतिहास घडवला.
 
आम्हाला पर्याय नाही. आम्ही महिलांसाठी प्रचंड योजना राबविल्या आहेत, संघटनात्मक बांधणी आमच्याकडेच आहे, अशा वल्गना करून २३ ते २६ जागा जिंकण्याचा दावा भाजपा नेते गेले वर्षभर करत होते. प्रत्येक मतदारसंघात भाजपाने प्रचंड पैसा निवडणुकीवेळी खर्च केला. हाती पोलीस यंत्रणादेखील होती. तरीसुद्धा मतदारांनी भाजपाला २१वरून १३ जागांपर्यंत खाली आणले. केंद्रात व गोव्यातही सत्ता असूनदेखील भाजपाचा पराभव झाला. याउलट पाच वर्षांपूर्वीच २०१२ सालच्या निवडणुकीत ज्या काँग्रेसला केवळ ९ जागा मिळाल्या होत्या, तो पक्ष या वेळी १७ मतदारसंघांमध्ये बाजी मारू शकला.
 
२०१२च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. या वेळी चर्चिल आलेमाव यांच्या रूपाने राष्ट्रवादीला एक जागा जिंकता आली. बाणावली मतदारसंघातून चर्चिल यांनी विधानसभेत पुनरागमन केले आहे.
२०१२ साली फोंड्यात पराभूत झालेले माजी मुख्यमंत्री रवी नाईक, २००७ साली नावेलीत पराभूत झालेले लुईझिन फालेरो यांचेही विधानसभेत आता पुनरागमन झाले आहे.रवी, फालेरो, प्रतापसिंग राणे, दिगंबर कामत व चर्चिल आलेमाव हे पाचही माजी मुख्यमंत्री जिंकले.
 
गोव्यावर राज्य करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या आम आदमी पक्षाला खातेही खोलता आले नाही. सर्व मतदारसंघांमध्ये ‘आप’चा दारुण पराभव झाला. नव्यानेच स्थापन झालेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाने चार जागा लढविल्या होत्या. त्यापैकी तीन जागा मिळवून या पक्षाने मोठे यश मिळविले. गोवा फॉरवर्डच्या उमेदवारांनी भाजपाच्या दोघा ज्येष्ठ मंत्र्यांचा दणदणीत पराभव केला. भाजपाशी युती तोडून बंडखोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी व शिवसेनेशी युती केलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या वाट्याला अपेक्षाभंग आला. आपल्याला किमान ८ जागा मिळतील, असा दावा करणाऱ्या मगोपला केवळ तीनच मतदारसंघ जिंकता आले. त्यातही मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांचा पराभव झाला.