शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

सोशल मीडियावर निवडणूक आयोगाची नजर

By admin | Updated: September 24, 2014 13:49 IST

व्हॉट्सअँप, फेसबुक, हाईक यासारख्या सोशल मीडियाचा वापर करताना कोणत्याही नेत्याची बदनामी करणे, सामाजिक शांतता बिघडविणे वा कोणाच्या भावना दुखावण्यासारखा प्रकार करणे आता परवडणार नाही.

 नासीर कबीर■ करमाळा

व्हॉट्सअँप, फेसबुक, हाईक यासारख्या सोशल मीडियाचा वापर करताना कोणत्याही नेत्याची बदनामी करणे, सामाजिक शांतता बिघडविणे वा कोणाच्या भावना दुखावण्यासारखा प्रकार करणे आता परवडणार नसून गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार ३ वर्षे कारावास ते ५ लाखांपर्यंतच्या दंडाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
लोकसभा निवडणूक काळात आपले सर्मथन असणार्‍या नेत्यांचे उदात्तीकरण करताना विरोधी नेतेमंडळींची चेष्टा उडविणारे, बदनामी करणारे मेसेज, फोटो सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात फिरत होते. आता विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून पुन्हा एकदा तशाच चुकीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ लागली आहे; मात्र आता सोशल मीडियाबाबत पोलीस यंत्रणा अधिक जागरुक झाली आहे. नेटकर्‍यांनी अशा प्रकारच्या घटनांपासून दूर राहणे गरजेचे आहे. कायद्याच्या कचाट्यात सापडून शिक्षा भोगावी लागण्याची शक्यता आहे.
गत लोकसभा निवडणुकी दरम्यान सोशल मीडियाचा गैरवापर झाल्याची उदाहरणे पुढे आली होती. राजकीय नेत्यांची चेष्टा करणारे मेसेज, फोटो, विनोद सोशल मीडियावर सातत्याने दिसत होते. आता विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवरही तशाच प्रकारांची पुनरावृत्ती होण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करणे महागात पडणार आहे. त्याचा गैरवापर केल्याचे सिद्ध झाल्यास भारतीय दंडविधान संहिता २९५/६६/अ अन्वये कायदेशीर कारवाई होऊ शकते. आक्षेपार्ह मजकूर, फोटो, विनोद याबाबत जागरुक राहणे आवश्यक बनले आहे.
 
सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह किंवा भावना दुखावणारा मजकूर, बदनामीकारक फोटो असे काही आढळल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. सोशल मीडियावर गैरप्रकार करणार्‍यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- अनिल पाटील, उपविभागीय अधिकारी, करमाळा 
 
■ सोशल मीडियाच्या विश्‍वात एखादा मजकूर, फोटो, कॉपी, पेस्ट शेअर करतानाच तो लाईक करणे, त्यावर कॉमेंट देणे याची स्पर्धाच लागल्याचे दिसते आहे. मात्र हे करताना सावधानता बाळगली नाही तर कायद्याच्या कचाट्यात सापडण्याचा धोका आहे. तेव्हा व्हॉट्सअँप, फेसबुकचा वापर करताना डोळसपणे पाहणे आवश्यक आहे.