शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

ठाण्यात संविधान सन्मान मोर्चाचा एल्गार

By admin | Updated: October 23, 2016 16:46 IST

ना जातीसाठी ना मातीसाठी आम्ही आलो संविधानाच्या सन्मानासाठी असा नारा देत रविवारी लाखो आंबेडकरी नागरिकांनी ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर

ऑनलाइऩ लोकमत
ठाणे, दि. 23 - ना जातीसाठी ना मातीसाठी आम्ही आलो संविधानाच्या सन्मानासाठी असा  नारा देत  रविवारी लाखो आंबेडकरी नागरिकांनी ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.  संविधानाच्या मूळ गाभ्याला छेद देणाऱ्या काही मागण्या पुढे  येऊ लागल्याने त्याचा विरोध करणे गरजेचे आहे. यासाठीच  हा संविधान सन्मान मोर्चा काढण्यात आल्याचे आयोजकांनी  सांगितले. 
ऍट्रॉसिटी कायद्याची अधिक कडक अमलबजावणी करण्यात यावी , नाशिक येथे दलित कुटुंबियांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शा सन करा, दलित आदिवासींयावरील जातीय अत्याचारांना कठोर पायबंद घाला , कोपर्डीमधील त्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी,अट्रोसिटी कायद्याच्या अंलबजावणीची   श्वेत पत्रिका जाहीर करा, डॉ नरेंद्र दाभोलकर , कॉ गोविंद पानसरे , डॉ कलबुर्गी यांच्या मारेकर्यांना आणि खुनाच्या सूत्रधाराणा फाशीची शिक्षा द्या , विस्थापित भटक्या विमुक्त समाजाचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करा , इतर मागासवर्गीय समाजाचे घटनांत्मक आरक्षण कायम ठेवा , मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण जाहीर करा , मराठा समाजालाही संविधानाच्या तरतुदीनुसार आरक्षण देण्यात यावे, पाटील समितीचा अहवाल जाहीर करा , आदिवासींचे कुपोषण थांबवा , शेतकर्यक्रत्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शेती धोरण जाहीर करा. कामगार कायद्यातील प्रतिगामी बदल थांबवा, कंत्राटी पद्धत बंद करून बंद झालेले कारखाने सुरु करा , जमिनीचे राष्ट्रयीकरण करा आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. या मोर्चात नानासाहेब इंदिसे,  शामदादा  गायकवाड , चंद्रकांत हंडोरे, काकासाहेब खंबाळकर, रवी गरूड , समाधान नावकर, भय्यासाहेब इंदिसे,   सुनील खांबे, जितेंद्रकुमार इंदिसे , भास्कर वाघमारे, उत्तम खडसे, राजय गायकवाड, किरण चन्ने,  चंद्रभान आझाद, प्रमोद इंगळे, पंढरीनाथ गायकवाड, संदीप खांबे, मुश्ताक बाबा, अनिस कुरेशी, बाबासाहेब कांबळे , आबासाहेब चासकर   आदी मान्यवर उपस्थित होते 
 
अहमदनगर येथील कोपर्डी गावातील घटनेननंतर राज्यभरात ऍट्रॉसिटी कायदा रद्द करावा आणि इतर मागण्यांसाठी मोर्चे निघत आहेत. कोपर्डीची ती अमानुष घटना आणि संविधानाने  मागासवर्गीयांचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी दिलेल्या ऍट्रॉसिटी कायद्याचा काहीही संबंध नाही. तरीही राज्यातील जनतेमध्ये जाणीवपपूर्व या कायद्याच्याबाबत गैरसमज पसरविला जात आहे. त्यांचे हे असे कृत्य संविधानाच्या उद्देशाला छेद देणारे आहे. म्हणूनच संविधानचा खरा देश हिताचा उद्देश तमाम भारतीय नागरिकांपर्यंत पोहचावा, संविधानाबाबत गैर समज पसरविणे थांबले जावे आणि या देशातील संविधानाने भारतीय नागरिकांना दिलेले सर्व अधिकार अबाधित राहावेत, यासाठी   संविधान सन्मान मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे  श्यामदादा गायकवाड यांनी यावेळा बोलताना सांगितले . रख  रखत्या  उन्हात लाखो दलित, आदिवासी, भटके विमुक्त ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाचे बांधव मोर्चाला मोठ्या संख्येने आले होते महिलांची उपस्थितीही प्रचंड प्रमाणात होती.