शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

शेतक-यांवर कुठलाही अन्याय होणार नाही: एकनाथ शिंदे

By admin | Updated: July 13, 2017 20:43 IST

महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीला वेग मिळणार आहे. या महामार्गासाठी जमीन खरेदी करण्याच्या प्रक्रियेत सर्व शेतक-यांना

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 13 - महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीला वेग मिळणार आहे. या महामार्गासाठी जमीन खरेदी करण्याच्या प्रक्रियेत सर्व शेतक-यांना विश्वासात घेऊन त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात येईल. कुठल्याही शेतकºयावर अन्याय होणार नाही व २ आॅक्टोबरपर्यंत १०० टक्के ही प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. समृद्धी महामागार्साठी थेट जमीन खरेदीचा शुभारंभ आज नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातून झाला. या निमित्ताने नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
 
नागपूर-मुंबई हा महाराष्ट्र समृद्धीमार्ग विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकणातील दहा जिल्ह्यांना जोडणार असून या महामार्गावरुन २६ तालुके हे विकास मार्गावर येणार आहेत. महामार्गासाठी आवश्यक असणारी जमीन बाजारमूल्यापेक्षा ५ पट मोबदला देऊन खरेदी करण्यात येणार आहे. शिवाय जमिनीवरील विहीरी, बांधकाम यांचादेखील योग्य मोबदला देण्यात येईल. आतापर्यंत ३९२ गावांपैकी ३७१ गावांमध्ये जमीनीची मोजणी पूर्ण झाली आहे. उर्वरित गावांमध्ये जमीनीच्या मोजणीसाठी विरोध आहे. या गावांतील शेतकºयांशी शासनातर्फे संवाद साधण्यात येणार असून त्यांच्या सर्व शंकांचे समाधान करण्यात येईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
 
उद्धव ठाकरेंच्याच निर्देशांचे पालन
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकºयांची बाजू घेतली आहे. समृद्धी महामार्गाच्या बांधकामाला त्यांचा विरोध नाही. मात्र एकाही शेतकºयावर अन्याय व्हायला नको, अशी त्यांची स्पष्ट भुमिका आहे. त्यांच्या निर्देशांचेच पालन होत असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती शेतकºयांकडून येणाºया सूचनांवर विचार करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 
‘मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे’ची क्षमतावाढ
‘मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे’वर वर्दळ वाढली असून अनेकदा येथे वाहतूकीची कोंडी होते. ही बाब लक्षात घेऊन या मार्गाची क्षमता वाढ करण्यात येणार आहे. याअंतर्गत ८ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार असून येथून हलकी वाहने जाऊ शकतील. यासंदर्भात निविदी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
५ ठिकाणी विमान उतरण्याची सुविधा
 
समृद्धी महामार्ग बांधत असताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. शेतकºयांसाठी २४ ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र उभारण्यात येतील. तसेच ५ ठिकाणी ‘इमर्जन्सी’मध्ये विमान उतरु शकतील, अशी सुविधा राहणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.