शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

शेतक-यांवर कुठलाही अन्याय होणार नाही: एकनाथ शिंदे

By admin | Updated: July 13, 2017 20:43 IST

महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीला वेग मिळणार आहे. या महामार्गासाठी जमीन खरेदी करण्याच्या प्रक्रियेत सर्व शेतक-यांना

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 13 - महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीला वेग मिळणार आहे. या महामार्गासाठी जमीन खरेदी करण्याच्या प्रक्रियेत सर्व शेतक-यांना विश्वासात घेऊन त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात येईल. कुठल्याही शेतकºयावर अन्याय होणार नाही व २ आॅक्टोबरपर्यंत १०० टक्के ही प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. समृद्धी महामागार्साठी थेट जमीन खरेदीचा शुभारंभ आज नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातून झाला. या निमित्ताने नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
 
नागपूर-मुंबई हा महाराष्ट्र समृद्धीमार्ग विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकणातील दहा जिल्ह्यांना जोडणार असून या महामार्गावरुन २६ तालुके हे विकास मार्गावर येणार आहेत. महामार्गासाठी आवश्यक असणारी जमीन बाजारमूल्यापेक्षा ५ पट मोबदला देऊन खरेदी करण्यात येणार आहे. शिवाय जमिनीवरील विहीरी, बांधकाम यांचादेखील योग्य मोबदला देण्यात येईल. आतापर्यंत ३९२ गावांपैकी ३७१ गावांमध्ये जमीनीची मोजणी पूर्ण झाली आहे. उर्वरित गावांमध्ये जमीनीच्या मोजणीसाठी विरोध आहे. या गावांतील शेतकºयांशी शासनातर्फे संवाद साधण्यात येणार असून त्यांच्या सर्व शंकांचे समाधान करण्यात येईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
 
उद्धव ठाकरेंच्याच निर्देशांचे पालन
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकºयांची बाजू घेतली आहे. समृद्धी महामार्गाच्या बांधकामाला त्यांचा विरोध नाही. मात्र एकाही शेतकºयावर अन्याय व्हायला नको, अशी त्यांची स्पष्ट भुमिका आहे. त्यांच्या निर्देशांचेच पालन होत असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती शेतकºयांकडून येणाºया सूचनांवर विचार करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 
‘मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे’ची क्षमतावाढ
‘मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे’वर वर्दळ वाढली असून अनेकदा येथे वाहतूकीची कोंडी होते. ही बाब लक्षात घेऊन या मार्गाची क्षमता वाढ करण्यात येणार आहे. याअंतर्गत ८ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार असून येथून हलकी वाहने जाऊ शकतील. यासंदर्भात निविदी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
५ ठिकाणी विमान उतरण्याची सुविधा
 
समृद्धी महामार्ग बांधत असताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. शेतकºयांसाठी २४ ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र उभारण्यात येतील. तसेच ५ ठिकाणी ‘इमर्जन्सी’मध्ये विमान उतरु शकतील, अशी सुविधा राहणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.