शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

शेतक-यांवर कुठलाही अन्याय होणार नाही: एकनाथ शिंदे

By admin | Updated: July 13, 2017 20:43 IST

महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीला वेग मिळणार आहे. या महामार्गासाठी जमीन खरेदी करण्याच्या प्रक्रियेत सर्व शेतक-यांना

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 13 - महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीला वेग मिळणार आहे. या महामार्गासाठी जमीन खरेदी करण्याच्या प्रक्रियेत सर्व शेतक-यांना विश्वासात घेऊन त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात येईल. कुठल्याही शेतकºयावर अन्याय होणार नाही व २ आॅक्टोबरपर्यंत १०० टक्के ही प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. समृद्धी महामागार्साठी थेट जमीन खरेदीचा शुभारंभ आज नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातून झाला. या निमित्ताने नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
 
नागपूर-मुंबई हा महाराष्ट्र समृद्धीमार्ग विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकणातील दहा जिल्ह्यांना जोडणार असून या महामार्गावरुन २६ तालुके हे विकास मार्गावर येणार आहेत. महामार्गासाठी आवश्यक असणारी जमीन बाजारमूल्यापेक्षा ५ पट मोबदला देऊन खरेदी करण्यात येणार आहे. शिवाय जमिनीवरील विहीरी, बांधकाम यांचादेखील योग्य मोबदला देण्यात येईल. आतापर्यंत ३९२ गावांपैकी ३७१ गावांमध्ये जमीनीची मोजणी पूर्ण झाली आहे. उर्वरित गावांमध्ये जमीनीच्या मोजणीसाठी विरोध आहे. या गावांतील शेतकºयांशी शासनातर्फे संवाद साधण्यात येणार असून त्यांच्या सर्व शंकांचे समाधान करण्यात येईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
 
उद्धव ठाकरेंच्याच निर्देशांचे पालन
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकºयांची बाजू घेतली आहे. समृद्धी महामार्गाच्या बांधकामाला त्यांचा विरोध नाही. मात्र एकाही शेतकºयावर अन्याय व्हायला नको, अशी त्यांची स्पष्ट भुमिका आहे. त्यांच्या निर्देशांचेच पालन होत असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती शेतकºयांकडून येणाºया सूचनांवर विचार करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 
‘मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे’ची क्षमतावाढ
‘मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे’वर वर्दळ वाढली असून अनेकदा येथे वाहतूकीची कोंडी होते. ही बाब लक्षात घेऊन या मार्गाची क्षमता वाढ करण्यात येणार आहे. याअंतर्गत ८ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार असून येथून हलकी वाहने जाऊ शकतील. यासंदर्भात निविदी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
५ ठिकाणी विमान उतरण्याची सुविधा
 
समृद्धी महामार्ग बांधत असताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. शेतकºयांसाठी २४ ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र उभारण्यात येतील. तसेच ५ ठिकाणी ‘इमर्जन्सी’मध्ये विमान उतरु शकतील, अशी सुविधा राहणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.