शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

एकनाथ खडसेंची हकालपट्टी करा!

By admin | Updated: June 2, 2016 03:22 IST

आपण भ्रष्टाचारमुक्त सरकार देत असल्याच्या दाव्याचा छेद देण्यासाठी काँग्रेसने आता महाराष्ट्राचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना लक्ष्य केले असून, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा

शीलेश शर्मा,  नवी दिल्लीआपण भ्रष्टाचारमुक्त सरकार देत असल्याच्या दाव्याचा छेद देण्यासाठी काँग्रेसने आता महाराष्ट्राचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना लक्ष्य केले असून, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांनी तो न दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मंगळवारी दिल्लीत केली. एकीकडे नरेंद्र मोदी यांनी न खाऊंगा, न खाने दंूगा, असे जाहीर केले होते, पण त्यांच्या या दाव्यातील पोकळपणा उघड झाला आहे, अशी टीका काँग्रेसच्या प्रवक्त्या सुश्मिता देव यांनी केली. खडसे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर आले असूनही पंतप्रधान त्याबद्दल गप्प का आहेत, त्यांना खडसे यांचा भ्रष्टाचार दिसत कसा नाही, असा सवालही त्यांनी केला. खडसे यांच्या मोबाइलवर अंडरवलर्ड डॉनच्या घरून फोन येतो आणि तरीही पंतप्रधानांना त्याचे काही वाटत नाही, अशी टीका करून सुश्मिता देव म्हणाल्या की, ‘खडसे यांच्या साऱ्या कहाण्याच भ्रष्टाचाराच्या असल्याचे आता पुढे येत आहे. विरोधी पक्षांनी न केलेला भ्रष्टाचारही पंतप्रधानांना दिसतो, पण खडसे यांचे नाव पुढे येताच मात्र ते आता भाजपाचे सारे नेते गप्प बसतात, हे आश्चर्यच आहे.’ज्या मोबाइलवर दाऊदच्या घरून फोन आले, तो क्रमांक आपला असल्याचे स्वत: एकनाथ खडसे यांनी मान्य केले आहे, याकडे लक्ष वेधून त्या म्हणाल्या की, ‘जोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून दूर केले जात नाही, तोवर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे अशक्य आहे. त्यामुळे खडसे यांचा राजीनामा घेण्यात यावा, अन्यथा त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे.’ >भाजपाच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना पंतप्रधान त्याकडे डोळेझाक करीत आहे, असा आरोप करून सुश्मिता देव या म्हणाल्या की, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंंधराराजे या ललित मोदी यांना पाठिशी घालतात आणि तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही, याची कारणे जनतेला माहीत आहे.एवढेच नव्हे, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह सरकारचा यांचा सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील घोटाळा, त्यांच्या मुलाचे परदेशातील काळ्या पैशाचे प्रकरण, अनेक बळी घेणारा मध्य प्रदेशातील शिवराजसिंग चौहान सरकारचा व्यापम घोटाळा अशी प्रकरणे समोर आली असतानाही त्याची चौकशी करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी तयार नाहीत. याचाच अर्थ, ते भ्रष्टाचार आणि घोटाळेबाज यांना पाठिशी घालत आहेत.