शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

एकनाथ खडसेंची हकालपट्टी करा!

By admin | Updated: June 2, 2016 03:22 IST

आपण भ्रष्टाचारमुक्त सरकार देत असल्याच्या दाव्याचा छेद देण्यासाठी काँग्रेसने आता महाराष्ट्राचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना लक्ष्य केले असून, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा

शीलेश शर्मा,  नवी दिल्लीआपण भ्रष्टाचारमुक्त सरकार देत असल्याच्या दाव्याचा छेद देण्यासाठी काँग्रेसने आता महाराष्ट्राचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना लक्ष्य केले असून, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांनी तो न दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मंगळवारी दिल्लीत केली. एकीकडे नरेंद्र मोदी यांनी न खाऊंगा, न खाने दंूगा, असे जाहीर केले होते, पण त्यांच्या या दाव्यातील पोकळपणा उघड झाला आहे, अशी टीका काँग्रेसच्या प्रवक्त्या सुश्मिता देव यांनी केली. खडसे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर आले असूनही पंतप्रधान त्याबद्दल गप्प का आहेत, त्यांना खडसे यांचा भ्रष्टाचार दिसत कसा नाही, असा सवालही त्यांनी केला. खडसे यांच्या मोबाइलवर अंडरवलर्ड डॉनच्या घरून फोन येतो आणि तरीही पंतप्रधानांना त्याचे काही वाटत नाही, अशी टीका करून सुश्मिता देव म्हणाल्या की, ‘खडसे यांच्या साऱ्या कहाण्याच भ्रष्टाचाराच्या असल्याचे आता पुढे येत आहे. विरोधी पक्षांनी न केलेला भ्रष्टाचारही पंतप्रधानांना दिसतो, पण खडसे यांचे नाव पुढे येताच मात्र ते आता भाजपाचे सारे नेते गप्प बसतात, हे आश्चर्यच आहे.’ज्या मोबाइलवर दाऊदच्या घरून फोन आले, तो क्रमांक आपला असल्याचे स्वत: एकनाथ खडसे यांनी मान्य केले आहे, याकडे लक्ष वेधून त्या म्हणाल्या की, ‘जोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून दूर केले जात नाही, तोवर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे अशक्य आहे. त्यामुळे खडसे यांचा राजीनामा घेण्यात यावा, अन्यथा त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे.’ >भाजपाच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना पंतप्रधान त्याकडे डोळेझाक करीत आहे, असा आरोप करून सुश्मिता देव या म्हणाल्या की, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंंधराराजे या ललित मोदी यांना पाठिशी घालतात आणि तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही, याची कारणे जनतेला माहीत आहे.एवढेच नव्हे, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह सरकारचा यांचा सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील घोटाळा, त्यांच्या मुलाचे परदेशातील काळ्या पैशाचे प्रकरण, अनेक बळी घेणारा मध्य प्रदेशातील शिवराजसिंग चौहान सरकारचा व्यापम घोटाळा अशी प्रकरणे समोर आली असतानाही त्याची चौकशी करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी तयार नाहीत. याचाच अर्थ, ते भ्रष्टाचार आणि घोटाळेबाज यांना पाठिशी घालत आहेत.