शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

काकाच्या मृत्युस कारणीभूत पुतण्याला आठ वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: February 27, 2017 20:29 IST

कळवण तालुक्यातील घटना : मिरचीच्या रोपावरून काका-काकूला मारहाण ; काकाचा मृत्यू

काकाच्या मृत्युस कारणीभूत पुतण्याला आठ वर्षे सक्तमजुरीकळवण तालुक्यातील घटना : मिरचीच्या रोपावरून काका-काकूला मारहाण ; काकाचा मृत्यूनाशिक : शेतात मिरचीचे रोप लावण्याच्या कारणावरून काका - काकूला पुतण्याने मोगरीने केलेल्या मारहाणीत काकाचा मृत्यु झाल्याची घटना कळवण तालुक्यातील माळगाव येथे २०१५ ला घडली होती़ जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात न्यायाधीश एनक़े़ब्रह्मे यांनी आरोपी राजेंद्र भाऊराव गायकवाड (२६, रा़माळगाव, ताक़ळवण, जि़नाशिक) या पुतण्यास मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोषी ठरवत सोमवारी (दि़२७) आठ वर्षे सक्तमजुरी व चौदा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़कळवण तालुक्यातील माळगाव येथील आरोपी राजेंद्र गायकवाड याचे ८ जानेवारी २०१५ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आपले काका गुलाब गायकवाड व काकू रजुबाई गायकवाड यांच्यासोबत शेतात मिरचीचे रोप लावण्याच्या कारणावरून भांडण झाले़ यामध्ये आरोपी राजेंद्र याने काका व काकूलला मोगरीने मारहाण केली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गुलाब गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला़ या प्रकरणी रजुबाई गायकवाड यांनी पुतण्या राजेंद्र गायकवाडविराधोत कळवण तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता़ यामध्ये सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी १२ साक्षीदार तपासले़ या साक्षीदारांमध्ये मयत गुलाब गायकवाड यांची पत्नी रजुबाई व व एका नऊ वर्षांच्या मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली़ न्यायालयाने फिर्यादी व बचाव पक्षाच्या वकीलांचा युक्तीवाद तसेच समोर आलेल्या साक्षी पुराव्यानुसार आरोपी राजेंद्र गायकवाड यास मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३०४(२) अन्वये आठ वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड तर भारतीय दंड विधान कलम ३२४ (धातक हत्याराने इच्छापुर्वक दुखापत करणे) अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेत आरोपी राजेंद्र गायकवाड याने काँक्रिट शिक्षा भोगावयाच्या असून दंडाच्या रकमेतील दहा हजार रुपये फिर्यादी रजुबाई गायकवाड यांना देण्यात यावे असे म्हटले आहे़ या खटल्यातील आरोपी राजेंद्र गायकवाड हा घटना घडल्यापासून कारागृहात आहे़(प्रतिनिधी)